शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

उध्दव ठाकरे येत्या शनिवारी तीन दिवसांच्या गोवा भेटीवर

By admin | Updated: October 12, 2016 17:29 IST

शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे येत्या शनिवारी १५ रोजी तीन दिवसांच्या गोवा भेटीवर येत असून राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोवा सुरक्षा मंच

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि.12 - शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे येत्या शनिवारी १५ रोजी तीन दिवसांच्या गोवा भेटीवर येत असून राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोवा सुरक्षा मंच पक्षाशी जागावांटपाबाबत चर्चा करतील तसेच पर्वरी येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यातही मार्गदर्शन करतील. 
सेनेचे राज्यप्रमुख सुदिप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शनिवारी दुपारी ४.३0 वाजता त्यांचे खाजगी चार्टर विमानाने दाबोळी विमानतळावर आगमन होईल. सेनेचे खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख जीवन कामत, सहसंपर्क प्रमुख नामदेव भगत, सहसंपर्क प्रमुख आदेश परब त्यांचे विमानतळावर स्वागत करतील. तेथून त्यांचे आगमन बांबोळी येथे ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. सायंकाळी शिवसेनेच्या राज्य पदाधिका-यांची ते बैठक घेतील. 
रविवारी १६ रोजी सकाळी १0.३0 वाजता पर्वरी येथे संत गाडगे महाराज सभागृहात ते शिवसैनिकांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करतील.  त्यानंतर दुपारी ३ ते ४ या वेळेत भाभासुमंचे नेते सुभाष वेलिंगकर यांच्याबरोबर त्यांची आगामी निवडणुकीसाठी जागावांटबाबाबत बोलणी होईल. दुपारी ४ ते ७ या वेळेत शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांशी ते चर्चा करतील. 
सोमवारी १७ रोजी दुपारी १२ वाजता ग्रॅण्ड हयातमध्ये ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार असून आगामी निवडणुकीसाठी सेनेची रणनीती ते जाहीर करतील. सायंकाळी ५ वाजता ते मुंबईकडे रवाना होतील. 
दरम्यान, शिवसेनेकडे २0 मतदारसंघांमध्ये उमेदवार तयार असल्याचा दावा ताम्हणकर यांनी केला. भाभासुमंचे अर्थात गोवा सुरक्षा मंच पक्षाचे उमेदवार प्रबळ असतील तेथे शिवसेना आग्रह धरणार नाही. माध्यम प्रश्नाबरोबरच भ्रष्टाचार निर्मूलन, कसिनोंना विरोध, प्रादेशिक आराखडा, नोकर भरती हे धगधगते विषय सेनेचे प्रचाराचे मुद्दे असतील, असे त्यांनी सांगितले. 
 
मडगांव-काणकोण मार्गाच्या राष्ट्रीयीकरणास विरोध 
ताम्हणकर हे गोव्यातील खाजगी बसमालक संघटनेचेही सरचिटणीस आहेत. मडगांव-काणकोण मार्गाचे राष्ट्रीयीकरण करुन तेथे कदंबचीच सेवा देण्याच्या सरकारच्या हालचालींना त्यांनी तीव्र विरोध केला असून अखेरच्या रक्ताच्या थेंबापर्यंत हे होऊ देणार नाही, असा इशारा दिलेला आहे. प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण करु, असे ताम्हणकर म्हणाले. सध्या तीन मार्गांच्या राष्ट्रीयीकरणानंतर जी गैरसोय सरकारने करुन ठेवली आहे तिचा कटू अनुभव प्रवासी घेत आहेत.