शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘घालोनिया भार राहिलो निश्चिंती..!’

By admin | Updated: June 5, 2016 00:30 IST

श्रीक्षेत्र कोथळी (मुक्ताईनगर जि. जळगाव) येथे मंगळवारी संत मुक्ताई मंदिर जीर्णोधार सोहळ्यात नाथाभाऊंनी सर्व सोडून मुक्ताई चरणी येण्याची तयारी दर्शविली होती. त्यांनी जेव्हा ‘घालोनिया भार राहिलो

- नंदकिशोर पाटील, मुंबई

श्रीक्षेत्र कोथळी (मुक्ताईनगर जि. जळगाव) येथे मंगळवारी संत मुक्ताई मंदिर जीर्णोधार सोहळ्यात नाथाभाऊंनी सर्व सोडून मुक्ताई चरणी येण्याची तयारी दर्शविली होती. त्यांनी जेव्हा ‘घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निरविली संती विठोबाची’ या संतोक्तीचा उच्चार केला, तेव्हाच खरे तर ते पायउतार होणार हे निश्चित झाले होते. संकटसमयीच माणूस देवाचा धावा करत असतो. नाथाभाऊंनी तेच केले. चहूबाजूंनी आरोपांच्या फैरी सुटल्यानंतर ते आजवर कमावलेली सर्व ‘माया’ ते मुक्ताई चरणी अर्पण करायला निघाले!गेली चाळीस वर्षे राजकारणात असलेल्या खडसेंनी जळगाव जिल्ह्यात जे पेरले तेच उगवले. सुडाचे राजकारण करत त्यांनी आपल्या विरोधकांना कसे नामोहरण केले, याची अनेक उदहारणे जिल्ह्यात आहेत. सत्तेवर आल्यानंतर अनेकांच्या संपत्तीत वाढ होते, पण विरोधी पक्षात असताना मालामाल झालेले खडसे हे एकमेव उदहारण असेल. खडसे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेला १९८९ ते २०१४ पर्यंतचा तपशील बघितला, तर कोणाचेही डोळे विस्फारतील. संत एकनाथांनी म्हटल्याप्रमाणे, ‘लक्ष्मी चतुर्भूज झाली, प्रसाद देऊनिया गेली’ तद्वत लक्ष्मीच्या हव्यासापायी खडसेंना आज पायउतार व्हावे लागले. पुण्यातील जमिनीचे प्रकरण समोर आल्यानंतर, त्यांनी ज्या निर्ढावलेपणाने त्याचे खंडण केले ते पाहता, त्यांना स्वत:वर आणि पक्षावर जरा अतीच विश्वास होता, असे वाटते. भोसरी एमआयडीसीतील जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना, परपस्पर संबंधित जमीन मालकाशी सौदा करून कोट्यवधी रुपयांची जमीन स्वत:च्या कुटुंबीयांच्या नावे खरेदी केली. वास्तविक, या जमिनीच्या सातबाऱ्यावर एमआयडीसीचा उल्लेख असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी हा व्यवहार केला. शिवाय, मंत्री म्हणून असलेल्या न्यायिक अधिकाराचा गैरवापर करून त्यांनी घेतलेल्या ‘शपथे’चाही भंग केला. मंत्रिपदाची शपथ घेताना ‘मी माझ्या अख्यत्यारितील माहितीचा परोक्ष अथवा अपरोक्ष, स्वत:च्या वा कुटुंबाच्या फायद्यासाठी वापर करणार नाही,’ असे सर्वांसमक्ष जाहीर करावे लागते. खडसेंनी नेमके उलटे कले. हे प्रकरण ‘आॅफिस आॅफ प्रॉफिट’ या प्रकारात मोडते. त्यामुळे इतर आरोप सिद्ध नाही झाले, तरी भोसरीच्या जमिनीत खडसेंचा पाय खोलवर रुतलेला आहे, हे नक्की. कदाचित, मुख्यमंत्र्यांना याची कल्पना आली असावी, म्हणूनच त्यांनी तातडीने दिल्ली गाठून पक्षश्रेष्ठींच्या कानावर सर्व बाबी घातल्या, अन्यथा एरवी त्यांनी खडसेंची पाठराखण केली असती.राजकारणातील अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवलेल्या नाथाभाऊ संकटाच्या काळात एकटे पडलेले दिसले. सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या चार-सहा महिन्यांत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे चिक्की प्रकरण बाहेर आले, तेव्हा पंकजाच्या बचावासाठी खडसेंच पुढे आले. नंतर विनोद तावडे यांच्यावर आरोप झाले तेव्हाही सुधीर मुनगंटीवर, चंद्रकात पाटील यांना सोबत घेऊन खडसेंनीच पाठराखण केली, पण जेव्हा स्वत: खडसेंवर ही वेळ आली, तेव्हा त्यांच्या बचावासाठी एकटे रावसाहेब दानवे सोडले, तर कोणीही पुढे आले नाही. यावरून पक्षात आणि मंत्रिमंडळात खडसेंविषयी काय मत आहे, हे दिसून येते. मंत्रिमंडळात गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांशी खडसे यांचे खटके उडत असल्याची चर्चा होती. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याचा निर्णय त्यांनी परपस्पर जाहीर केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती, पण ‘ज्येष्ठ’त्त्वाच्या जोरावर खडसे कोणालाच जुमानायला तयार नव्हते. मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या खडसेंना डावलून राज्यमंत्री पदाचाही अनुभव नसलेल्या देवेंद्र फडणवीस यांना मोदी-शहा यांनी मुख्यमंत्री पदी बसविले, तेव्हाच खरे तर खडसेंनी बदललेल्या वाऱ्याची दिशा ओळखायला हवी होती. महसूल, कृषीसह ११ खात्यांचा पदभार आल्यानंतर ऐटीत आलेल्या नाथाभाऊंना राजकारणातील या त्सुनामीचा अंदाजच आला नाही. पर्ससन जाळ्यातून मच्छीमारांची सुटका करताना, स्वत: तेच अलगद जाळ्यात अडकले!राजीनामा देताना खडसे यांनी मोठा नैतिकतेचा आव आणला असला, तरी सहजासहजी मंत्रिपद सोडणाऱ्यांपैकी ते नाहीत. तसे असते तर आरोप झाला त्याच दिवशी त्यांनी लालदिव्याची गाडी सरकारजमा केली असती, पण गेले दहा दिवस त्यांनी मंत्रिपद वाचविण्यासाठी सर्व आयुधे वापरली. ज्येष्ठतेचा आणि उत्तर महाराष्ट्रातील राजकीय ताकदीचा धाक दाखवून पाहिला, पण पक्षाच्या दृष्टीने आजवर ‘असेट’ असलेले खडसे या प्रकरणांमुळे एकदम ‘लायबिलेटी’ बनल्यामुळे अखेर त्यांच्या गळ्यात घंटा बाधण्याचा निर्णय घेण्याशिवाय पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नव्हता.