शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

‘उद्धव ठाकरे यांनीच माफी मागायला हवी’

By admin | Updated: September 29, 2016 02:52 IST

आपल्याच मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्राबाबत उद्धव ठाकरे माफी मागणार नाहीत, तर काय ‘सामना’चा शिपाई मागणार का, असा सवाल करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे

ठाणे : आपल्याच मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्राबाबत उद्धव ठाकरे माफी मागणार नाहीत, तर काय ‘सामना’चा शिपाई मागणार का, असा सवाल करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. ठाण्यातील सत्ताधारी पैशांसाठी सैराट झाले आहेत. प्रत्येकटेंडरची रक्कम ‘मातोश्री’वर जाते. त्यामुळेच त्यांना इथले नेते प्रिय झाले आहेत, असा आरोपही राणे यांनी काँग्रेसच्या मेळाव्यात केला. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा एखादा जरी हल्ला झाला, तरी ते पंतप्रधानांची चेष्टा करत असत. आता ते पंतप्रधान असताना, त्यांचे हात आणि तोंड कोणी पकडले आहेत? आता ते का गोळ्या चालवत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी विचारला. काँग्रेसच्या पंतप्रधानांनी देशाला महासत्तेचा मार्ग दाखवला. पण मोदी देशाच्या जवानांना शहीद होण्याचा मार्ग दाखवत आहेत, अशी टीका करत त्यांनी मोदींना टार्गेट केले. राज्यातील सरकार हाताबाहेर गेले आहे. त्यामुळे विकास ठप्प आहे. म्हणून जनता नाराज असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपची लाट किनाऱ्यावर फुटली आहे. आता काँग्रेसची लाट उसळत असल्याने कामाला लागा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. (प्रतिनिधी)मराठा आरक्षणासाठी पूर्ण अहवाल मांडा!मराठा आरक्षण समितीचा अध्यक्ष असताना भाजपचे तावडे यांनी निवेदन दिले, पण शिवसेनेचे एकही निवेदन आले नव्हते. आरक्षणाबाबत राणे समितीचा पूर्ण अहवाल सरकारने न्यायालयापुढे सादर केला नाही. अहवालातील सर्व मुद्दे आता तरी न्यायालयात सादर करावेत आणि चांगला वकील द्यावा, असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला.