शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

प्रशासनाकडून असहकार्य!

By admin | Updated: November 2, 2015 03:20 IST

वर्षभरात आपण वेगाने काम करण्याचा प्रयत्न केला; परंतु आता कुठे ७० टक्के वरिष्ठ अधिकारी सरकारचा अजेंडा राबवू लागले आहेत, तर कनिष्ठ पातळीवर फक्त ५० टक्के अधिकाऱ्यांचा ‘मार्इंडसेट’ तयार झाला आहे

नागपूर : वर्षभरात आपण वेगाने काम करण्याचा प्रयत्न केला; परंतु आता कुठे ७० टक्के वरिष्ठ अधिकारी सरकारचा अजेंडा राबवू लागले आहेत, तर कनिष्ठ पातळीवर फक्त ५० टक्के अधिकाऱ्यांचा ‘मार्इंडसेट’ तयार झाला आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय पातळीवर सरकारला १०० टक्के सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. यापुढे सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.सरकारच्या वर्षपूर्तीनंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी प्रशासनावर बोट ठेवल्याने येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात प्रशासकीय फेरबदल होऊ शकतात, असे मानले जात आहे. नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यकमात मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वर्षभरातील कार्यपूर्तीचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले, काम न करणारे, भ्रष्टाचारात अडकलेले ८०० अधिकारी-कर्मचारी वर्षभरात निलंबित करण्यात आले आहेत. ३०० जणांवर फौजदारी कारवाई तर सुमारे ५० जणांना बडतर्फ करण्यात आले आहे. भविष्यातही काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. पदोन्नतीचा प्राधान्यक्रम बदललाविदर्भात अधिकारी येण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे पदोन्नती देताना संबंधित अधिकाऱ्याला तीन वर्षांची पहिली पोस्टिंग विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण व शेवटी उत्तर महाराष्ट्र या क्रमाने मिळेल, अशी अट घालण्यात आली. प्रशासनातील ६० टक्के जागा रिक्त होत्या. त्या भरण्याचे काम सुरू आहे. पदभरतीसाठी प्रादेशिक निवड मंडळ नेमण्याचा विचार होता, पण त्यात कायदेशीर अडचणी आहेत. त्यावर लवकरच कायदेतज्ज्ञांचे मत घेतले जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीच्या आंदोलनांचा कुठलाही परिणाम सरकार व जनतेवर होत नाही, असे सांगत शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत, शत्रू नाहीत. विरोधकांनीही बोलाविलेल्या कार्यक्रमांना जाणे ही महाराष्ट्राची संस्कृती राहिली आहे. पवार यांना ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बारामती येथे आयोजित कृषी मेळाव्यास मला निमंत्रित केले आहे व मी जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.