शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

कश्मीरप्रश्‍नी गाढवही गेले व ब्रह्मचर्यही गेले असे घडू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

By admin | Updated: August 11, 2016 08:23 IST

पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षासोबत सत्तेत भागीदार असणा-या भाजपाने वेळीच सावरायला हवे, नाहीतर कश्मीरप्रश्‍नी गाढवही गेले व ब्रह्मचर्यही गेले असे घडू नये असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 11 - दहशतवादी बु-हान वानीला हुतात्मा म्हणणारे पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचा नेते मुश्ताक अहमद शाह यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. सोबतच त्यांच्यासोबत सत्तेत भागीदार असणा-या आपल्या मित्रपक्ष भाजपालाही 'वेळीच सावरायला हवे. नाहीतर कश्मीरप्रश्‍नी गाढवही गेले व ब्रह्मचर्यही गेले असे घडू नये', असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
 
‘हिजबुल मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या बुरहान वाणी हा दहशतवादी नव्हे तर हुतात्मा होता, असे अकलेचे चाँदतारे सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचा नेता मुश्ताक अहमद शाह यांनी तोडले आहेत. हे महाशय ‘पीडीपी’चे आमदारदेखील आहेत व भाजप त्यांचा सत्तेतील भागीदार, म्हणजे पार्टनरदेखील आहे. म्हणजे जम्मू-कश्मीरची सत्ता ही भाजपसाठी गळ्यातल्या हाडकासारखी अडकली की काय, असे वाटू लागले आहे असा टोमणा उद्धव ठाकरेंनी मारला आहे.
 
पीडीपीच्या आमदारांनी मारलेली ही नवी बांग म्हणजे नवे संकट ठरू नये म्हणजे झाले. बुरहान वाणी यास जे लोक हुतात्मा मानत आहेत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची हिंमत सरकारमध्ये आहे काय? बुरहान वाणीसारख्या अतिरेक्यांना ‘हीरो’ बनवू नका, असे पंतप्रधान मोदी तळमळीने सांगतात. त्याच वेळी भाजपचे कश्मीरातील ‘पार्टनर’ अतिरेक्यांना हीरो आणि हुतात्मा ठरवत आहेत असं उद्वव ठाकरे बोलले आहेत.
 
पीडीपी आमदारांचे म्हणणे असे की, ‘‘वाणी यांच्या महान आणि पवित्र व्यक्तिमत्त्वामुळे लोकांनी त्यांना प्रेम दिले.’’ म्हणजे ज्याला हिंदुस्थानद्रोही म्हणून आमच्या सैनिकांनी ‘अल्ला’सदनी पाठवले तो आता पवित्र आत्मा ठरवला जात आहे! बुरहान वाणी हा पवित्र आत्मा असेल तर मग कश्मीर खोर्‍यात शहीद होणार्‍या जवानांच्या आत्म्यांना काय म्हणावे बरे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
 
बुरहान वाणीच्या हत्येचा निषेध म्हणून पाकिस्तानात ‘काळा दिवस’ पाळण्यात आला. त्या बुरहानची तुलना क्रांतिकारक, हुतात्मा, पवित्र आत्म्याशी ‘पीडीपी’वाले करतात हे भयंकर आहे. पीडीपी आमदार मुश्ताक अहमद शाह यांनी जी मुक्ताफळे उधळली ती भाजपास मंजूर आहेत काय, हे एकदा देशाला कळू द्या. अफझल गुरूस हुतात्मा ठरवणार्‍यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार! भाजपने वेळीच सावरायला हवे. नाहीतर कश्मीरप्रश्‍नी गाढवही गेले व ब्रह्मचर्यही गेले असे घडू नये. प्रश्‍न राष्ट्रीय सुरक्षेचा व अखंडतेचा आहे म्हणून आम्ही हे पाल्हाळ लावले असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.