शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

उद्धव उरले मुंबईपुरतेच !

By admin | Updated: February 12, 2016 03:21 IST

राज्यात आणि केंद्रात भाजपा-शिवसेनेचे युती सरकार असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना १३ फेब्रुवारीला होत असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या मुख्य उद््घाटन समारंभाला

मुंबई : राज्यात आणि केंद्रात भाजपा-शिवसेनेचे युती सरकार असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना १३ फेब्रुवारीला होत असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या मुख्य उद््घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलेले नाही. उलट १५ फेब्रुवारीला बीकेसीवर होणाऱ्या ‘मेक इन मुंबई’ या विषयावरील चर्चासत्राचा समारोप उद्धव यांच्या हस्ते करून त्यांना मुंबईपुरते सीमित ठेवण्यात आले की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. मात्र या समारंभात उद्धव यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित न करून उभयतांना एका व्यासपीठावर आणण्याचे टाळले गेले आहे. राज्याचे उद्योग खाते शिवसेनेकडे असताना हे घडले.मात्र, ‘मेक इन मुंबई’ या विषयावरील चर्चासत्राचा समारोप आणि १४ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता गिरगाव चौपाटीवर आयोजित ‘महाराष्ट्र रजनी’ या कार्यक्रमास त्यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांना या तीन कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले, ते आमंत्रण त्यांनी स्वीकारले. भाजपाकडून शिवसेनेची उपेक्षा होत असल्याची तक्रार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत केली होती. त्या वेळी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेचा उचित सन्मान केला जाईल, असे आश्वासन दिले होते. सरकारी कार्यक्रमात उद्धव यांना बोलावले असता प्रोटोकॉलचा प्रश्न उपस्थित झाला असता. तो सोडवण्यासाठी ते तीन कार्यक्रमांना उपस्थित राहतील. ते या कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याच्या वृत्ताला उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दुजोरा दिला. (विशेष प्रतिनिधी)सरकारी कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलचा प्रश्नभाजपाच्या सूत्रांनी सांगितले की, १३ तारखेचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा सरकारी आहे. त्यात प्रोटोकॉल सांभाळणे आवश्यक आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंना व्यासपीठावर बसविता येत नव्हते आणि खाली श्रोत्यांमध्ये त्यांना बसविणे योग्य दिसले नसते.