शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

अनधिकृत नळजोडांनी पळविले पाणी

By admin | Updated: June 30, 2014 23:53 IST

शहरातील पाण्याची स्थिती गंभीर बनली असतानाच शहरात जेवढे अधिकृत नळजोड आहेत. तेवढेच अनधिकृत नळजोड आहेत.

पुणो : शहरातील पाण्याची स्थिती गंभीर बनली असतानाच शहरात जेवढे अधिकृत नळजोड आहेत. तेवढेच अनधिकृत नळजोड आहेत. विशेष म्हणजे या नळजोडांची माहिती असूनही केवळ राजकीय इच्छाशक्ती, अपुरे मनुष्यबळ आणि सुरक्षे अभावी या नळजोडांवर कारवाई करणो महापालिकेस शक्य झालेले नाही. या नळजोडांमध्ये अनेक लोकप्रतिनिधींनीही घेतलेल्या अनधिकृत नळजोडांचा समावेश असून त्यातील काही लोकप्रनिधींचींच्या घरात तर तब्बल डझनभर नळ जोड आहेत. त्यामुळे एकीकडे पालिका पाणीबचतीचा नारा देण्यासाठी आपला घसा कोरडा करीत असली तरी, दुसरीकडे मात्र, या अनधिकृत नळजोडांमुळे लाखो लिटर पाण्याची चोरी होत आहे. 
   शहरात सुमारे साडेसात लाख मिळकती आहेत. त्यातील सुमारे साडेपाच लाख रहिवासी मिळकती असून सव्वा लाख व्यावसायिक मिळकती आहेत. त्यातील सुमारे 1 लाख 20 हजार मिळकतींनाच नळजोड देण्यात आली असल्याची अधिकृत माहिती पालिका प्रशासनाकडे आहे तर तेवढेच अनधिकृत नळ शहरात असल्याची पालिकेची माहिती आहे. मात्र, या नळजोडांवर अद्याप कारवाई करण्याचे धाडस पालिका प्रशासनास झालेले नाही.(प्रतिनिधी)
 
मोटारीसाठी विशेष पथक 
पाणीकपातीच्या कालावधीत मोटारी लावून पाणी खेचणा:या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाच्या माध्यमातून संबंधित परिसरात आधी पाहणी करून त्यानंतर मोटारी वापणा:यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या अंतर्गत संबंधित नागरिकाची मोटार जप्त करण्यात येणार असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात येणार असल्याचे सूत्रंनी स्पष्ट केले.
 
कारवाईस गेल्यावर होते मारहाण 
अशा अनधिकृत नळजोडांवर कारवाई करण्यासाठीची मोहीम महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही वर्षापासून उन्हाळ्यात हाती घेण्यात येते. मात्र, कारवाईस गेलेल्या पालिकेच्या कर्मचा:यांना मारहाण झाल्याच्या घटना या पूर्वी घडलेल्या आहेत. तसेच, कारवाईस गेलेल्या कर्मचा:यांना अनेकदा लोकप्रतिनिधींच्या रोषासही सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे ही माहिती असूनही अनेकदा पालिका प्रशासन चुप्पी साधून असून, या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे.
 
कपातीच्या काळामध्ये शहरात समान पाणीपुरवठा
पुणो : कपातीच्या कालावधीत शहरातील प्रभागांमध्ये समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली असून, शहरात ज्या भागात  तांत्रिक कारणास्तव अथवा इतर कारणास्तव  24 तास अथवा सहा तासांपेक्षा अधिक पाणीपुरवठा होत आहे अशा भागांची माहिती संकलित करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. त्याबाबतच्या सूचना सर्व कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आल्या असून, त्याबाबत लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने प्रशासनाने शहरात एक वेळ पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्यापही शहराच्या काही भागांत तांत्रिक चुकांमुळे 24 तास, तसेच  जाणीवपूर्वक दबावापोटी सहा तासांपेक्षा अधिक पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे काही प्रभागात ओला दुष्काळ, तर काही प्रभागात कोरडय़ा दुष्काळाची स्थिती निर्माण होते. त्यामुळे कपातीच्या कालावधीत समान पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेकडून प्रभागांमध्ये होणा:या पाणीपुरवठय़ांची माहिती संकलित करण्यात येत असल्याची माहिती सूत्रंनी दिली.(प्रतिनिधी)