शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

शेतक-यांच्या आत्महत्येवरुन उद्धव ठाकरेंनी टोचले फडणवीस सरकारचे कान

By admin | Updated: January 30, 2015 09:29 IST

राज्यात सरकार बदलले असले तरी विदर्भातील शेतक-यांच्या जीवनात फरक पडल्याचे दिसत नाही अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३० - राज्यात सरकार बदलले असले तरी विदर्भातील शेतक-यांच्या जीवनात फरक पडल्याचे दिसत नाही. विदर्भात शेतक-यांच्या आत्महत्या सुरु असून हे चित्र विदारक आहे अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

विदर्भात एकाच दिवशी पाच शेतक-यांनी कर्ज, नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. शुक्रवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी शेतक-यांच्या आत्महत्येवरुन फडणवीस सरकारचे कान टोचले. मुख्यमंत्री फडणवीस दावोस येथे उद्योग परिषदेत देशाचे नेतृत्व करत असतानाच विदर्भातील शेतक-यांनी आत्महत्या करुन जीवन संपवावे हे भयंकर असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात नवीन सरकार सत्तेत आल्यावर कर्ज, नापिकी आणि दुष्काळामुळे आत्महत्या करणा-या शेतक-यांचे प्रमाण कमी होईल अशी आशा होती. मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. आत्महत्या करणा-या शेतक-यांकडे मोबाईल फोनही नव्हते. त्यामुळे मोबाईल फोनची बिलं भरता पण कर्जाचे हफ्ते फेडत नाही असे या शेतक-यांना विचारता येणार असा टोमणाही ठाकरे यांनी भाजपा नेत्यांना लगावला. मुख्यमंत्री, अर्थमंत्री हे विदर्भातीलच असताना शेतकरी आत्महत्या करतो हे नवीन सरकारला शोभते का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.