शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपामध्ये अस्वस्थता!

By admin | Updated: December 8, 2015 02:35 IST

विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून देवेंद्र फडणवीस सरकारवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजपामध्ये असलेली अस्वस्थता आज पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत लपून राहिली नाही

यदु जोशी, नागपूर विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून देवेंद्र फडणवीस सरकारवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजपामध्ये असलेली अस्वस्थता आज पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत लपून राहिली नाही. विरोधकांकडून हल्ले होत असताना आणि मित्र पक्ष शिवसेनेची भूमिका स्पष्ट नसताना सगळे घट्ट राहा, असा आदेश भाजपा आमदारांना आजच्या बैठकीत देण्यात आला. विधान भवनातील भाजपाच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांच्यासह सर्व मंत्री, आमदार उपस्थित होते. मित्र पक्ष शिवसेनेची भूमिका सरकारला सहकार्य करण्याची आहे की नाही, हे समजत नाही. ते प्रसंगी सरकारला अडचणीतदेखील आणू शकतात. अशा परिस्थितीत आपल्या आमदारांनी एकोप्याने राहिले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांनी केले. नागपूरचे अधिवेशन वादळीच होत असते. एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. सरकारवर हल्ला झाला तर समोरच्यांना बोलू न देता आपण आक्रमक व्हा, असे आवाहन खडसे यांनी केल्याचे समजते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर नाही तर डर कशाला? आम्ही कोणीही भ्रष्टाचार केलेला नाही. खोट्यानाट्या आरोपांचे भांडवल करायचे आणि आमची बदनामी करायची, हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा जुना धंदा आहे. मी आणि माझे ज्येष्ठ सहकारी मंत्री एकेका आरोपाचे मुद्देसूद उत्तर देऊन त्यांना उघडे पाडू. आम्ही त्यासाठी सक्षम आहोत, तुम्ही चिंता करू नका. विरोधी पक्षात असताना आमच्यापैकी ५० टक्के लोक बोलायचे आणि उरलेले ती भूमिका उचलून धरत आक्रमक व्हायचे. आता आपण सत्तेत आहोत. २० टक्के लोकांनी बोलायचे आणि ८० टक्क्यांनी त्याचे जोरदार समर्थन करायचे, असे चित्र सभागृहात दिसले पाहिजे. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. उपाययोजनांबाबत काही ठिकाणी नाराजीही आहे पण सरकार अनेक उपाययोजना करीत आहे पण तरीही त्या सभागृहाच्या माध्यमातून राज्याला सांगितल्या जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. तूरडाळीच्या कथित घोटाळ्यावरून विरोधकांचे लक्ष्य असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट म्हणाले की, तूरडाळ घोटाळा आधी दोन हजार कोटींचा, चार हजार कोटींचा आणि आता तर आठ हजार कोटींचा असल्याचे सांगितले जात आहे. एक पैशाचाही घोटाळा झालेला नाही, हे आपण सप्रमाण सिद्ध करू. प्रदेशाध्यक्ष दानवे, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही मार्गदर्शन केले. लूज टॉक मत करोभाजपाच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी, ‘मीडिया के सामने लूज टॉक मत करो,’ असा सल्ला आमदारांना दिला. सरकारबद्दल तुमची काही मते असतील तर ती पक्षात मांडा, बाहेर बोलण्याची गरज नाही. काही जण परस्पर मीडियाशी बोलतात आणि गैरसमज निर्माण होतात हे योग्य नाही, अशी कानउघाडणीही त्यांनी केली.