शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

उच्च न्यायालयाने सरकारला धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 05:19 IST

चतुर्थ श्रेणी कामगार भरती घोटाळ्यातील प्रथम श्रेणीतील सरकारी कर्मचाºयावर कारवाई करण्यास गेली चार वर्षे सरकार दिरंगाई करत असल्याने, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी धारेवर धरले

मुंबई : चतुर्थ श्रेणी कामगार भरती घोटाळ्यातील प्रथम श्रेणीतील सरकारी कर्मचाºयावर कारवाई करण्यास गेली चार वर्षे सरकार दिरंगाई करत असल्याने, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी धारेवर धरले. सरकारच्या या ढिलाईमुळे अन्य कर्मचारीही अशा प्रकारची कृत्ये करण्यास धजावतील. त्यामुळे संबंधित कर्मचाºयावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने सरकारला दिले.अवघ्या दोन दिवसांनी निवृत्त होणाºया पुण्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य एम. बी. चेनीगुंडे यांच्यावर नऊ लाखांची लाच घेतल्याचा आरोप आहे. २०१३ मध्ये चतुर्थ श्रेणी कामगारांची भरती करताना, नऊ जणांकडून प्रत्येकी एक लाख रुपये लाच घेऊन, त्यांची भरती केल्याचे पोलीस उपअधीक्षकांनी केलेल्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. मात्र, तरीही चेनीगुंडे यांच्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. इतकेच नव्हे, तर खातेनिहाय चौकशी करताना त्यांचे निलंबनही केले नाही. याबाबत न्या. आर. एम. सावंत आणि न्या. साधना जाधव यांनी आश्चर्य व्यक्त केले.खातेनिहाय चौकशी सुरू असतानाही संबंधित कर्मचाºयाचे निलंबन करणे सरकारला योग्य वाटले नाही? सरकारने आता सादर केलेला अहवाल म्हणजे धूळफेक आहे. वास्तविक, सरकारला काही करायचे नाही. त्यांच्या निवृत्तीची वाट पाहात आहात. एवढ्या वर्षांत त्यांच्यावर कारवाई करायला हवी होती. आम्ही या अहवालावर समधानी नाही. अशी कृत्ये करणाºयांवर कारवाई केली नाहीत, तर अन्य अधिकारी असे प्रकार करण्यास धजावतील. अशा वृत्तीला आळा घालण्यासाठी या अधिकाºयावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करा, खातेनिहाय कारवाई करा, असे निर्देश न्यायालयाने दिले.पुण्याच्या संगीता पाटील यांनी या भरती घोटाळ्यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. संगीता पाटील यांचे पती ज्ञानेश्वर पाटील हे या प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहात होते. त्यांनी चेनीगुंडे यांच्या कारनाम्याची माहिती तत्कालीन पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांना दिली. दयाळ यांनी पोलीस उपअधीक्षकांना याबद्दल चौकशीचो आदेश दिला. उपअधीक्षकांच्या चौकशीत चेनीगुंडे यांनी भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास आले. मात्र, त्यांच्यावर कारवाई झाली नाही. दरम्यान, ज्ञानेश्वर पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला. पतीच्या पश्चात संगीता यांनी ही केस लावून धरत, उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.