शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

उजनी धरणाची पातळी घटली, पाण्यात बुडालेल्या पुरातन मंदिरांचे अवशेष पाण्याबाहेर

By admin | Updated: April 24, 2016 20:25 IST

यंदा उजनी धरणातील पाणीपातळी खालावल्याने धरण निर्मितीवेळी पाण्यात बुडालेल्या पुरातन मंदिरांचे अवशेष पाण्याबाहेर उघडे पडले असून, पुरातन मंदिरांचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.

ऑनलाइन लोकमत
सोलापूर/करमाळा, दि. २४ - यंदा उजनी धरणातील पाणीपातळी खालावल्याने धरण निर्मितीवेळी पाण्यात बुडालेल्या पुरातन मंदिरांचे अवशेष पाण्याबाहेर उघडे पडले असून, पुरातन मंदिरांचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. धरण निर्मितीच्यावेळी गावं उठवली, मंदिरे तशीच ठेवली गेली, ती मंदिरे, पूल, वाडे उजनीच्या पाण्यात लपली. पण आता पाणी कमी झाल्याने उठलेली गावं, मंदिरे आणि त्याची शिखरे पाणी कमी झाल्ंयाने बाहेर येऊन खुणावू लागली आहेत.
 
उजनी धरणात करमाळा तालुक्यातील वांगी, चिखलठाण, कंदर, कुगाव, पारेवाडी, केत्तूर, पोमलवाडी, बिटरगाव, सांगवी, ढोकरी, टाकळी, कोंढारचिंचोली ही २८ गावे पाण्याखाली बुडाली. हजारो एकर शेतजमीन, मोठमोठे वाडे, मंदिरे पाण्यात बुडाली. त्या सर्व गावांचे धरण निर्मितीनंतर नवीन जागेत पुनर्वसन झाले आहे.
उजनी धरणाची पाणीपातळी यंदा कमालीची खालावली आहे, त्यामुळे करमाळा तालुक्यातील वांगी, पोमलवाडी, केत्तूर, कुगाव या जुन्या गावठाणातील जुने वाडे, मंदिरे पाण्याच्या बाहेर खुणावू लागले आहेत.
 
वांगी हद्दीतील जुन्या गावठाणातील सिद्धेश्वर, लक्ष्मी, खंडोबा व नागनाथ या चार मंदिराचे अवशेष पाण्याबाहेर उघडे पडले आहेत. उघडे पडलेले मंदिर पूर्वी कसे होते हे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत.पोमलवाडी-केत्तूर भागातील ब्रिटिशकालीन जुना पूलही पाणी कमी झाल्याने उघडा पडला आहे. 
 
उजनी धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने वांगी गावच्या जुन्या गावठाणातील सिद्धेश्वर, खंडोबा, लक्ष्मी, नागनाथ ही चार मंदिरे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. मंदिरांचे हेमाडपंथी बांधकाम असल्याने आजही ह्यजैसे थेह्ण बांधकामाचे अवशेष आहेत. विशेष आकर्षण ठरलेल्या या बांधकामाचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटक होड्या घेऊन पाहणी करू लागले आहेत.
- सतीश चोपडे, ग्रामस्थ, वांगी
 
 
उजनी धरणातील पाण्याची पातळी खालवली आहे, धरणाची निर्मीती झाल्यापासून ही पहिलीच वेळ आहे. यावरुन आपल्याला दुष्काळाचे भीषण चित्र दिसत आहे.
 
 
 
पाण्याची पातळी खालवल्यामुळे उजणा धरणाच्या कडेचा परिसर अतिशय सुंदर दिसत आहे. याचा फायदा घेत नागराज मुंजळे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटातील बरेचं, शुटींग केले आहे.