शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
3
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
4
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
5
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
6
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
7
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
8
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
9
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
10
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
11
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
12
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
13
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
14
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
15
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
16
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
17
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
18
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
19
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
20
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

उद्धव उरले मुंबईपुरतेच !

By admin | Published: February 12, 2016 3:21 AM

राज्यात आणि केंद्रात भाजपा-शिवसेनेचे युती सरकार असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना १३ फेब्रुवारीला होत असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या मुख्य उद््घाटन समारंभाला

मुंबई : राज्यात आणि केंद्रात भाजपा-शिवसेनेचे युती सरकार असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना १३ फेब्रुवारीला होत असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या मुख्य उद््घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलेले नाही. उलट १५ फेब्रुवारीला बीकेसीवर होणाऱ्या ‘मेक इन मुंबई’ या विषयावरील चर्चासत्राचा समारोप उद्धव यांच्या हस्ते करून त्यांना मुंबईपुरते सीमित ठेवण्यात आले की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. मात्र या समारंभात उद्धव यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित न करून उभयतांना एका व्यासपीठावर आणण्याचे टाळले गेले आहे. राज्याचे उद्योग खाते शिवसेनेकडे असताना हे घडले.मात्र, ‘मेक इन मुंबई’ या विषयावरील चर्चासत्राचा समारोप आणि १४ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता गिरगाव चौपाटीवर आयोजित ‘महाराष्ट्र रजनी’ या कार्यक्रमास त्यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांना या तीन कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले, ते आमंत्रण त्यांनी स्वीकारले. भाजपाकडून शिवसेनेची उपेक्षा होत असल्याची तक्रार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत केली होती. त्या वेळी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेचा उचित सन्मान केला जाईल, असे आश्वासन दिले होते. सरकारी कार्यक्रमात उद्धव यांना बोलावले असता प्रोटोकॉलचा प्रश्न उपस्थित झाला असता. तो सोडवण्यासाठी ते तीन कार्यक्रमांना उपस्थित राहतील. ते या कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याच्या वृत्ताला उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दुजोरा दिला. (विशेष प्रतिनिधी)सरकारी कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलचा प्रश्नभाजपाच्या सूत्रांनी सांगितले की, १३ तारखेचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा सरकारी आहे. त्यात प्रोटोकॉल सांभाळणे आवश्यक आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंना व्यासपीठावर बसविता येत नव्हते आणि खाली श्रोत्यांमध्ये त्यांना बसविणे योग्य दिसले नसते.