शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीची हॅटट्रिक

By admin | Updated: August 29, 2016 05:00 IST

स्पर्धा म्हटले की विक्रम, विश्वविक्रम आलेच. ठाणे महापौर मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने एका अनोख्या विक्रमाची नोंद या वर्षीही झाली.

पंकज रोडेकर ,  ठाणे स्पर्धा म्हटले की विक्रम, विश्वविक्रम आलेच. ठाणे महापौर मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने एका अनोख्या विक्रमाची नोंद या वर्षीही झाली. सलग तीन वर्षे निमंत्रण असूनही शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनुपस्थित राहण्याची हॅट्ट्रिक करत हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. त्यामुळे उद्घाटन आणि पारितोषिक वितरण सोहळ्यावेळी हजर असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले. मुंबईपाठोपाठ ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे पक्षातर्फे वारंवार सांगितले जाते. त्यामुळे येथील प्रमुख कार्यक्रमांना पक्षप्रमुखांना बोलवण्याचा, त्यांनी हजर राहण्याचा रिवाज आहे. महापालिकेच्या महापौर मॅरेथॉन स्पर्धेला तितकाच मान आहे. त्यासाठी राज्यातून स्पर्धक येतात. पालिका निवडणुकांमुळे यंदाच्या मॅरेथॉन स्पर्धेला राजकारणाचे कोंदण होते. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दहीहंडीच्या माध्यमामधून निवडणुकांचे रणशिंग फुंकले. राष्ट्रवादीने ३१ आॅॅगस्टच्या गडकरी रंगायतनातील मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे. शिवसेनेने मॅरेथॉनमध्ये अन्य पक्षांच्या नेत्यांना प्रवेशही दिला नाही. त्यामुळेच उद्घाटनाला किंवा पारितोषिक वितरण सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनी यावे, यासाठी पक्षाने जोरदार तयारी केली होती. त्यातच, २६ वर्षांपासून सातत्याने मॅरेथॉन आयोजित करणारी ठाणे ही भारतातील एकमेव महापालिका म्हणून नोंदवली गेली. त्याच वेळी पक्षप्रमुखांनी सलग तिसऱ्यांदा अनुपस्थित राहून नवा विक्रम प्रस्थापित केला. मात्र, यामुळे निमंत्रितांमध्ये नाराजी आहे.वाहतुकीचे तीनतेरा :मॅरेथॉनचे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवले होते. पण त्याची माहिती वाहनचालकांपर्यंत पोचली नाही. तसे फलकही लावलेले नव्हते. त्यामुळे कॅसल मिल येथे वाहतुकीचा मोठा गोंधळ पाहायला मिळाला. ही वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलीस हैराण झाले. मुले धावत आली की वाहतूक थांबविणे आणि पळत पुढे गेली की वाहने सोडणे असा खेळ सुरू होता. चपला मागे, मुले गेली पुढे : १२ व १५ वर्षांखालील मुले पळायला लागली खरी, परंतु त्यांच्या चपला मागे राहिल्या आणि ते पुढे निघून गेले. थोडे पुढे गेल्यावर पुन्हा चपलांसाठी त्यांना धावत मागे यावे लागले. त्यामुळे पुढे जाता न आल्यामुळे अनेक स्पर्धकांचा चेहरा रडवेला झाला. मुले हरवली, पालक सैरभैरस्पर्धेत सहभागी झालेली १२ व १५ वर्षांखालील मुले सापडत नसल्याने पालक घाबरले होते आणि पालक सापडत नसल्यानेमुले धास्तावली होती. आयोजक सुरूवातीला याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पालकांचा संताप अनावर झाला आणि व्यासपीठावर येऊन त्यांनी याचा राग भलत्याच लोकांवर काढला. कोणाची बहिण, कोणचा भाऊ, कोणाची मुलगा-मुलगी मिळत नसल्याने नातलग रडकुंडीला आले होते. मुले मिळत नसल्याने पालक सैरभैर असतानाच आयोजक मात्र पारितोषिक वितरणाची लगीनघाई करीत होते. मुले हरविल्याचे संबंधितांनी त्यांच्या शिक्षकांना फोन करुन कळवल्यावर शिक्षकांनी तर कानावर हात ठेवले. ‘आम्ही घरी पोहोचलोय. तसे पालकांना कळवा,’ असा निरोप ते आयोजकांतर्फे केलेल्या फोनवर देत होते. मुलांसाठीचा स्पर्धेचा मार्ग शिक्षकांनी पालकांना न सांगितल्याचा हा परिणाम होता. पालक एकीकडे शोधत होते आणि मुले दुसरीकडे पोचली होती. त्यामुळे बराचकाळ पालक सैरभैर, मुले हरवलेली आणि ज्यांच्यावर जबाबदारी ते शाळेचे शिक्षक मात्र घरी असा अनुभव आयोजकांच्या वाट्याला आला. १५ वर्षांखालील मुलांची स्पर्धा कॅसल मिल येथे संपणार होती. याबाबत पालक अनभिज्ञ होते. महापालिकेने तसे शाळेला कळविले होते, पण शिक्षकांनी कोणतीही माहिती दिली नसल्याचे पालकांनी सांगितले. स्पधेच्या सांगतेचे ठिकाणच माहित नसल्याने पालकांनी महापालिकेजवळ गोंधळ घातला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कॅसल मिलचे ठिकाण कळवल्यावर पालक तेथे धावत सुटले.