शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

युजीसीच्या शिष्यवृत्तींमध्ये घसघशीत वाढ

By admin | Updated: December 21, 2014 01:40 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोळा प्रकारच्या शिष्यवृत्तींमध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाने जवळपास ५० टक्कयांनी वाढ केली आहे.

वाशिम : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोळा प्रकारच्या शिष्यवृत्तींमध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाने जवळपास ५० टक्कयांनी वाढ केली आहे. डिसेंबरपासून याची अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) निवृत्त विद्वान प्राध्यापक, बेरोजगार महिला, डॉ. राधाकृष्णन मानवता व सामाजिक शास्त्र आणि भाषा, स्वामी विवेकानंद समाजशास्त्र आदी प्रकारच्या शिष्यवृत्तींचा यामध्ये समावेश आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने या शिष्यवृत्तींमध्ये यंदापासून घसघशीत वाढ केली आहे. याचा फायदा उच्च शिक्षण घेणाऱ्या गुणवंत तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना होणार आहे. निवृत्त झालेल्या विद्वान प्राध्यापकांचा शैक्षणीक क्षेत्रात उपयोग करुन घेण्याच्या उद्देशाने त्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती दरमहा वीस हजारावरुन एकतीस हजार रुपये करण्यात आली आहे. बेरोजगार महिलांची शिष्यवृत्ती २५ हजार रूपयांवरून ३८,८०० रूपये करण्यात आली आहे. डॉ. राधाकृष्णन मानवता व सामाजिक शास्त्र आणि भाषा या विषयांसाठी देण्यात येणारी २५ हजार रूपयांची शिष्यवृत्ती आता ३८ हजार ८०० रूपये करण्यात आली आहे. स्वामी विवेकानंद एकुलत्या मुलीसाठी सजामशास्त्र विषयासाठी देण्यात येणारी ८ हजार रूपयांची शिष्यवृत्ती १२ हजार ४०० रुपये, विज्ञान मानवता, सामाज शास्त्र शिष्यवृत्ती १६ हजार रूपयांवरून २५ हजार रुपये, परदेशी विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी १२ हजार रूपयांची शिष्यवृत्ती १८ हजार ६०० रूपये, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर व्यावसायीक शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती पाच हजार रूपयांवरून सात हजार ८०० रुपये, गेट, जीपॅट पात्र विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान, अभियांत्रीकी आणि औषध निर्माण शाखेच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी देण्यात येणारी ८ हजार रूपयांची शिष्यवृत्ती आता १२ हजार ४०० रुपये करण्यात आली आहे. इंदिरा गांधी शिष्यवृत्ती मध्येही ११०० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ही शिष्यवृत्ती दरमहा दोन हजार रूपये होती. आता तीन हजार शंभर रूपये करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)च्पूर्वी ही शिष्यवृत्ती दरमहा दोन हजार रूपये होती. आता तीन हजार शंभर रूपये करण्यात आली आहे. वाढीव शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी डिसेंबर, महिन्यापासून सुरू झाली असुन राज्यातील सर्व विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. शिष्यवृत्तींमध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाने जवळपास ५० टक्कयांनी वाढ केली आहे.