शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

अनधिकृत नळजोडांनी पळविले पाणी

By admin | Updated: June 30, 2014 23:53 IST

शहरातील पाण्याची स्थिती गंभीर बनली असतानाच शहरात जेवढे अधिकृत नळजोड आहेत. तेवढेच अनधिकृत नळजोड आहेत.

पुणो : शहरातील पाण्याची स्थिती गंभीर बनली असतानाच शहरात जेवढे अधिकृत नळजोड आहेत. तेवढेच अनधिकृत नळजोड आहेत. विशेष म्हणजे या नळजोडांची माहिती असूनही केवळ राजकीय इच्छाशक्ती, अपुरे मनुष्यबळ आणि सुरक्षे अभावी या नळजोडांवर कारवाई करणो महापालिकेस शक्य झालेले नाही. या नळजोडांमध्ये अनेक लोकप्रतिनिधींनीही घेतलेल्या अनधिकृत नळजोडांचा समावेश असून त्यातील काही लोकप्रनिधींचींच्या घरात तर तब्बल डझनभर नळ जोड आहेत. त्यामुळे एकीकडे पालिका पाणीबचतीचा नारा देण्यासाठी आपला घसा कोरडा करीत असली तरी, दुसरीकडे मात्र, या अनधिकृत नळजोडांमुळे लाखो लिटर पाण्याची चोरी होत आहे. 
   शहरात सुमारे साडेसात लाख मिळकती आहेत. त्यातील सुमारे साडेपाच लाख रहिवासी मिळकती असून सव्वा लाख व्यावसायिक मिळकती आहेत. त्यातील सुमारे 1 लाख 20 हजार मिळकतींनाच नळजोड देण्यात आली असल्याची अधिकृत माहिती पालिका प्रशासनाकडे आहे तर तेवढेच अनधिकृत नळ शहरात असल्याची पालिकेची माहिती आहे. मात्र, या नळजोडांवर अद्याप कारवाई करण्याचे धाडस पालिका प्रशासनास झालेले नाही.(प्रतिनिधी)
 
मोटारीसाठी विशेष पथक 
पाणीकपातीच्या कालावधीत मोटारी लावून पाणी खेचणा:या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाच्या माध्यमातून संबंधित परिसरात आधी पाहणी करून त्यानंतर मोटारी वापणा:यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या अंतर्गत संबंधित नागरिकाची मोटार जप्त करण्यात येणार असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात येणार असल्याचे सूत्रंनी स्पष्ट केले.
 
कारवाईस गेल्यावर होते मारहाण 
अशा अनधिकृत नळजोडांवर कारवाई करण्यासाठीची मोहीम महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही वर्षापासून उन्हाळ्यात हाती घेण्यात येते. मात्र, कारवाईस गेलेल्या पालिकेच्या कर्मचा:यांना मारहाण झाल्याच्या घटना या पूर्वी घडलेल्या आहेत. तसेच, कारवाईस गेलेल्या कर्मचा:यांना अनेकदा लोकप्रतिनिधींच्या रोषासही सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे ही माहिती असूनही अनेकदा पालिका प्रशासन चुप्पी साधून असून, या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे.
 
कपातीच्या काळामध्ये शहरात समान पाणीपुरवठा
पुणो : कपातीच्या कालावधीत शहरातील प्रभागांमध्ये समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली असून, शहरात ज्या भागात  तांत्रिक कारणास्तव अथवा इतर कारणास्तव  24 तास अथवा सहा तासांपेक्षा अधिक पाणीपुरवठा होत आहे अशा भागांची माहिती संकलित करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. त्याबाबतच्या सूचना सर्व कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आल्या असून, त्याबाबत लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने प्रशासनाने शहरात एक वेळ पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्यापही शहराच्या काही भागांत तांत्रिक चुकांमुळे 24 तास, तसेच  जाणीवपूर्वक दबावापोटी सहा तासांपेक्षा अधिक पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे काही प्रभागात ओला दुष्काळ, तर काही प्रभागात कोरडय़ा दुष्काळाची स्थिती निर्माण होते. त्यामुळे कपातीच्या कालावधीत समान पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेकडून प्रभागांमध्ये होणा:या पाणीपुरवठय़ांची माहिती संकलित करण्यात येत असल्याची माहिती सूत्रंनी दिली.(प्रतिनिधी)