शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
3
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
4
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
5
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
6
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
7
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
8
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
9
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
10
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
11
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
12
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
13
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
14
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
15
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
16
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
17
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
18
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
19
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
20
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...

शासनाच्या योजनेत सोने गहाण ठेवू नये

By admin | Updated: December 26, 2015 01:10 IST

केंद्र शासनाने गोल्ड मोनेटाईजेशन स्कीम योजनेत राज्यातील सरकारीकरण झालेल्या सिद्धिविनायक मंदिराने ४० किलो सोने, तर शिर्डीतील साई संस्थानने तब्बल २०० किलो सोने गुंतवण्याचा

मुंबई : केंद्र शासनाने गोल्ड मोनेटाईजेशन स्कीम योजनेत राज्यातील सरकारीकरण झालेल्या सिद्धिविनायक मंदिराने ४० किलो सोने, तर शिर्डीतील साई संस्थानने तब्बल २०० किलो सोने गुंतवण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे देवनिधीचा अयोग्य वापर असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे. भक्तांनी अर्पण केलेले सोन्याचे अलंकार वितळवून त्याच्या सोन्याच्या विटा बनवणे, हा निर्णय भाविकांच्या श्रद्धेचे हनन करणारा असल्याचेही समितीचे म्हणणे आहे.मंदिरांतील सोने योजनेत देणार, ते वितळवण्याची प्रक्रिया शासन पैसे खर्च करून करणार आहे; मात्र त्यातून पैसा कसा निर्माण करणार, याची स्पष्टता नाही. दागिने वितळवल्यानंतर प्राचीन आणि दुर्मीळ दागिन्यांची खर्चीक घडण आणि मूळ किंमत नष्ट होईल. सरकार हे सोने परदेशी कंपन्यांना गहाण ठेवणार आणि त्यांच्याकडून पैसा घेणार की ते पैसे मोठ्या उद्योजकांना देणार, हे मंदिरांनी शासनाकडून स्पष्ट करून घ्यायला हवे, असे आवाहनही समितीने केले आहे. सर्वसाधारणत: बँकांमध्येही कर्ज देताना तारण म्हणून काहीतरी ठेवून घेतले जाते; पण मंदिरांतील इतक्या मोठ्या प्रमाणात सोने घेताना शासन तारण म्हणून काय देणार आहे? कारण जर उद्या शासन डबघाईला आले, सोने बुडाले तर त्याला कोण जबाबदार राहणार? योजनाधारकांचे सोने परत कसे करणार? याचा खुलासाही शासनाने करण्याची मागणी समितीने केली आहे. भक्तांचे मत विचारात घ्यासोन्याच्या भावात चढउतार होत असतात, काही काळानंतर हे सोने शासनाने मंदिरांना परत न करता, त्या जागी पैसे परत करण्याचा प्रस्ताव ठेवल्यास शासनाची विश्वासार्हता नष्ट होईल, तसेच एक प्रकारे मंदिरांना जबरदस्तीने सोने विकायला लावले, असा अर्थ निघेल. अशा देवनिधीशी संबंधित निर्णय घेण्यापूर्वी मंदिरांच्या सरकारी विश्वस्तांचे नव्हे, तर श्रद्धावान भक्तांचे मत घ्यावे, अशी समितीची मागणी आहे.