शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

By admin | Updated: May 19, 2014 03:22 IST

शिवसेनाप्रमुखांच्या स्वर्गवासानंतर लोकसभेची ही पहिलीच निवडणूक असल्याने तीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार होता.

नंदकुमार टेणी, ठाणे - शिवसेनाप्रमुखांच्या स्वर्गवासानंतर लोकसभेची ही पहिलीच निवडणूक असल्याने तीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार होता. जनता त्यावर शिक्कामोर्तब करते की त्यांना जनाधारापासून विन्मुख करते, त्याचप्रमाणे राज की उद्धव, या सामन्यात जनता कोणाच्या बाजूने उभी राहते, अशा प्रश्नांची उत्तरे ही निवडणूक देणार होती. निवडणुकीच्या निकालाने जनतेने उद्धव यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले तर राजविरुद्धच्या सामन्यातही विजयी केले. त्यामुळे उद्धव यांचा प्रभाव पक्षात आणि पक्षाबाहेरही वाढला. शरद पवार आणि अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले होते. आधी स्वत:चा पक्ष धड चालवा, मनोहर जोशी, मोहन रावले आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांचा मान राखा, पक्षाला लागलेली गळती रोखा, असे टोले हे काका-पुतणे उद्धव यांना लगावत होते. या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेची दुकानदारी संपुष्टात येईल, अशा वल्गनाही अजित पवार यांनी केल्या, तर पुतणे राज यांनी मृत्युशय्येवरील शिवसेनाप्रमुखांचा बटाटेवडा आणि चिकनचे सूप जाहीर सभेत उचकून काढले होते व औकात दाखवण्याची भाषा केली होती. तर उद्धव यांनी या सगळ्या प्रचाराला अत्यंत संयमी उत्तर दिले. शरद पवारांकडे स्वत:चे आहे काय? यांनी पक्ष काढला तो दोन्हीवेळा काँग्रेस फोडून. त्यांचे जे प्रमुख शिलेदार आहेत, ते कोण आहेत? गणेश नाईक, छगन भुजबळ, किरण पावसकर आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतल्या तिघांना इम्पोर्ट करून त्यांनी उमेदवार्‍या दिल्या आहेत. यांनी पुतण्या आणि मुलगी सोडली तर नेता म्हणून घडविले तरी कोणाला, असा सवाल उद्धव यांनी केला होता.