शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

उद्धव तर शोलेतील असरानी

By admin | Updated: June 24, 2016 05:31 IST

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी शोले सिनेमातील असरानीशी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी शोले सिनेमातील असरानीशी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, ‘केंद्रात निजामाच्या बापाचे सरकार बसले आहे’ अशी टीका केली होती. तोच धागा पकडून भाजपाच्या, ‘मनोगत’ या पाक्षिकात लिहिलेल्या लेखात भंडारी यांनी म्हटले आहे की, शोलेमध्ये जेलर असलेले असरानी आपल्या पोलीस शिपायांना, ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ,’ असा हुकूम सोडतात. असरानीच्या मागे एकही शिपाई उरत नाही.

निजामाच्या बापाशी तलाक घेतल्यास आपल्यामागे एकही आमदार राहणार नाही, अशी भीती शिवसेनेच्या कार्याध्यक्षांना वाटते का, असा बोचरा सवाल भंडारी यांनी या लेखात केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना सातत्याने लक्ष्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा समाचार घेताना भंडारी यांनी, ‘राऊत साहेब! तलाक कधी घेताय? या शीर्षकाखाली लेख लिहिला आहे. महाभारतातील संजय आपल्या दिव्यदृष्टीने कुरुक्षेत्रावरील युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला ऐकवत असे.

मात्र, या संजयाला मराठवाड्यात निजामाच्या बापाने केलेली विकासकामे दिसू नयेत आणि ती आपल्या कार्याध्यक्षांना सांगता येऊ नयेत हा दोष कोणाचा, असा सवालही माधव भंडारी यांनी केला आहे. निजामाच्या बापाच्या बिर्याणीवर ताव मारायचा आणि यजमानाच्या नावानं बोटं मोडायची ही कुठली ‘सच्चाई’ अशी बोचरी टीकाही लेखात आहे. शिवसेनेने खुशाल युती तोडावी, असे आव्हानदेखील त्यांनी दिले आहे. या दोन पक्षांतील वाक्युद्धामुळे नेत्यांमधील व्यक्तिगत संबंधही विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. (विशेष प्रतिनिधी)संघ, भाजपा हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून भरकटलीराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा दोघेही हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून भरकटले असून, मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यासाठी संघाने इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे, अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केली आहे.रा. स्व. संघाच्या मुस्लीम राष्ट्रीय मंचाने २ जुलै रोजी इफ्तारचे आयोजन केले आहे. त्यावर जोरदार हल्ला चढवत कायंदे म्हणाल्या, संघाने इफ्तारचे आयोजन केल्याबद्दल आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. कारण, त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा कधीच सोडून दिला असून, मतांच्या राजकारणासाठी ते असल्या पार्ट्या आयोजित करीत आहेत.आजवर काँग्रेसवर मुस्लिमांच्या लांगूलचालनाचा आरोप करणारी भाजपा आणि संघवाले आता स्वत:ही तेच करत आहेत, असा टोलाही कायंदे यांनी लगावला.