शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदीची पातळी धोक्याबाहेर

By admin | Updated: August 4, 2016 02:22 IST

कर्जत तालुक्यात पावसाने सुरु ठेवलेला कहर पाहता मोठ्या प्रमाणात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे

कर्जत : कर्जत तालुक्यात पावसाने सुरु ठेवलेला कहर पाहता मोठ्या प्रमाणात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. मात्र मध्येच पाऊस विश्रांती घेत असल्याने महत्त्वाच्या उल्हास नदीची पाण्याची पातळी जरी वाढली असली तरी पुराच्या पाण्याचा कोणताही धोका नाही. तालुक्यातील संरक्षक कठडे नसलेल्या जामरु खजवळील चिल्लार नदीवर असलेल्या पुलाला मोठे झाड येऊन अडकून पडले आहे. दरम्यान, त्या झाडांमुळे पुलास कोणताही धोका पोहोचू नये म्हणून प्रशासनाने झाड बाजूला काढण्यासाठी त्वरित कर्मचारी लावल्याने ते झाड बाजूला करण्यात आले.कर्जत तालुक्यातील सर्वाधिक भागातून वाहणारी उल्हास नदीने पावसाळ्यात रौद्ररूप धारण केल्यास अर्ध्या तालुक्यात पुराचा धोका निर्माण होत असतो. यावेळी सतत पावसाची रिमझिम सुरु असताना देखील उल्हास नदीने एकदाही धोक्याची पातळी ओलांडली नाही. कारण पाऊस जसा पडत आहे, तसाच उघडीप देखील देत आहे. त्यामुळे आजच्या दिवसापर्यंत २00६ मि.ली. पाऊस होऊन देखील उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली नव्हती. तळकोकणात पावसाने कहर केलेला असताना कर्जतमध्ये आज सकाळपर्यंत ७२ मिली एवढा पाऊस झाला होता. त्यामुळे खंडाळा येथे उगम पावणारी उल्हास नदी पाषाण येताना ३५ किलोमीटर अंतरात कोणताही धोका पोहचला नाही. कर्जत येथे उल्हास नदी ४८ फूट उंची गाठल्यास धोकादायक पातळी ठरू शकते. बुधवारी सर्वत्र पावसाने हाहाकार माजविला असतांना उल्हास नदीची पाण्याची पातळी ४३ फूट एवढी होती. त्यामुळे उल्हास नदीला कोणताही धोका नसल्याची माहिती तहसील कार्यालयाने दिली.दुसरीकडे सतत सुरु असलेल्या पावसामुळे जामरु ख परिसरातून वाहणाऱ्या चिल्लार नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. तेथील रजपे, पाचखडकवाडी आणि धनगरवाडा भागात राहणाऱ्या लोकांसाठी पिंपरकरवाडा येथील क्षणभर विश्रांती या हॉटेलजवळ असलेल्या लहान पुलाला एक मोठे झाड अडकले आहे. त्या झाडाला जोरदार लाटा येऊन धडकत असतात. त्यामुळे आधीच कमकुवत असलेला, संरक्षक कठडे नसलेला हा पूल झाडांमुळे कोसळू शकतो. ही भीती लक्षात घेता या भागातील कार्यकर्ते प्रमोद पिंगळे यांनी कर्जत तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांना कळविले. त्यानंतर प्रशासनाने ते झाड बाजूला करण्यासाठी कर्मचारी पाठवून देण्यात आले. त्या सर्व कामगारांनी पुलाला अडकलेले झाड बाजूला करण्यास सुरु वात केली. (वार्ताहर)पावसामुळे जामरु ख परिसरातून वाहणाऱ्या चिल्लार नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. तेथील रजपे, पाचखडकवाडी आणि धनगरवाडा भागात राहणाऱ्या लोकांसाठी पिंपरकरवाडा येथील क्षणभर विश्रांती या हॉटेलजवळ असलेल्या लहान पुलाला एक मोठे झाड अडकले आहे. त्या झाडाला जोरदार लाटा येऊन धडकत आहेत.कर्जतमध्ये बुधवारी सकाळपर्यंत ७२ मिली एवढा पाऊस झाला होता. त्यामुळे खंडाळा येथे उगम पावणारी उल्हास नदी पाषाणे येथे खाली ठाणे जिल्ह्यात प्रवेश करीत असताना ३५ किलोमीटर अंतरात कोणताही धोका पोहचला नाही. नदीने ४८ फुटाची उंची गाठल्यास पुराचा धोका आहे.