शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
3
२७७ प्रवासांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
4
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
5
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
6
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
7
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
8
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
9
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
10
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
11
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
13
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
14
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
15
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
16
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
17
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
18
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
19
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
20
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला

भिवंडीतील तीन पूल पाण्याखाली, 20 ते 22 गावांचा संपर्क तुटला

By admin | Updated: June 25, 2017 21:20 IST

आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने काल रात्री भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील तीन पूल पाण्याखाली गेले

ऑनलाइन लोकमतभिवंडी दि. 25- आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने काल रात्री भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील तीन पूल पाण्याखाली गेले आहे. मुसळधार पावसानं किमान 20 ते 22 गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. काल मध्यरात्रीपासून ठाण्यासह भिवंडीत जोरदार पाऊससरी कोसळल्या. भिवंडी तालुक्यात 24 तासांत सर्वाधिक 205 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या गावातील छोटे-मोठे प्रवाह जवळच्या नदीला मिसळून पाण्याचा लोंढा आला आणि वाडा तसेच वसई परिसराला जोडणारे तीन पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे अवचितपाडा, निंबवली, गोराड, कलभोण आणि गणेशपुरी यांच्यासह छोट्या-मोठ्या 20 गावांचा संपर्क तुटला. या पावसाने शेतकरी सुखावले असले तरी जनजीवन विस्कळीत झालं आहे. तीन पूल पाण्याखाली गेल्यानं वाडा आणि वसईच्या बाजारात दूध, भाजीपाला विक्रीसाठी आणणारे शेतकरी गावातच अडकून पडले. मुसळधार पावसामुळे ते शहरापर्यंत पोहोचू शकले नाहीत. मुसळधार पावसानं संपर्क तुटलेल्या गावांपर्यंत महसूल विभागाचे अधिकारी देखील आज संध्याकाळपर्यंत पोहोचू शकलेले नव्हते,अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.