शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

उध्दव ठाकरे येत्या शनिवारी तीन दिवसांच्या गोवा भेटीवर

By admin | Updated: October 12, 2016 17:29 IST

शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे येत्या शनिवारी १५ रोजी तीन दिवसांच्या गोवा भेटीवर येत असून राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोवा सुरक्षा मंच

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि.12 - शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे येत्या शनिवारी १५ रोजी तीन दिवसांच्या गोवा भेटीवर येत असून राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोवा सुरक्षा मंच पक्षाशी जागावांटपाबाबत चर्चा करतील तसेच पर्वरी येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यातही मार्गदर्शन करतील. 
सेनेचे राज्यप्रमुख सुदिप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शनिवारी दुपारी ४.३0 वाजता त्यांचे खाजगी चार्टर विमानाने दाबोळी विमानतळावर आगमन होईल. सेनेचे खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख जीवन कामत, सहसंपर्क प्रमुख नामदेव भगत, सहसंपर्क प्रमुख आदेश परब त्यांचे विमानतळावर स्वागत करतील. तेथून त्यांचे आगमन बांबोळी येथे ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. सायंकाळी शिवसेनेच्या राज्य पदाधिका-यांची ते बैठक घेतील. 
रविवारी १६ रोजी सकाळी १0.३0 वाजता पर्वरी येथे संत गाडगे महाराज सभागृहात ते शिवसैनिकांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करतील.  त्यानंतर दुपारी ३ ते ४ या वेळेत भाभासुमंचे नेते सुभाष वेलिंगकर यांच्याबरोबर त्यांची आगामी निवडणुकीसाठी जागावांटबाबाबत बोलणी होईल. दुपारी ४ ते ७ या वेळेत शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांशी ते चर्चा करतील. 
सोमवारी १७ रोजी दुपारी १२ वाजता ग्रॅण्ड हयातमध्ये ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार असून आगामी निवडणुकीसाठी सेनेची रणनीती ते जाहीर करतील. सायंकाळी ५ वाजता ते मुंबईकडे रवाना होतील. 
दरम्यान, शिवसेनेकडे २0 मतदारसंघांमध्ये उमेदवार तयार असल्याचा दावा ताम्हणकर यांनी केला. भाभासुमंचे अर्थात गोवा सुरक्षा मंच पक्षाचे उमेदवार प्रबळ असतील तेथे शिवसेना आग्रह धरणार नाही. माध्यम प्रश्नाबरोबरच भ्रष्टाचार निर्मूलन, कसिनोंना विरोध, प्रादेशिक आराखडा, नोकर भरती हे धगधगते विषय सेनेचे प्रचाराचे मुद्दे असतील, असे त्यांनी सांगितले. 
 
मडगांव-काणकोण मार्गाच्या राष्ट्रीयीकरणास विरोध 
ताम्हणकर हे गोव्यातील खाजगी बसमालक संघटनेचेही सरचिटणीस आहेत. मडगांव-काणकोण मार्गाचे राष्ट्रीयीकरण करुन तेथे कदंबचीच सेवा देण्याच्या सरकारच्या हालचालींना त्यांनी तीव्र विरोध केला असून अखेरच्या रक्ताच्या थेंबापर्यंत हे होऊ देणार नाही, असा इशारा दिलेला आहे. प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण करु, असे ताम्हणकर म्हणाले. सध्या तीन मार्गांच्या राष्ट्रीयीकरणानंतर जी गैरसोय सरकारने करुन ठेवली आहे तिचा कटू अनुभव प्रवासी घेत आहेत.