शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
2
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
3
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
5
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
6
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
7
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
8
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
9
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
10
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
11
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
12
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
13
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
14
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
15
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
16
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
17
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
18
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
19
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
20
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Daily Top 2Weekly Top 5

हा तर राजकीय सूडबुद्धीचा प्रकार

By admin | Updated: February 5, 2016 04:15 IST

आपल्याविरुध्द खटला चालविण्याची सीबीआयला दिलेली परवानगी हा राजकीय सूडबुद्धीचा प्रकार आहे. डिसेंबर २०१३ मध्येही सीबीआयने तत्कालीन राज्यपालांकडे खटला चालविण्यासाठी अनुमती मागितली होती

मुंबई : आपल्याविरुध्द खटला चालविण्याची सीबीआयला दिलेली परवानगी हा राजकीय सूडबुद्धीचा प्रकार आहे. डिसेंबर २०१३ मध्येही सीबीआयने तत्कालीन राज्यपालांकडे खटला चालविण्यासाठी अनुमती मागितली होती. परंतु, देशातील सर्वोच्च विधीतज्ज्ञांनी सबळ पुरावे नसल्याचा अभिप्राय नोंदविल्यामुळे तत्कालीन राज्यपालांनी खटला चालविण्यास परवानगी नाकारली होती, अशी प्रतिक्रिया खा. अशोक चव्हाण यांनी दिली.या प्रकरणाची सीबीआय चौकशी जुलै २०१२ मध्ये संपल्यानंतर या प्रकरणात कोणतेही नवीन पुरावे समोर आलेले नाहीत किंवा नवीन चौकशी देखील झालेली नाही. जुलै २०१२ मध्ये पूर्ण झालेल्या ज्या सीबीआय चौकशीच्या आधारे खटला चालविण्यास तत्कालीन राज्यपाल महोदयांनी परवानगी नाकारली होती; आता त्याच चौकशीच्या आधारे नव्याने खटला चालविण्याची मागणी करणे आश्चर्यकारक आहे असेही चव्हाण म्हणाले.डिसेंबर २०१३ मध्ये तत्कालीन राज्यपालांनी परवानगी नाकारल्यानंतर सीबीआयने आपले नाव आरोपपत्रातून वगळण्याची विनंती न्यायालयाला केली होती. त्यासंदर्भात जुलै २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली एक याचिका अद्याप प्रलंबीत आहे. दोन वर्षांपूर्वी आपले नाव आरोपपत्रातून वगळण्याची मागणी करणारी सीबीआय केंद्रात व राज्यात सत्तांतर होताच, यू-टर्न घेऊन खटला चालविण्याची परवानगी मागते, हे राजकीय दबावाचे द्योतक आहे, असे खा. चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे.सीबीआयने सरकारच्या दबावामुळेच खटल्यासाठी राज्यपालांकडे नव्याने परवानगी मागितली आहे. भाजपाचे खासदार किरिट सोमय्या यांनी आपल्याविरुद्ध खटला चालविण्याची नव्याने परवानगी देण्यात यावी, असे पत्र राज्य सरकारला लिहिले होते. सीबीआय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे खटला चालविण्याची मागणी करण्यासाठी राज्य सरकारने थेट सीबीआयशी पत्रव्यवहार कसा केला, हेच अनाकलनीय आहे. राज्य सरकार सातत्याने ज्या पाटील आयोगाच्या अहवालाचा दाखला देत आहे, त्या आयोगाच्या अहवालात खा. आपल्याविरुद्ध भारतीय दंड विधानांतर्गत खटला चालविता येईल, असे सबळ पुरावे समोर आलेले नाहीत. शिवाय सरकारने स्थापन केलेल्या चौकशी आयोगाचा अहवाल सीबीआय चौकशीचा पुरावा असूच शकत नाही, असे खा. चव्हाण यांनी म्हटले आहे.