शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

शेतकरी आत्महत्येवरुन उद्धव यांची फडणवीस सरकारवर टीका

By admin | Updated: August 30, 2016 09:03 IST

राज्य आणि केंद्रात सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरुन फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३० - राज्य आणि केंद्रात सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरुन फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. धाराशीव जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य वनमाला चंद्रकांत गायकवाड या महिलेने सावकारी जाचाला कंटाळून विष प्राशन करुन जीवन संपवले. 
 
धाराशीवच्या वनमालेच्या मृत्यूनंतर तरी कर्जबाजारी शेतकर्‍यांची तडफड सरकारला दिसणार आहे का? आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडणार आहे का? असे सवाल उद्धव यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून विचारले आहेत. 
 
सावकारीविरोधात नवे कायदे निर्माण होऊनही जे घडू नये ते घडतेच आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात रोज तीन शेतकरी आत्महत्या करीत असल्याची माहिती धक्कादायक आहे. गेल्या सातेक महिन्यांत राज्यातील या भागात १ हजार ४०४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. हे आकडे नव्या राजवटीतील असतील तर जुन्या राजवटीपेक्षा नव्या सरदारांचे वेगळेपण ते काय? अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे. 
 
काय आहेत अग्रलेखातील मुद्दे 
 
- कर्ज, दुष्काळ, पिकांचे नुकसान आणि भरपाईच्या नावाने तोंडास पाने पुसणे हीच शेतकरी आत्महत्येची कारणे दोन वर्षांपूर्वी होती. आजही त्याच कारणांची पाने फडफडत आहेत व शेतकर्‍यांचे प्राण त्यामुळे तडफडत आहेत. भाटशिरपुरा येथील वनमालेची तडफड याच दुष्टचक्रामुळे होत होती. धाराशीवच्या वनमालेच्या मृत्यूनंतर तरी कर्जबाजारी शेतकर्‍यांची तडफड सरकारला दिसणार आहे का? आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडणार आहे का? 
 
- सावकारांना कोपरापासून फोडून काढण्याची गर्जना ‘माजी’ राज्यकर्त्यांनी केली होती. ती गर्जना हवेत विरली, पण खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांना नव्या राजवटीतही न्याय मिळेल काय, हा प्रश्‍नच आहे. हे प्रमाण मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक आहे. 
 
- ग्रामपंचायत सदस्य वनमाला चंद्रकांत गायकवाड या महिलेने सावकारी जाचाला कंटाळून विष प्राशन केले व जीवनाची यात्रा संपवली. जमीन हडप करून सावकार पुन्हा पैशांचाही तगादा लावत असल्याचा आरोप वनमालेच्या नातेवाईकांनी केला. हे सत्य असेल तर नव्या राजवटीने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सावकारीविरोधात नवे कायदे निर्माण होऊनही जे घडू नये ते घडतेच आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात रोज तीन शेतकरी आत्महत्या करीत असल्याची माहिती धक्कादायक आहे. गेल्या सातेक महिन्यांत राज्यातील या भागात १ हजार ४०४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. हे आकडे नव्या राजवटीतील असतील तर जुन्या राजवटीपेक्षा नव्या सरदारांचे वेगळेपण ते काय? कर्ज, दुष्काळ, पिकांचे नुकसान आणि भरपाईच्या नावाने तोंडास पाने पुसणे हीच शेतकरी आत्महत्येची कारणे दोन वर्षांपूर्वी होती. आजही त्याच कारणांची पाने फडफडत आहेत व शेतकर्‍यांचे प्राण त्यामुळे तडफडत आहेत. ही तडफड सरकार आणि प्रशासनातील कारभार्‍यांना दिसत आहे का? दिसत असलीच तर ती थांबवावी असे त्यांना वाटत आहे का? राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे असे असंख्य प्रश्‍न आहेत. त्यांचे उत्तर नव्या राजवटीत अद्याप तरी मिळालेले नाही असेच भाटशिरपुरा येथील आत्महत्या प्रकरणावरून दिसते. 
 
- कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे हे सत्र या पद्धतीने सुरूच आहे त्यात भाटशिरपुरा येथील वनमाला गायकवाड यांच्या आत्महत्येची आता भर पडली. मागील दोन दिवसांत जालना आणि नांदेड जिल्ह्यांतदेखील कर्ज परतफेडीच्या विवंचनेतून दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी आत्महत्यांचे हे दुष्टचक्र थांबणार कधी? हे दुष्टचक्र थांबावे म्हणूनच राज्यातील जनतेने सत्तांतर घडविले. जुन्यांना सत्तेवरून घालवून नव्यांना सत्तापदी बसविले. मात्र तरीही शेतकर्‍यांच्या मानेभोवती असलेला सावकारी पाश आहे तसाच आहे. दुष्काळ, नापिकी आणि अवकाळी पावसाने होणारे नुकसान ही ‘अस्मानी’ असली तरी सावकारीच्या ‘सुलतानी’चे काय? त्याविरुद्ध सरकारचे कायदे, नियम असले तरी पळवाटांची ‘चलाखी’ वापरून सावकारीची सुलतानी सुरूच आहे. कर्तासवरता गमावलेली शेतकरी कुटुंबे या हलाखी आणि चलाखीच्या दुष्टचक्रात अडकून पडली आहेत. भाटशिरपुरा येथील वनमालेची तडफड याच दुष्टचक्रामुळे होत होती. राज्यातील हजारो कर्जबाजारी शेतकर्‍यांची आज वनमालाप्रमाणेच तडफड सुरू आहे. धाराशीवच्या वनमालेच्या मृत्यूनंतर तरी कर्जबाजारी शेतकर्‍यांची तडफड सरकारला दिसणार आहे का? आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडणार आहे का?