शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील तीन पूल पाण्याखाली, 20 ते 22 गावांचा संपर्क तुटला

By admin | Updated: June 25, 2017 21:20 IST

आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने काल रात्री भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील तीन पूल पाण्याखाली गेले

ऑनलाइन लोकमतभिवंडी दि. 25- आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने काल रात्री भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील तीन पूल पाण्याखाली गेले आहे. मुसळधार पावसानं किमान 20 ते 22 गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. काल मध्यरात्रीपासून ठाण्यासह भिवंडीत जोरदार पाऊससरी कोसळल्या. भिवंडी तालुक्यात 24 तासांत सर्वाधिक 205 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या गावातील छोटे-मोठे प्रवाह जवळच्या नदीला मिसळून पाण्याचा लोंढा आला आणि वाडा तसेच वसई परिसराला जोडणारे तीन पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे अवचितपाडा, निंबवली, गोराड, कलभोण आणि गणेशपुरी यांच्यासह छोट्या-मोठ्या 20 गावांचा संपर्क तुटला. या पावसाने शेतकरी सुखावले असले तरी जनजीवन विस्कळीत झालं आहे. तीन पूल पाण्याखाली गेल्यानं वाडा आणि वसईच्या बाजारात दूध, भाजीपाला विक्रीसाठी आणणारे शेतकरी गावातच अडकून पडले. मुसळधार पावसामुळे ते शहरापर्यंत पोहोचू शकले नाहीत. मुसळधार पावसानं संपर्क तुटलेल्या गावांपर्यंत महसूल विभागाचे अधिकारी देखील आज संध्याकाळपर्यंत पोहोचू शकलेले नव्हते,अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.