शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदीची पातळी धोक्याबाहेर

By admin | Updated: August 4, 2016 02:22 IST

कर्जत तालुक्यात पावसाने सुरु ठेवलेला कहर पाहता मोठ्या प्रमाणात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे

कर्जत : कर्जत तालुक्यात पावसाने सुरु ठेवलेला कहर पाहता मोठ्या प्रमाणात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. मात्र मध्येच पाऊस विश्रांती घेत असल्याने महत्त्वाच्या उल्हास नदीची पाण्याची पातळी जरी वाढली असली तरी पुराच्या पाण्याचा कोणताही धोका नाही. तालुक्यातील संरक्षक कठडे नसलेल्या जामरु खजवळील चिल्लार नदीवर असलेल्या पुलाला मोठे झाड येऊन अडकून पडले आहे. दरम्यान, त्या झाडांमुळे पुलास कोणताही धोका पोहोचू नये म्हणून प्रशासनाने झाड बाजूला काढण्यासाठी त्वरित कर्मचारी लावल्याने ते झाड बाजूला करण्यात आले.कर्जत तालुक्यातील सर्वाधिक भागातून वाहणारी उल्हास नदीने पावसाळ्यात रौद्ररूप धारण केल्यास अर्ध्या तालुक्यात पुराचा धोका निर्माण होत असतो. यावेळी सतत पावसाची रिमझिम सुरु असताना देखील उल्हास नदीने एकदाही धोक्याची पातळी ओलांडली नाही. कारण पाऊस जसा पडत आहे, तसाच उघडीप देखील देत आहे. त्यामुळे आजच्या दिवसापर्यंत २00६ मि.ली. पाऊस होऊन देखील उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली नव्हती. तळकोकणात पावसाने कहर केलेला असताना कर्जतमध्ये आज सकाळपर्यंत ७२ मिली एवढा पाऊस झाला होता. त्यामुळे खंडाळा येथे उगम पावणारी उल्हास नदी पाषाण येताना ३५ किलोमीटर अंतरात कोणताही धोका पोहचला नाही. कर्जत येथे उल्हास नदी ४८ फूट उंची गाठल्यास धोकादायक पातळी ठरू शकते. बुधवारी सर्वत्र पावसाने हाहाकार माजविला असतांना उल्हास नदीची पाण्याची पातळी ४३ फूट एवढी होती. त्यामुळे उल्हास नदीला कोणताही धोका नसल्याची माहिती तहसील कार्यालयाने दिली.दुसरीकडे सतत सुरु असलेल्या पावसामुळे जामरु ख परिसरातून वाहणाऱ्या चिल्लार नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. तेथील रजपे, पाचखडकवाडी आणि धनगरवाडा भागात राहणाऱ्या लोकांसाठी पिंपरकरवाडा येथील क्षणभर विश्रांती या हॉटेलजवळ असलेल्या लहान पुलाला एक मोठे झाड अडकले आहे. त्या झाडाला जोरदार लाटा येऊन धडकत असतात. त्यामुळे आधीच कमकुवत असलेला, संरक्षक कठडे नसलेला हा पूल झाडांमुळे कोसळू शकतो. ही भीती लक्षात घेता या भागातील कार्यकर्ते प्रमोद पिंगळे यांनी कर्जत तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांना कळविले. त्यानंतर प्रशासनाने ते झाड बाजूला करण्यासाठी कर्मचारी पाठवून देण्यात आले. त्या सर्व कामगारांनी पुलाला अडकलेले झाड बाजूला करण्यास सुरु वात केली. (वार्ताहर)पावसामुळे जामरु ख परिसरातून वाहणाऱ्या चिल्लार नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. तेथील रजपे, पाचखडकवाडी आणि धनगरवाडा भागात राहणाऱ्या लोकांसाठी पिंपरकरवाडा येथील क्षणभर विश्रांती या हॉटेलजवळ असलेल्या लहान पुलाला एक मोठे झाड अडकले आहे. त्या झाडाला जोरदार लाटा येऊन धडकत आहेत.कर्जतमध्ये बुधवारी सकाळपर्यंत ७२ मिली एवढा पाऊस झाला होता. त्यामुळे खंडाळा येथे उगम पावणारी उल्हास नदी पाषाणे येथे खाली ठाणे जिल्ह्यात प्रवेश करीत असताना ३५ किलोमीटर अंतरात कोणताही धोका पोहचला नाही. नदीने ४८ फुटाची उंची गाठल्यास पुराचा धोका आहे.