शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत सत्तांतराशिवाय विकास अशक्य- थरूर

By admin | Updated: January 31, 2017 02:18 IST

मुंबईकरांनी तब्बल चारवेळा मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेना आणि भाजपा युतीच्या हाती सोपविली. तरीही मुंबईचा विकास करण्यात युती अपयशी ठरली. त्यामुळे मुंबईच्या

मुंबई : मुंबईकरांनी तब्बल चारवेळा मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेना आणि भाजपा युतीच्या हाती सोपविली. तरीही मुंबईचा विकास करण्यात युती अपयशी ठरली. त्यामुळे मुंबईच्या विकासासाठी यंदा महापालिकेत सत्ता परिवर्तन आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केले. यावेळेस काँग्रेसला संधी देऊन बघा, मुंबईत बदल घडेल आणि मुंबईचा विकास होईल, असा दावाही त्यांनी केला. युतीच्या कारकीर्दीतील गैरकारभाराबाबत काँग्रेसने तयार केलेल्या आरोपपत्राचेही थरुर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना थरूर म्हणाले की, ‘वीस वर्षे सत्तेत राहूनही मुंबईकरांना सुखकर जीवन देण्यात शिवसेना, भाजपा साफ अयशस्वी ठरली. आता तर भाजपा नेते पारदर्शकतेच्या गप्पा मारत आहेत. प्रत्यक्षात पारदर्शकत कारभाराच्या आग्रहापोटी कॉंग्रेसने माहिती अधिकार कायदा आणला. पण, सत्तेवरील भाजपा सरकार माहिती अधिकारातही माहिती देत नाही. या सरकारला पंतप्रधानांची शिक्षणाची पदवी ते मुंबई महानगरपालिका यामध्ये कुठेही पारदर्शकता नको आहे, असा आरोप त्यांनी केला. पाच वर्षांपासून मुंबई महापालिकेचे लेखापरीक्षणच केले नाही. याचा आता मुंबईकरांनी जाब विचारायला हवा , असे थरूर म्हणाले. यावेळी, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनीही युतीच्या कारभारावर टीका केली. पालिकेतील सर्व भ्रष्टाचारात आणि घोटाळ्यात भाजपाचाही तितकाच सहभाग होता. स्थायी समितीत भाजपाने शिवसेनेला मदत केली, मंजुरी दिली आणि आता युती तुटल्यावर भाजपा शिवसेनेवर आरोपपत्र दाखल करतेय. मुख्यमंत्री म्हणतात पालिकेत भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचारात भाजपचाही सहभाग आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) - अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे भाजपा मंदिर बांधणार तरी कसे, निवडणुका आल्या की मतांसाठी राम मंदिराचा मुद्दा पुढे रेटण्यात येतो, असा आरोप शशी थरूर यांनी यावेळी केला.