शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

उमरोलीचा कचरा उल्हास नदीत

By admin | Updated: July 18, 2016 03:09 IST

उमरोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये दररोज जमा होणारा कचरा उल्हास नदीतील वावे नदीपात्रात टाकण्यात येत आहे.

कांता हाबळे,

नेरळ- कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये दररोज जमा होणारा कचरा उल्हास नदीतील वावे नदीपात्रात टाकण्यात येत आहे. त्यामुळे पाणी दूषित होत असून सरपंच, ग्रामसदस्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. उमरोली ग्रामपंचायत हद्दीत डिकसल, उमरोली, वावे, कोषाणे, पाली, पोतदार वसाहत ही गावे येत आहेत. सर्व गावांतील कचरा डंपिंग ग्राउंड अथवा गुरचरण जागेत टाकण्याऐवजी थेट घंटागाडीतून उल्हास नदीत टाकला जात आहे.त्यामुळे पाणी दूषित होत आहे. उल्हास नदीच्या पाण्यावर अनेक पाणी योजना कार्यरत असल्याने गावांमध्ये हे दूषित पाणी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोगराई, साथीचे आजार बळावण्याचा धोका असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नदीपात्रात कचरा टाकण्याचा प्रकार संतापजनक आहे. सरपंचांनी याबाबत त्वरित कारवाई करण्याची गरज आहे. हा कचरा डम्पिंग ग्राउंड अथवा गुरचरण जागेवर टाकण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याबाबत सरपंच मोनिका सालोखे यांच्याशी संपर्कसाधला असता संपर्क होऊ शकला नाही. तसेच उपसरपंच सोपान ठाणगे यांना विचारणा केली असता त्यांनी आम्ही कचरा नदीपात्रात न टाकता खड्ड्यात टाकत असल्याचे त्यांनी सांगितले.>नदीचे पाणी दूषितसर्व गावांतील कचरा डम्पिंग ग्राउंड अथवा गुरचरण जागेत टाकण्याऐवजी थेट घंटागाडीतून उल्हास नदीत टाकला जात आहे. त्यामुळे पाणी दूषित होत आहे. उल्हास नदीच्या पाण्यावर अनेक पाणी योजना कार्यरत असल्याने गावांमध्ये हे दूषित पाणी जाण्याची शक्यता आहे