शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

मुंबईत सत्तांतराशिवाय विकास अशक्य- थरूर

By admin | Updated: January 31, 2017 02:18 IST

मुंबईकरांनी तब्बल चारवेळा मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेना आणि भाजपा युतीच्या हाती सोपविली. तरीही मुंबईचा विकास करण्यात युती अपयशी ठरली. त्यामुळे मुंबईच्या

मुंबई : मुंबईकरांनी तब्बल चारवेळा मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेना आणि भाजपा युतीच्या हाती सोपविली. तरीही मुंबईचा विकास करण्यात युती अपयशी ठरली. त्यामुळे मुंबईच्या विकासासाठी यंदा महापालिकेत सत्ता परिवर्तन आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केले. यावेळेस काँग्रेसला संधी देऊन बघा, मुंबईत बदल घडेल आणि मुंबईचा विकास होईल, असा दावाही त्यांनी केला. युतीच्या कारकीर्दीतील गैरकारभाराबाबत काँग्रेसने तयार केलेल्या आरोपपत्राचेही थरुर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना थरूर म्हणाले की, ‘वीस वर्षे सत्तेत राहूनही मुंबईकरांना सुखकर जीवन देण्यात शिवसेना, भाजपा साफ अयशस्वी ठरली. आता तर भाजपा नेते पारदर्शकतेच्या गप्पा मारत आहेत. प्रत्यक्षात पारदर्शकत कारभाराच्या आग्रहापोटी कॉंग्रेसने माहिती अधिकार कायदा आणला. पण, सत्तेवरील भाजपा सरकार माहिती अधिकारातही माहिती देत नाही. या सरकारला पंतप्रधानांची शिक्षणाची पदवी ते मुंबई महानगरपालिका यामध्ये कुठेही पारदर्शकता नको आहे, असा आरोप त्यांनी केला. पाच वर्षांपासून मुंबई महापालिकेचे लेखापरीक्षणच केले नाही. याचा आता मुंबईकरांनी जाब विचारायला हवा , असे थरूर म्हणाले. यावेळी, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनीही युतीच्या कारभारावर टीका केली. पालिकेतील सर्व भ्रष्टाचारात आणि घोटाळ्यात भाजपाचाही तितकाच सहभाग होता. स्थायी समितीत भाजपाने शिवसेनेला मदत केली, मंजुरी दिली आणि आता युती तुटल्यावर भाजपा शिवसेनेवर आरोपपत्र दाखल करतेय. मुख्यमंत्री म्हणतात पालिकेत भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचारात भाजपचाही सहभाग आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) - अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे भाजपा मंदिर बांधणार तरी कसे, निवडणुका आल्या की मतांसाठी राम मंदिराचा मुद्दा पुढे रेटण्यात येतो, असा आरोप शशी थरूर यांनी यावेळी केला.