शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पॅकेजच्या अनिश्चिततेने साखर कारखानदारांत अस्वस्थतता

By admin | Updated: September 2, 2015 23:24 IST

बिलाकडे शेतकऱ्यांचे लक्ष : जिल्ह्यातील २१ कारखान्यांकडे ३१ आॅगस्टअखेर ५१६ कोटी ४६ लाख ९६ हजार उस बील थकीत

प्रकाश पाटील - कोपार्डे  हंगाम २0१४-१५ मध्ये वाढलेली एफ. आर. पी. आणि कोसळलेले साखरेचे दर यामुळे आर्थिक संकटात साखर कारखाने आले आहेत. परिणामी, संपूर्ण हंगामात गाळप झालेल्या उसाची एफ.आर.पी.प्रमाणे द्यावयाची रक्कमही भागविण्याची कुवत कारखानदारात राहिली नाही. हंगामाच्या शेवटच्या काळातील गाळप झालेल्या उसाच्या बिलांपोटी कोल्हापूर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांकडे ५१६ कोटी ४६ लाख ९६ हजार ९७ रुपये थकबाकी आहे.हंगामी २0१४-१५ ची सुरुवात आक्टोबर २0१४ मध्ये झाली. यावेळी साखरेचा प्रतिक्विंटल दर ३१00 ते ३२00 रुपये होता. यात त्यानंतर सतत घसरण सुरू झाली. यामुळे साखर कारखान्यांना पैसे उपलब्ध करून देणाऱ्या राज्य सहकारी बँकेने प्रतिक्विंटल देण्यात येणाऱ्या उचलीमध्ये सातत्याने कपात करायला सुरुवात केली. याचा परिणाम एफ.आर.पी. देताना साखर कारखानदारांना मोठी आर्थिक कसरत करायला लागली.वाढलेली एफ.आर.पी. व घसरलेले साखरेचे दर यामुळे उत्पादन खर्चाचा ताळमेळ कारखानदारांना बसणे, त्यातच राज्य शासनाने जे साखर कारखाने एफ.आर.पी. देणार नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफ.आर.पी. दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांची एफ.आर.पी. २४00 ते २६५0 पर्यंत बसत असल्याने साखर कारखानदारांनी एफ.आर.पी. जाहीर केली. पण, ती देण्याची पद्धत बदलली.ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत एफ.आर.पी.प्रमाणे पैसे देण्याचे बंधन असताना पैशांची उपलब्धता होईल, तशी ती देण्याची सुरुवात केली. दोन महिन्यांचे गाळप करून उत्पादित झालेल्या साखर पोत्यांवर राज्य बँकेकडून मिळणाऱ्या उचलीतून शेतकऱ्यांची बिले अदा केली. राज्य शासनानेही कारखानदारांच्या आर्थिक अडचणी समजून घेऊन १४ दिवसांत एफ.आर.पी. देण्याचा कायदाही बासणात गुंडाळून ठेवला आहे.आता हंगाम २0१४ -१५ मधील फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यांत गाळप झालेल्या उसाची बिले हंगाम संपून सहा महिने झाले, तरी थकीत आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांकडे ५१६ कोटी ४६ लाख ९६ हजार ९७ रुपये थकीत आहेत. तर सांगली जिल्ह्यातील १४ कारखान्यांकडे ३२६ कोटी १७ लाख ३५ हजार ८६ अशी कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यांची मिळून ८४२ कोटी ६४ लाख ३३ हजार रुपये ३१ आॅगस्टअखेर थकीत असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.ज्या साखर कारखान्यांच्याकडे सहवीज प्रकल्प व डिस्टिलरी विभाग आहेत. त्या कारखान्यांनी काही प्रमाणात फेब्रुवारीपर्यंतची ऊस बिले दिली आहेत. आता शिल्लक थकीत ऊस बिलांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजबद्दल कारखान्यांनी प्रस्ताव दिले असले, तरी त्यावर कोणताच निर्णय न झाल्याने कारखानदारांत अस्वस्था पसरली आहे.एफ.आर.पी.प्रमाणे द्यावयाची रक्कमही भागविण्याची कुवत कारखानदारात राहिली नाहीज्या साखर कारखान्याकडे सहवीज प्रकल्प व डिस्टिलरी विभाग आहेत. त्या कारखान्यांनी काही प्रमाणात फेब्रुवारीपर्यंतची ऊस बिले दिली आहेत.