शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

भिवंडीतील तीन पूल पाण्याखाली, 20 ते 22 गावांचा संपर्क तुटला

By admin | Updated: June 25, 2017 21:20 IST

आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने काल रात्री भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील तीन पूल पाण्याखाली गेले

ऑनलाइन लोकमतभिवंडी दि. 25- आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने काल रात्री भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील तीन पूल पाण्याखाली गेले आहे. मुसळधार पावसानं किमान 20 ते 22 गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. काल मध्यरात्रीपासून ठाण्यासह भिवंडीत जोरदार पाऊससरी कोसळल्या. भिवंडी तालुक्यात 24 तासांत सर्वाधिक 205 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या गावातील छोटे-मोठे प्रवाह जवळच्या नदीला मिसळून पाण्याचा लोंढा आला आणि वाडा तसेच वसई परिसराला जोडणारे तीन पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे अवचितपाडा, निंबवली, गोराड, कलभोण आणि गणेशपुरी यांच्यासह छोट्या-मोठ्या 20 गावांचा संपर्क तुटला. या पावसाने शेतकरी सुखावले असले तरी जनजीवन विस्कळीत झालं आहे. तीन पूल पाण्याखाली गेल्यानं वाडा आणि वसईच्या बाजारात दूध, भाजीपाला विक्रीसाठी आणणारे शेतकरी गावातच अडकून पडले. मुसळधार पावसामुळे ते शहरापर्यंत पोहोचू शकले नाहीत. मुसळधार पावसानं संपर्क तुटलेल्या गावांपर्यंत महसूल विभागाचे अधिकारी देखील आज संध्याकाळपर्यंत पोहोचू शकलेले नव्हते,अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.