शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उद्धवही

By admin | Updated: September 14, 2014 03:15 IST

मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न केल्यावर टाळाटाळ करणा:या उद्धव यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची इच्छा प्रकट केल्यामुळे भाजपामधील या पदाच्या किमान अर्धा डझन इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षेला त्यांनी आव्हान दिले आहे.

महायुतीत खळबळ : भाजपा नेते अस्वस्थ
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा जाहीरपणो व्यक्त करत जागावाटपाबाबत आग्रही भूमिका घेताना कुणीही मर्यादाभंग करू नये, असा इशाराही एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिल्यामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे.
   काल-परवार्पयत मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न केल्यावर टाळाटाळ करणा:या उद्धव यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची इच्छा प्रकट केल्यामुळे भाजपामधील या पदाच्या किमान अर्धा डझन इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षेला त्यांनी आव्हान दिले आहे. भाजपाकडून सातत्याने सुरू असलेल्या अतिरिक्त जागांची मागणी बंद व्हावी याकरिताच ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची इच्छा प्रकट  केल्याचे बोलले जात आहे. मात्र आता उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार, की विधान परिषदेचे मागील दार वाजवणार, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.  राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले तर त्याचे नेतृत्व शिवसेनेकडे असेल. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने आपल्याला पडत नाहीत. परंतु आपल्यावर या पदाची जबाबदारी पडली तर आपण पळ काढणार नाही. आपल्या कामाबद्दल तक्रार करण्याची संधी लोकांना मिळणार नाही, असे सांगून उद्धव यांनी आपल्या मनातील सुप्त आकांक्षा बोलून दाखवली. आपण दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असून कोणतीही जबाबदारी पार पाडण्यास कचरत नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.  (विशेष प्रतिनिधी)
 
.तर उद्धव कुठून लढणार?
उद्धव यांनी निवडणूक लढवायचे ठरवले तर त्यांचे वास्तव्य असलेल्या वांद्रे (पू.) मतदारसंघातून, ठाण्यातील एखाद्या मतदारसंघातून किंवा आपली सासुरवाडी असलेल्या डोंबिवलीतून निवडणूक लढवू शकतील. अथवा थेट लोकांमधून निवडून न जाता विधान परिषदेचे सदस्यत्व स्वीकारतील.
 
परिणाम काय?
शिवसेना-भाजपा युतीत निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरविला जात नाही. ज्या पक्षाच्या अधिक जागा निवडून येतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असे आजवरचे युतीचे सूत्र राहिले आहे. युतीची आता तर महायुती झाली आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना विश्वासात न घेता उद्धव यांनी मुख्यमंत्री बनण्याचे संकेत दिल्याने महायुतीच्या जागावाटपात पेच निर्माण होऊ शकतो, असे बोलले जात आहे. शिवाय, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. त्यामुळे फडणवीस यांच्यासह भाजपातील इतर दावेदारांची उद्धव यांनी गोची केली आहे.