शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव तर शोलेतील असरानी

By admin | Updated: June 24, 2016 05:31 IST

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी शोले सिनेमातील असरानीशी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी शोले सिनेमातील असरानीशी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, ‘केंद्रात निजामाच्या बापाचे सरकार बसले आहे’ अशी टीका केली होती. तोच धागा पकडून भाजपाच्या, ‘मनोगत’ या पाक्षिकात लिहिलेल्या लेखात भंडारी यांनी म्हटले आहे की, शोलेमध्ये जेलर असलेले असरानी आपल्या पोलीस शिपायांना, ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ,’ असा हुकूम सोडतात. असरानीच्या मागे एकही शिपाई उरत नाही.

निजामाच्या बापाशी तलाक घेतल्यास आपल्यामागे एकही आमदार राहणार नाही, अशी भीती शिवसेनेच्या कार्याध्यक्षांना वाटते का, असा बोचरा सवाल भंडारी यांनी या लेखात केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना सातत्याने लक्ष्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा समाचार घेताना भंडारी यांनी, ‘राऊत साहेब! तलाक कधी घेताय? या शीर्षकाखाली लेख लिहिला आहे. महाभारतातील संजय आपल्या दिव्यदृष्टीने कुरुक्षेत्रावरील युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला ऐकवत असे.

मात्र, या संजयाला मराठवाड्यात निजामाच्या बापाने केलेली विकासकामे दिसू नयेत आणि ती आपल्या कार्याध्यक्षांना सांगता येऊ नयेत हा दोष कोणाचा, असा सवालही माधव भंडारी यांनी केला आहे. निजामाच्या बापाच्या बिर्याणीवर ताव मारायचा आणि यजमानाच्या नावानं बोटं मोडायची ही कुठली ‘सच्चाई’ अशी बोचरी टीकाही लेखात आहे. शिवसेनेने खुशाल युती तोडावी, असे आव्हानदेखील त्यांनी दिले आहे. या दोन पक्षांतील वाक्युद्धामुळे नेत्यांमधील व्यक्तिगत संबंधही विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. (विशेष प्रतिनिधी)संघ, भाजपा हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून भरकटलीराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा दोघेही हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून भरकटले असून, मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यासाठी संघाने इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे, अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केली आहे.रा. स्व. संघाच्या मुस्लीम राष्ट्रीय मंचाने २ जुलै रोजी इफ्तारचे आयोजन केले आहे. त्यावर जोरदार हल्ला चढवत कायंदे म्हणाल्या, संघाने इफ्तारचे आयोजन केल्याबद्दल आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. कारण, त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा कधीच सोडून दिला असून, मतांच्या राजकारणासाठी ते असल्या पार्ट्या आयोजित करीत आहेत.आजवर काँग्रेसवर मुस्लिमांच्या लांगूलचालनाचा आरोप करणारी भाजपा आणि संघवाले आता स्वत:ही तेच करत आहेत, असा टोलाही कायंदे यांनी लगावला.