शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

उद्धवमध्ये मुख्यमंत्रिपदाची क्षमता नाही -नारायण राणे

By admin | Updated: September 23, 2014 08:43 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अलीकडेच मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे हळूवारपणे बोलू लागले आहेत

अमरावती : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अलीकडेच मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे हळूवारपणे बोलू लागले आहेत. परंतु मुख्यमंत्रिपदासाठी कर्तृत्ववान आणि क्षमता असलेली व्यक्ती हवी. उद्धव हे तासभरही काम करू शकत नाहीत़ थोडे पायी चालले की, लगेच दमतात. त्यामुळे त्यांच्यात मुख्यमंत्रिपदाची जराही क्षमता नाही, अशी टीका काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.राणे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ खोटे बोलून लोकांची भलामण केली. मात्र आता विधानसभा निवडणुकीत भाजपा-सेनेचा खरा मुखवटा जनताच फाडेल, असा आशावाद व्यक्तकरीत पंकजा मुंडे यांनी काढलेली संघर्ष यात्रा ही काँग्रेसविरोधी नव्हे तर भाजपाविरोधी होती, अशी उपहासात्मक टीका राणे यांनी केली. काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये आघाडी व्हावी, ही आपली वैयक्तिक इच्छा आहे. काँग्रेसने १२४ जागा देऊ केल्या आहेत. आघाडी झाली नाही तर काँगे्रसने स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना राणे यांनी अजित पवार यांना जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीला काँग्रेसचा विरोध नाही, पण ही मागणी केवळ सत्तेसाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. (प्रतिनिधी)