शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव उरले मुंबईपुरतेच !

By admin | Updated: February 12, 2016 03:21 IST

राज्यात आणि केंद्रात भाजपा-शिवसेनेचे युती सरकार असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना १३ फेब्रुवारीला होत असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या मुख्य उद््घाटन समारंभाला

मुंबई : राज्यात आणि केंद्रात भाजपा-शिवसेनेचे युती सरकार असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना १३ फेब्रुवारीला होत असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या मुख्य उद््घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलेले नाही. उलट १५ फेब्रुवारीला बीकेसीवर होणाऱ्या ‘मेक इन मुंबई’ या विषयावरील चर्चासत्राचा समारोप उद्धव यांच्या हस्ते करून त्यांना मुंबईपुरते सीमित ठेवण्यात आले की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. मात्र या समारंभात उद्धव यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित न करून उभयतांना एका व्यासपीठावर आणण्याचे टाळले गेले आहे. राज्याचे उद्योग खाते शिवसेनेकडे असताना हे घडले.मात्र, ‘मेक इन मुंबई’ या विषयावरील चर्चासत्राचा समारोप आणि १४ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता गिरगाव चौपाटीवर आयोजित ‘महाराष्ट्र रजनी’ या कार्यक्रमास त्यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांना या तीन कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले, ते आमंत्रण त्यांनी स्वीकारले. भाजपाकडून शिवसेनेची उपेक्षा होत असल्याची तक्रार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत केली होती. त्या वेळी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेचा उचित सन्मान केला जाईल, असे आश्वासन दिले होते. सरकारी कार्यक्रमात उद्धव यांना बोलावले असता प्रोटोकॉलचा प्रश्न उपस्थित झाला असता. तो सोडवण्यासाठी ते तीन कार्यक्रमांना उपस्थित राहतील. ते या कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याच्या वृत्ताला उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दुजोरा दिला. (विशेष प्रतिनिधी)सरकारी कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलचा प्रश्नभाजपाच्या सूत्रांनी सांगितले की, १३ तारखेचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा सरकारी आहे. त्यात प्रोटोकॉल सांभाळणे आवश्यक आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंना व्यासपीठावर बसविता येत नव्हते आणि खाली श्रोत्यांमध्ये त्यांना बसविणे योग्य दिसले नसते.