शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
नौदलाला आज असे जहाज मिळणार, जगात कोणत्याही नौदलाकडे नाही; पाचव्या शतकातील आरमाराची ताकद जगभ्रमंतीला निघणार...
3
"भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी"; कोरोनाबद्दल अखिलेश यादव यांचा गंभीर इशारा
4
६ तास कसून चौकशी, अनेक बँकांत खाती; काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देताच आली नाहीत?
5
कोणीतरी आले अन् गोळ्या झाडून गेले! हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा अखेरची घटका मोजू लागला
6
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
7
अनंत अंबानींपेक्षाही मोठं लग्न? 'या' शाही विवाहात प्रत्येक पाहुण्यावर ४२ लाख होणार खर्च, २०० VIP
8
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
9
ब्रेकअप? 'या' अभिनेत्याला डेट करत होती सारा तेंडुलकर, कुटुंबाला भेटल्यानंतर नातं तुटल्याची चर्चा
10
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
11
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
12
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
13
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
14
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
15
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
16
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
17
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
18
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
19
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
20
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!

उद्धव ठाकरे हाजिर हो!

By admin | Updated: August 27, 2016 05:19 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यापैकी एकाने हजर राहावे, असे म्हणत उच्च न्यायालयाने त्यांना समन्स बजावले.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्राच्या दाव्यात साक्षीदार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यापैकी एकाने हजर राहावे, असे म्हणत उच्च न्यायालयाने त्यांना समन्स बजावले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १३ डिसेंबर २०११ रोजी केलेल्या इच्छापत्राला जयदेव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या इच्छापत्रात बाळासाहेबांनी त्यांची बहुतांशी संपत्ती उद्धव ठाकरे यांच्या नावे केली आहे. तर त्यांचा नातू ऐश्वर्य याच्या नावावर मातोश्रीचा पहिला मजला केला आहे. बाळासाहेबांनी या इच्छापत्रात जयदेव यांच्या नावाचा साधा उल्लेखही न केल्याने जयदेव यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे.बाळासाहेबांचे मानसिक संतुलन ढासळल्याचा फायदा घेत उद्धव यांनी सर्व संपत्ती त्यांच्या नावावर केल्याचा आरोप जयदेव यांनी दाव्यात केला आहे.या दाव्याच्या सुनावणीत आतापर्यंत उच्च न्यायालयाने जयदेव ठाकरे, बाळासाहेबांचे फिजिशियन डॉ. जलील परकार, सेनेचे नेते अनिल परब आणि इच्छापत्र तयार करणारे अ‍ॅड. एफ. डिसोझा यांची साक्ष नोंदवली आहे.शुक्रवारच्या सुनावणीत जयदेव यांच्या वकील सीमा सरनाईक यांनी बाळासाहेब व जयदेव यांच्या संबंंधांवर प्रकाशझोत टाकण्यासाठी सामनाचे संपादक आणि पत्रकार त्याचबरोबर अन्य काही वर्तमानपत्रांचे संपादक आणि पत्रकार यांना साक्षीदार म्हणून समन्स बजावण्याची विनंती न्या. गौतम पटेल यांना केली. मात्र उच्च न्यायालयाने सामना वगळता अन्य वृत्तपत्रांच्या संपादकांना व पत्रकारांना साक्षीदार म्हणून बोलवण्यास नकार दिला. ‘पत्रकारांना किंवा संपादकांना कोणी तरी माहिती देतो आणि त्या आधारावर ते माहिती प्रसिद्ध करतात. हे सर्व ऐकीव असते, बाळासाहेब आणि जयदेव यांच्या नातेसंबंधातील माहिती त्यांना वैयक्तिकरीत्या आहे, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे अशा लोकांची साक्ष नोंदवणे दाव्याच्या दृष्टीने धोकादायक आहे,’ असे म्हणत न्या. पटेल यांनी अन्य वर्तमानपत्रांचे संपादक आणि पत्रकारांची साक्ष नोंदवण्याची जयदेव ठाकरे यांची विनंती फेटाळली.मात्र उच्च न्यायालयाने ‘सामना’चे संपादक म्हणजेच उद्धव ठाकरे किंवा कार्यकारी संपादक संजय राऊत किंवा ज्याने बाळासाहेब व जयदेव यांच्या संबंधांवर लेख लिहिला होता त्या पत्रकाराने साक्षीदार म्हणून हजर राहावे, असे म्हणत समन्स बजावले. या दाव्यावरील पुढील सुनावणी १० आॅक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे. जयदेव यांच्या साक्षीनंतर त्यांच्या तिसऱ्या पत्नी अनुराधा ठाकरे यांचीही साक्ष नोंदवण्यात येईल. (प्रतिनिधी) >पत्रकार-संपादकांची साक्ष नोंदण्यास नकारपत्रकारांना किंवा संपादकांना कोणी तरी माहिती देतो आणि त्या आधारावर ते माहिती प्रसिद्ध करतात. हे सर्व ऐकीव असते, बाळासाहेब आणि जयदेव यांच्या नातेसंबंधातील माहिती त्यांना वैयक्तिकरीत्या आहे, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे अशा लोकांची साक्ष नोंदवणे दाव्याच्या दृष्टीने धोकादायक आहे,’ असे म्हणत न्या. पटेल यांनी अन्य वर्तमानपत्रांचे संपादक आणि पत्रकारांची साक्ष नोंदवण्याची जयदेव ठाकरे यांची विनंती फेटाळली.