शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

१८ वर्षाखालील गोविंदाचा सहभाग नसावा - मुंबई उच्च न्यायालय

By admin | Updated: August 11, 2014 17:02 IST

सरावादरम्यान झालेल्या अपघातांची दखल घेत १८ वर्षाखालील गोविंदाला दहीहंडी उत्सवात सहभाग घेता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

ऑनलाइन टीम 
मुंबई, दि. ११ - सरावादरम्यान झालेल्या अपघातांची दखल घेत १८ वर्षाखालील गोविंदाला दहीहंडी उत्सवात सहभाग घेता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. दहीहंडी उत्सव आयोजकांना २० फूट उंचीपर्यंत थर लावण्यास मात्र न्यायालयाने परवानगी दिली आहे.  दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्य निर्णयाला आपण सर्वोच्च्‍ा न्यायालयात आव्हाण देणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. 
नवी मुंबईत दही हंही सरावादरम्यान एका १४ वर्षीय मुलाचा पडून मृत्यू झाल्याने गोविंदाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर सुनावणी करताना न्यायालयाने १८ वर्षाखालील गोविंदाच्या सहभागावर बंदी घातली आहे. त्याचबरोबर सहभागी होणा-या गोविंदाना हेल्मेट, सेल्फीबेल्टची सोय आयोजकांनी करावी, १८ खालील मुलांना सहभागी करून घेवू नये, असा आदेश न्यायालयाने आयोजकांना दिला आहे. दही हंडी उत्सवात अपघात झाल्यास त्यास आयोजक जबाबदार राहतील असे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, दहीहंडी उत्सव ही महाराष्ट्राची ओळख असून हा उत्सव जीवंत राहावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, अशी प्रतिक्रीया ठाण्यातील सुप्रसिध्द संघर्ष प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष्य जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तसेच मोटरसायकल चालवणं, क्रिकेट खेळणं, एवरेस्ट सारख्या गिर्यारोहणाच्या मोहीमा यामध्ये देखील दुर्देवी मृत्यू होतात असे आव्हाड म्हणाले.  दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात दही हंडी बाबत राज्य सरकारने मांडलेला प्रस्ताव उच्च न्यायालयाने मान्य केला आहे. 
- सहभागी होणा-या गोविंदाना वयाचा दाखला द्यावा लागणार
- काँक्रीट , डांबरी रस्ता गल्लीबोळात हंडी बांधण्यास परवानगी देवू नये.
- खुल्या मैदानात दही हंडीचे आयोजन करण्यात यावे. 
- कुशन वापरावे जेनेकरून पडलेल्या गोविंदाना दुखापत होणार नाही.
- जर हंडीत लहान मुंलाचा वापर केला तर आयोजकांवर पोक्सो अंतर्गत कारवाई करावी.
- उत्सव साजरा करणा-या मंडळांना नोंदणी बंधनकारक असायला हवी.
- मंडळाकडे पैसे येतात कुठून याबाबत धर्मादाय आयुक्तांना चौकशीचे अधिकार देण्यात आलेत.