शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

उमरोलीचा कचरा उल्हास नदीत

By admin | Updated: July 18, 2016 03:09 IST

उमरोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये दररोज जमा होणारा कचरा उल्हास नदीतील वावे नदीपात्रात टाकण्यात येत आहे.

कांता हाबळे,

नेरळ- कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये दररोज जमा होणारा कचरा उल्हास नदीतील वावे नदीपात्रात टाकण्यात येत आहे. त्यामुळे पाणी दूषित होत असून सरपंच, ग्रामसदस्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. उमरोली ग्रामपंचायत हद्दीत डिकसल, उमरोली, वावे, कोषाणे, पाली, पोतदार वसाहत ही गावे येत आहेत. सर्व गावांतील कचरा डंपिंग ग्राउंड अथवा गुरचरण जागेत टाकण्याऐवजी थेट घंटागाडीतून उल्हास नदीत टाकला जात आहे.त्यामुळे पाणी दूषित होत आहे. उल्हास नदीच्या पाण्यावर अनेक पाणी योजना कार्यरत असल्याने गावांमध्ये हे दूषित पाणी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोगराई, साथीचे आजार बळावण्याचा धोका असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नदीपात्रात कचरा टाकण्याचा प्रकार संतापजनक आहे. सरपंचांनी याबाबत त्वरित कारवाई करण्याची गरज आहे. हा कचरा डम्पिंग ग्राउंड अथवा गुरचरण जागेवर टाकण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याबाबत सरपंच मोनिका सालोखे यांच्याशी संपर्कसाधला असता संपर्क होऊ शकला नाही. तसेच उपसरपंच सोपान ठाणगे यांना विचारणा केली असता त्यांनी आम्ही कचरा नदीपात्रात न टाकता खड्ड्यात टाकत असल्याचे त्यांनी सांगितले.>नदीचे पाणी दूषितसर्व गावांतील कचरा डम्पिंग ग्राउंड अथवा गुरचरण जागेत टाकण्याऐवजी थेट घंटागाडीतून उल्हास नदीत टाकला जात आहे. त्यामुळे पाणी दूषित होत आहे. उल्हास नदीच्या पाण्यावर अनेक पाणी योजना कार्यरत असल्याने गावांमध्ये हे दूषित पाणी जाण्याची शक्यता आहे