शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी लढा सुरूच ठेवणार- उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 7, 2017 21:35 IST

कोणी काहीही म्हणाले तरी सत्तेत असल्यामुळे शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी मी माझ्याच मार्गाने जाणार, असे स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 7 - कोणी काहीही म्हणाले तरी सत्तेत असल्यामुळे शेतक-यांच्या प्रश्नासाठी मी माझ्याच मार्गाने जाणार, असे स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते आज औरंगाबादेत पत्रकारांशी बोलत होते. या पत्रकार परिषदेला खा.चंद्रकांत खैरे, पालकमंत्री रामदास कदम, शहराध्यक्ष बंडू ओक, यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठवाड्यातून पक्ष बांधणीसाठी आणि शेतक-यांच्या प्रश्नावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी ठाकरे औरंगाबादेत आले होते. सरकारने शेतक-यांचा अंत पाहू नये, शेतक-यांना कर्जमुक्त करा, अशा आशयाच्या आपल्या सरकारला मागण्या आहेत, असे ते म्हणाले.शेतक-यांच्या हितासाठी अधिवेशन काळात कर्जमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. पण अद्याप त्यांनी तसे कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे ते म्हणाले. पण शेतकरी कर्जमुक्त होणारच ही संकल्पना आपण राबवणार असल्याचे यावेळी ठाकरे म्हणाले. सरकारमधून बाहेर पडण्यासाठी मी आज औरंगाबादेत आलो नसून मराठवाड्यातल्या लाखो शेतक-यांना अद्यापही कर्ज मिळाले नसल्याची खंत ठाकरेंनी व्यक्त केली. सत्तेकडून शेतक-यांना न्याय मिळतो की, नाही हेतपासून आपण पुढचे पाऊल उचलणार असल्याचे ते म्हणाले.समृद्धी महामार्ग प्रकरणात जर शेतक-यांच्या जमिनी जात असतील तर आपण शेतक-यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू आणि सरकारला जाब विचारू, असे शेवटी ठाकरे म्हणाले. जीएसटीबाबत शिवसेना ठाम असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले,  स्थानिक स्वराज्य संस्था एक घटक आहे. त्यांना कर गोळा करण्याचा अधिकार दिला होता तो आता काढला आहे. सर्व शहरांना एकाच तराजूत तोलू नये. प्रत्येक शहराची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. जकातीच्या बाबतीत त्यातील जाचाला विरोध होताच. मुंबईमध्ये रोजचा जकात रोख गोळा व्हायचा. त्याचा हिस्सा बजेटमध्ये मोठा होता. जीएसटी आल्यावर राज्य सरकार, केंद्र शासनाकडे आशाळभूत नजरेने पाहावे लागणार आहे. दरमहा, दरवर्षी जकातीत १ टक्का वाढ व्हायची, ती झालेली नाही. पुढे परालंबित्वता येईल. मुंबई मनपाची साडेतीन हजार कोटींची थकबाकी शासनाकडे आहे. थकबाकी आल्यानंतर जीएसटीबाबत विचार करू. प्रत्येक शहराची स्वायतत्ता कायम ठेवा. ब-याच वर्षांनंतर देशात आणि महाराष्ट्रात सत्तांतर झाले. देशाला हिंदुत्वत्वादी राष्ट्र करायचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर देशाला कणखर राष्ट्रपती पाहिजे. त्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव योग्यच वाटते, असे सेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. देशात अनेक राज्यात राज्यपाल आरआरएसचे कार्यकर्ते झालेले आहेत. माजी कृषिमंत्री शरद पवार राष्ट्रपती होऊ शकतात. असे खा. संजय राऊत म्हणाले होते. याचे स्पष्टीकरण देताना ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांनी त्यांना गुरू मानले आहे. खा. राऊत यांचा तो शाब्दिक वाद होता. परंतु शिवसेनेची भूमिका मोहन भागवतांसोबत आहेत. भागवत यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी योग्य आहे.