शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

प्रशासनाकडून असहकार्य!

By admin | Updated: November 2, 2015 03:20 IST

वर्षभरात आपण वेगाने काम करण्याचा प्रयत्न केला; परंतु आता कुठे ७० टक्के वरिष्ठ अधिकारी सरकारचा अजेंडा राबवू लागले आहेत, तर कनिष्ठ पातळीवर फक्त ५० टक्के अधिकाऱ्यांचा ‘मार्इंडसेट’ तयार झाला आहे

नागपूर : वर्षभरात आपण वेगाने काम करण्याचा प्रयत्न केला; परंतु आता कुठे ७० टक्के वरिष्ठ अधिकारी सरकारचा अजेंडा राबवू लागले आहेत, तर कनिष्ठ पातळीवर फक्त ५० टक्के अधिकाऱ्यांचा ‘मार्इंडसेट’ तयार झाला आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय पातळीवर सरकारला १०० टक्के सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. यापुढे सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.सरकारच्या वर्षपूर्तीनंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी प्रशासनावर बोट ठेवल्याने येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात प्रशासकीय फेरबदल होऊ शकतात, असे मानले जात आहे. नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यकमात मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वर्षभरातील कार्यपूर्तीचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले, काम न करणारे, भ्रष्टाचारात अडकलेले ८०० अधिकारी-कर्मचारी वर्षभरात निलंबित करण्यात आले आहेत. ३०० जणांवर फौजदारी कारवाई तर सुमारे ५० जणांना बडतर्फ करण्यात आले आहे. भविष्यातही काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. पदोन्नतीचा प्राधान्यक्रम बदललाविदर्भात अधिकारी येण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे पदोन्नती देताना संबंधित अधिकाऱ्याला तीन वर्षांची पहिली पोस्टिंग विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण व शेवटी उत्तर महाराष्ट्र या क्रमाने मिळेल, अशी अट घालण्यात आली. प्रशासनातील ६० टक्के जागा रिक्त होत्या. त्या भरण्याचे काम सुरू आहे. पदभरतीसाठी प्रादेशिक निवड मंडळ नेमण्याचा विचार होता, पण त्यात कायदेशीर अडचणी आहेत. त्यावर लवकरच कायदेतज्ज्ञांचे मत घेतले जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीच्या आंदोलनांचा कुठलाही परिणाम सरकार व जनतेवर होत नाही, असे सांगत शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत, शत्रू नाहीत. विरोधकांनीही बोलाविलेल्या कार्यक्रमांना जाणे ही महाराष्ट्राची संस्कृती राहिली आहे. पवार यांना ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बारामती येथे आयोजित कृषी मेळाव्यास मला निमंत्रित केले आहे व मी जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.