शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मुंबईत उकाडा कायम!

By admin | Updated: May 10, 2017 02:38 IST

राज्याला वैशाख वणव्याचे चटके बसत असतानाच ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. महत्त्वाचे म्हणजे, ऊन, वारा आणि पाऊस असे तिहेरी वातावरण राज्यात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याला वैशाख वणव्याचे चटके बसत असतानाच ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. महत्त्वाचे म्हणजे, ऊन, वारा आणि पाऊस असे तिहेरी वातावरण राज्यात सर्वत्र असून, १० ते १३ मे दरम्यान दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर १३ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असाही इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश नोंदवण्यात येत असून, वाढलेल्या उकाड्याने मुंबईकर घामाघूम झाले आहेत.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे.मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश नोंदवण्यात येत असून, आर्द्रतेतही चढ-उतार होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, मागील तीन दिवसांपासून मुंबईचे हवामान ढगाळ असून, ऊन्हाचा कडाकाही वाढला आहे. हवामानातील बदलामुळे उकाड्यात वाढ होत असून, वाढता उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे.हवामान खात्याचा इशारा-१० मे : दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस ११ मे : राज्याच्या संपूर्ण भागात तुरळक ठिकाणी पाऊस १२ मे : राज्याच्या संपूर्ण भागात तुरळक ठिकाणी पाऊस १३ मे : दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस १३ मे : विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटमुंबईचे हवामान -१० आणि ११ मे : आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २५ अंशाच्या आसपास राहील.