शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

उल्हास नदीची पातळी धोक्याबाहेर

By admin | Updated: August 4, 2016 02:22 IST

कर्जत तालुक्यात पावसाने सुरु ठेवलेला कहर पाहता मोठ्या प्रमाणात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे

कर्जत : कर्जत तालुक्यात पावसाने सुरु ठेवलेला कहर पाहता मोठ्या प्रमाणात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. मात्र मध्येच पाऊस विश्रांती घेत असल्याने महत्त्वाच्या उल्हास नदीची पाण्याची पातळी जरी वाढली असली तरी पुराच्या पाण्याचा कोणताही धोका नाही. तालुक्यातील संरक्षक कठडे नसलेल्या जामरु खजवळील चिल्लार नदीवर असलेल्या पुलाला मोठे झाड येऊन अडकून पडले आहे. दरम्यान, त्या झाडांमुळे पुलास कोणताही धोका पोहोचू नये म्हणून प्रशासनाने झाड बाजूला काढण्यासाठी त्वरित कर्मचारी लावल्याने ते झाड बाजूला करण्यात आले.कर्जत तालुक्यातील सर्वाधिक भागातून वाहणारी उल्हास नदीने पावसाळ्यात रौद्ररूप धारण केल्यास अर्ध्या तालुक्यात पुराचा धोका निर्माण होत असतो. यावेळी सतत पावसाची रिमझिम सुरु असताना देखील उल्हास नदीने एकदाही धोक्याची पातळी ओलांडली नाही. कारण पाऊस जसा पडत आहे, तसाच उघडीप देखील देत आहे. त्यामुळे आजच्या दिवसापर्यंत २00६ मि.ली. पाऊस होऊन देखील उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली नव्हती. तळकोकणात पावसाने कहर केलेला असताना कर्जतमध्ये आज सकाळपर्यंत ७२ मिली एवढा पाऊस झाला होता. त्यामुळे खंडाळा येथे उगम पावणारी उल्हास नदी पाषाण येताना ३५ किलोमीटर अंतरात कोणताही धोका पोहचला नाही. कर्जत येथे उल्हास नदी ४८ फूट उंची गाठल्यास धोकादायक पातळी ठरू शकते. बुधवारी सर्वत्र पावसाने हाहाकार माजविला असतांना उल्हास नदीची पाण्याची पातळी ४३ फूट एवढी होती. त्यामुळे उल्हास नदीला कोणताही धोका नसल्याची माहिती तहसील कार्यालयाने दिली.दुसरीकडे सतत सुरु असलेल्या पावसामुळे जामरु ख परिसरातून वाहणाऱ्या चिल्लार नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. तेथील रजपे, पाचखडकवाडी आणि धनगरवाडा भागात राहणाऱ्या लोकांसाठी पिंपरकरवाडा येथील क्षणभर विश्रांती या हॉटेलजवळ असलेल्या लहान पुलाला एक मोठे झाड अडकले आहे. त्या झाडाला जोरदार लाटा येऊन धडकत असतात. त्यामुळे आधीच कमकुवत असलेला, संरक्षक कठडे नसलेला हा पूल झाडांमुळे कोसळू शकतो. ही भीती लक्षात घेता या भागातील कार्यकर्ते प्रमोद पिंगळे यांनी कर्जत तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांना कळविले. त्यानंतर प्रशासनाने ते झाड बाजूला करण्यासाठी कर्मचारी पाठवून देण्यात आले. त्या सर्व कामगारांनी पुलाला अडकलेले झाड बाजूला करण्यास सुरु वात केली. (वार्ताहर)पावसामुळे जामरु ख परिसरातून वाहणाऱ्या चिल्लार नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. तेथील रजपे, पाचखडकवाडी आणि धनगरवाडा भागात राहणाऱ्या लोकांसाठी पिंपरकरवाडा येथील क्षणभर विश्रांती या हॉटेलजवळ असलेल्या लहान पुलाला एक मोठे झाड अडकले आहे. त्या झाडाला जोरदार लाटा येऊन धडकत आहेत.कर्जतमध्ये बुधवारी सकाळपर्यंत ७२ मिली एवढा पाऊस झाला होता. त्यामुळे खंडाळा येथे उगम पावणारी उल्हास नदी पाषाणे येथे खाली ठाणे जिल्ह्यात प्रवेश करीत असताना ३५ किलोमीटर अंतरात कोणताही धोका पोहचला नाही. नदीने ४८ फुटाची उंची गाठल्यास पुराचा धोका आहे.