शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

पॅकेजच्या अनिश्चिततेने साखर कारखानदारांत अस्वस्थतता

By admin | Updated: September 2, 2015 23:24 IST

बिलाकडे शेतकऱ्यांचे लक्ष : जिल्ह्यातील २१ कारखान्यांकडे ३१ आॅगस्टअखेर ५१६ कोटी ४६ लाख ९६ हजार उस बील थकीत

प्रकाश पाटील - कोपार्डे  हंगाम २0१४-१५ मध्ये वाढलेली एफ. आर. पी. आणि कोसळलेले साखरेचे दर यामुळे आर्थिक संकटात साखर कारखाने आले आहेत. परिणामी, संपूर्ण हंगामात गाळप झालेल्या उसाची एफ.आर.पी.प्रमाणे द्यावयाची रक्कमही भागविण्याची कुवत कारखानदारात राहिली नाही. हंगामाच्या शेवटच्या काळातील गाळप झालेल्या उसाच्या बिलांपोटी कोल्हापूर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांकडे ५१६ कोटी ४६ लाख ९६ हजार ९७ रुपये थकबाकी आहे.हंगामी २0१४-१५ ची सुरुवात आक्टोबर २0१४ मध्ये झाली. यावेळी साखरेचा प्रतिक्विंटल दर ३१00 ते ३२00 रुपये होता. यात त्यानंतर सतत घसरण सुरू झाली. यामुळे साखर कारखान्यांना पैसे उपलब्ध करून देणाऱ्या राज्य सहकारी बँकेने प्रतिक्विंटल देण्यात येणाऱ्या उचलीमध्ये सातत्याने कपात करायला सुरुवात केली. याचा परिणाम एफ.आर.पी. देताना साखर कारखानदारांना मोठी आर्थिक कसरत करायला लागली.वाढलेली एफ.आर.पी. व घसरलेले साखरेचे दर यामुळे उत्पादन खर्चाचा ताळमेळ कारखानदारांना बसणे, त्यातच राज्य शासनाने जे साखर कारखाने एफ.आर.पी. देणार नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफ.आर.पी. दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांची एफ.आर.पी. २४00 ते २६५0 पर्यंत बसत असल्याने साखर कारखानदारांनी एफ.आर.पी. जाहीर केली. पण, ती देण्याची पद्धत बदलली.ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत एफ.आर.पी.प्रमाणे पैसे देण्याचे बंधन असताना पैशांची उपलब्धता होईल, तशी ती देण्याची सुरुवात केली. दोन महिन्यांचे गाळप करून उत्पादित झालेल्या साखर पोत्यांवर राज्य बँकेकडून मिळणाऱ्या उचलीतून शेतकऱ्यांची बिले अदा केली. राज्य शासनानेही कारखानदारांच्या आर्थिक अडचणी समजून घेऊन १४ दिवसांत एफ.आर.पी. देण्याचा कायदाही बासणात गुंडाळून ठेवला आहे.आता हंगाम २0१४ -१५ मधील फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यांत गाळप झालेल्या उसाची बिले हंगाम संपून सहा महिने झाले, तरी थकीत आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांकडे ५१६ कोटी ४६ लाख ९६ हजार ९७ रुपये थकीत आहेत. तर सांगली जिल्ह्यातील १४ कारखान्यांकडे ३२६ कोटी १७ लाख ३५ हजार ८६ अशी कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यांची मिळून ८४२ कोटी ६४ लाख ३३ हजार रुपये ३१ आॅगस्टअखेर थकीत असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.ज्या साखर कारखान्यांच्याकडे सहवीज प्रकल्प व डिस्टिलरी विभाग आहेत. त्या कारखान्यांनी काही प्रमाणात फेब्रुवारीपर्यंतची ऊस बिले दिली आहेत. आता शिल्लक थकीत ऊस बिलांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजबद्दल कारखान्यांनी प्रस्ताव दिले असले, तरी त्यावर कोणताच निर्णय न झाल्याने कारखानदारांत अस्वस्था पसरली आहे.एफ.आर.पी.प्रमाणे द्यावयाची रक्कमही भागविण्याची कुवत कारखानदारात राहिली नाहीज्या साखर कारखान्याकडे सहवीज प्रकल्प व डिस्टिलरी विभाग आहेत. त्या कारखान्यांनी काही प्रमाणात फेब्रुवारीपर्यंतची ऊस बिले दिली आहेत.