शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

कोणत्या कायद्यांतर्गत दाम्पत्यांना अटक केली?

By admin | Updated: September 23, 2015 01:36 IST

कायद्याच्या कोणत्या तरतुदींतर्गत मालवणी येथील हॉटेल्सवर धाड घालून दाम्पत्यांना अटक करण्यात आली

मुंबई: कायद्याच्या कोणत्या तरतुदींतर्गत मालवणी येथील हॉटेल्सवर धाड घालून दाम्पत्यांना अटक करण्यात आली, असा सवाल राज्य सरकारला करत उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत यासंदर्भात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.६ आॅगस्ट रोजी पोलिसांनी मालवणी येथील मढमधील हॉटेल्सवर धाड घालून ६१ लोकांना बॉम्बे पोलीस अ‍ॅक्ट कलम ११० (अश्लील वर्तन) अटक केली, त्यात १३ दाम्पत्यांचा समावेश होता. पोलिसांनी घातलेली धाड बेकायदेशीर होती आणि नागरिकांच्या खासगी आयुष्यावर गदा आणणारी होती, असे म्हणत खारचे रहिवासी सुमीर सब्रवाल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि नाहक पकडण्यात आलेल्या दाम्पत्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.‘राज्य सरकारने ही कारवाई कायद्याच्या कोणत्या तरतुदींतर्गत केली, याची आम्ही यापूर्वीही विचारणा केली आहे. त्यावेळी सरकारने स्थानिकांनी केलेल्या तक्रारीमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे आम्हाला सांगितले. मात्र तरीही कोणत्या तरतुदीअंतर्गत तुम्ही ही कारवाई केली, ते स्पष्ट करा,’ असे म्हणत खंडपीठाने राज्य सरकारला यासंदर्भातील स्पष्टीकरण देण्यासाठी दोन आठवड्यांत अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.गेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने राज्य सरकारच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. धाड घालण्यामागे पोलिसांचा हेतू चांगला असला, तरी नागरिकांच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण केले जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने राज्य सरकारला सुनावले होते. (प्रतिनिधी)