शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उद्धवही

By admin | Updated: September 14, 2014 03:15 IST

मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न केल्यावर टाळाटाळ करणा:या उद्धव यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची इच्छा प्रकट केल्यामुळे भाजपामधील या पदाच्या किमान अर्धा डझन इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षेला त्यांनी आव्हान दिले आहे.

महायुतीत खळबळ : भाजपा नेते अस्वस्थ
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा जाहीरपणो व्यक्त करत जागावाटपाबाबत आग्रही भूमिका घेताना कुणीही मर्यादाभंग करू नये, असा इशाराही एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिल्यामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे.
   काल-परवार्पयत मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न केल्यावर टाळाटाळ करणा:या उद्धव यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची इच्छा प्रकट केल्यामुळे भाजपामधील या पदाच्या किमान अर्धा डझन इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षेला त्यांनी आव्हान दिले आहे. भाजपाकडून सातत्याने सुरू असलेल्या अतिरिक्त जागांची मागणी बंद व्हावी याकरिताच ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची इच्छा प्रकट  केल्याचे बोलले जात आहे. मात्र आता उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार, की विधान परिषदेचे मागील दार वाजवणार, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.  राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले तर त्याचे नेतृत्व शिवसेनेकडे असेल. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने आपल्याला पडत नाहीत. परंतु आपल्यावर या पदाची जबाबदारी पडली तर आपण पळ काढणार नाही. आपल्या कामाबद्दल तक्रार करण्याची संधी लोकांना मिळणार नाही, असे सांगून उद्धव यांनी आपल्या मनातील सुप्त आकांक्षा बोलून दाखवली. आपण दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असून कोणतीही जबाबदारी पार पाडण्यास कचरत नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.  (विशेष प्रतिनिधी)
 
.तर उद्धव कुठून लढणार?
उद्धव यांनी निवडणूक लढवायचे ठरवले तर त्यांचे वास्तव्य असलेल्या वांद्रे (पू.) मतदारसंघातून, ठाण्यातील एखाद्या मतदारसंघातून किंवा आपली सासुरवाडी असलेल्या डोंबिवलीतून निवडणूक लढवू शकतील. अथवा थेट लोकांमधून निवडून न जाता विधान परिषदेचे सदस्यत्व स्वीकारतील.
 
परिणाम काय?
शिवसेना-भाजपा युतीत निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरविला जात नाही. ज्या पक्षाच्या अधिक जागा निवडून येतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असे आजवरचे युतीचे सूत्र राहिले आहे. युतीची आता तर महायुती झाली आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना विश्वासात न घेता उद्धव यांनी मुख्यमंत्री बनण्याचे संकेत दिल्याने महायुतीच्या जागावाटपात पेच निर्माण होऊ शकतो, असे बोलले जात आहे. शिवाय, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. त्यामुळे फडणवीस यांच्यासह भाजपातील इतर दावेदारांची उद्धव यांनी गोची केली आहे.