शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

मुंबईत सत्तांतराशिवाय विकास अशक्य- थरूर

By admin | Updated: January 31, 2017 02:18 IST

मुंबईकरांनी तब्बल चारवेळा मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेना आणि भाजपा युतीच्या हाती सोपविली. तरीही मुंबईचा विकास करण्यात युती अपयशी ठरली. त्यामुळे मुंबईच्या

मुंबई : मुंबईकरांनी तब्बल चारवेळा मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेना आणि भाजपा युतीच्या हाती सोपविली. तरीही मुंबईचा विकास करण्यात युती अपयशी ठरली. त्यामुळे मुंबईच्या विकासासाठी यंदा महापालिकेत सत्ता परिवर्तन आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केले. यावेळेस काँग्रेसला संधी देऊन बघा, मुंबईत बदल घडेल आणि मुंबईचा विकास होईल, असा दावाही त्यांनी केला. युतीच्या कारकीर्दीतील गैरकारभाराबाबत काँग्रेसने तयार केलेल्या आरोपपत्राचेही थरुर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना थरूर म्हणाले की, ‘वीस वर्षे सत्तेत राहूनही मुंबईकरांना सुखकर जीवन देण्यात शिवसेना, भाजपा साफ अयशस्वी ठरली. आता तर भाजपा नेते पारदर्शकतेच्या गप्पा मारत आहेत. प्रत्यक्षात पारदर्शकत कारभाराच्या आग्रहापोटी कॉंग्रेसने माहिती अधिकार कायदा आणला. पण, सत्तेवरील भाजपा सरकार माहिती अधिकारातही माहिती देत नाही. या सरकारला पंतप्रधानांची शिक्षणाची पदवी ते मुंबई महानगरपालिका यामध्ये कुठेही पारदर्शकता नको आहे, असा आरोप त्यांनी केला. पाच वर्षांपासून मुंबई महापालिकेचे लेखापरीक्षणच केले नाही. याचा आता मुंबईकरांनी जाब विचारायला हवा , असे थरूर म्हणाले. यावेळी, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनीही युतीच्या कारभारावर टीका केली. पालिकेतील सर्व भ्रष्टाचारात आणि घोटाळ्यात भाजपाचाही तितकाच सहभाग होता. स्थायी समितीत भाजपाने शिवसेनेला मदत केली, मंजुरी दिली आणि आता युती तुटल्यावर भाजपा शिवसेनेवर आरोपपत्र दाखल करतेय. मुख्यमंत्री म्हणतात पालिकेत भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचारात भाजपचाही सहभाग आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) - अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे भाजपा मंदिर बांधणार तरी कसे, निवडणुका आल्या की मतांसाठी राम मंदिराचा मुद्दा पुढे रेटण्यात येतो, असा आरोप शशी थरूर यांनी यावेळी केला.