शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

कश्मीरप्रश्‍नी गाढवही गेले व ब्रह्मचर्यही गेले असे घडू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

By admin | Updated: August 11, 2016 08:23 IST

पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षासोबत सत्तेत भागीदार असणा-या भाजपाने वेळीच सावरायला हवे, नाहीतर कश्मीरप्रश्‍नी गाढवही गेले व ब्रह्मचर्यही गेले असे घडू नये असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 11 - दहशतवादी बु-हान वानीला हुतात्मा म्हणणारे पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचा नेते मुश्ताक अहमद शाह यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. सोबतच त्यांच्यासोबत सत्तेत भागीदार असणा-या आपल्या मित्रपक्ष भाजपालाही 'वेळीच सावरायला हवे. नाहीतर कश्मीरप्रश्‍नी गाढवही गेले व ब्रह्मचर्यही गेले असे घडू नये', असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
 
‘हिजबुल मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या बुरहान वाणी हा दहशतवादी नव्हे तर हुतात्मा होता, असे अकलेचे चाँदतारे सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचा नेता मुश्ताक अहमद शाह यांनी तोडले आहेत. हे महाशय ‘पीडीपी’चे आमदारदेखील आहेत व भाजप त्यांचा सत्तेतील भागीदार, म्हणजे पार्टनरदेखील आहे. म्हणजे जम्मू-कश्मीरची सत्ता ही भाजपसाठी गळ्यातल्या हाडकासारखी अडकली की काय, असे वाटू लागले आहे असा टोमणा उद्धव ठाकरेंनी मारला आहे.
 
पीडीपीच्या आमदारांनी मारलेली ही नवी बांग म्हणजे नवे संकट ठरू नये म्हणजे झाले. बुरहान वाणी यास जे लोक हुतात्मा मानत आहेत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची हिंमत सरकारमध्ये आहे काय? बुरहान वाणीसारख्या अतिरेक्यांना ‘हीरो’ बनवू नका, असे पंतप्रधान मोदी तळमळीने सांगतात. त्याच वेळी भाजपचे कश्मीरातील ‘पार्टनर’ अतिरेक्यांना हीरो आणि हुतात्मा ठरवत आहेत असं उद्वव ठाकरे बोलले आहेत.
 
पीडीपी आमदारांचे म्हणणे असे की, ‘‘वाणी यांच्या महान आणि पवित्र व्यक्तिमत्त्वामुळे लोकांनी त्यांना प्रेम दिले.’’ म्हणजे ज्याला हिंदुस्थानद्रोही म्हणून आमच्या सैनिकांनी ‘अल्ला’सदनी पाठवले तो आता पवित्र आत्मा ठरवला जात आहे! बुरहान वाणी हा पवित्र आत्मा असेल तर मग कश्मीर खोर्‍यात शहीद होणार्‍या जवानांच्या आत्म्यांना काय म्हणावे बरे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
 
बुरहान वाणीच्या हत्येचा निषेध म्हणून पाकिस्तानात ‘काळा दिवस’ पाळण्यात आला. त्या बुरहानची तुलना क्रांतिकारक, हुतात्मा, पवित्र आत्म्याशी ‘पीडीपी’वाले करतात हे भयंकर आहे. पीडीपी आमदार मुश्ताक अहमद शाह यांनी जी मुक्ताफळे उधळली ती भाजपास मंजूर आहेत काय, हे एकदा देशाला कळू द्या. अफझल गुरूस हुतात्मा ठरवणार्‍यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार! भाजपने वेळीच सावरायला हवे. नाहीतर कश्मीरप्रश्‍नी गाढवही गेले व ब्रह्मचर्यही गेले असे घडू नये. प्रश्‍न राष्ट्रीय सुरक्षेचा व अखंडतेचा आहे म्हणून आम्ही हे पाल्हाळ लावले असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.