शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उद्धवही

By admin | Updated: September 14, 2014 03:15 IST

मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न केल्यावर टाळाटाळ करणा:या उद्धव यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची इच्छा प्रकट केल्यामुळे भाजपामधील या पदाच्या किमान अर्धा डझन इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षेला त्यांनी आव्हान दिले आहे.

महायुतीत खळबळ : भाजपा नेते अस्वस्थ
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा जाहीरपणो व्यक्त करत जागावाटपाबाबत आग्रही भूमिका घेताना कुणीही मर्यादाभंग करू नये, असा इशाराही एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिल्यामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे.
   काल-परवार्पयत मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न केल्यावर टाळाटाळ करणा:या उद्धव यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची इच्छा प्रकट केल्यामुळे भाजपामधील या पदाच्या किमान अर्धा डझन इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षेला त्यांनी आव्हान दिले आहे. भाजपाकडून सातत्याने सुरू असलेल्या अतिरिक्त जागांची मागणी बंद व्हावी याकरिताच ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची इच्छा प्रकट  केल्याचे बोलले जात आहे. मात्र आता उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार, की विधान परिषदेचे मागील दार वाजवणार, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.  राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले तर त्याचे नेतृत्व शिवसेनेकडे असेल. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने आपल्याला पडत नाहीत. परंतु आपल्यावर या पदाची जबाबदारी पडली तर आपण पळ काढणार नाही. आपल्या कामाबद्दल तक्रार करण्याची संधी लोकांना मिळणार नाही, असे सांगून उद्धव यांनी आपल्या मनातील सुप्त आकांक्षा बोलून दाखवली. आपण दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असून कोणतीही जबाबदारी पार पाडण्यास कचरत नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.  (विशेष प्रतिनिधी)
 
.तर उद्धव कुठून लढणार?
उद्धव यांनी निवडणूक लढवायचे ठरवले तर त्यांचे वास्तव्य असलेल्या वांद्रे (पू.) मतदारसंघातून, ठाण्यातील एखाद्या मतदारसंघातून किंवा आपली सासुरवाडी असलेल्या डोंबिवलीतून निवडणूक लढवू शकतील. अथवा थेट लोकांमधून निवडून न जाता विधान परिषदेचे सदस्यत्व स्वीकारतील.
 
परिणाम काय?
शिवसेना-भाजपा युतीत निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरविला जात नाही. ज्या पक्षाच्या अधिक जागा निवडून येतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असे आजवरचे युतीचे सूत्र राहिले आहे. युतीची आता तर महायुती झाली आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना विश्वासात न घेता उद्धव यांनी मुख्यमंत्री बनण्याचे संकेत दिल्याने महायुतीच्या जागावाटपात पेच निर्माण होऊ शकतो, असे बोलले जात आहे. शिवाय, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. त्यामुळे फडणवीस यांच्यासह भाजपातील इतर दावेदारांची उद्धव यांनी गोची केली आहे.