शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दो साल बुरा हाल.. सोलापूरमध्ये काँग्रेसचे बोंबाबोंब आंदोलन

By admin | Updated: May 30, 2016 16:13 IST

सरकारला २ वर्षे पूर्ण झाली पण अच्छे दिनाची पूर्तता अद्याप झाली नाही असे सांगत शहर व जिल्हा काँग्रेस पक्षाने सोमवारी सोलापूरमध्ये बोंबाबोंब आंदोलन केले़.

अच्छे दिनची दुसरी पुण्यतिथी साजरी
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ३० -  मोदी सरकार अच्छे दिनच्या नावाखाली संपूर्ण देशातील जनतेला फसविण्याचे काम केले आहे़. केंद्र सरकारला २ वर्षे पूर्ण झाली परंतू अच्छे दिनाची पूर्तता अद्याप झालेली नाही़, दो साल बुरा हाल अशीच सरकारची अवस्था झाल्याने शहर व जिल्हा काँग्रेस पक्षाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले़ याचवेळी अच्छे दिनची दुसरी पुण्यतिथी साजरी करण्यात आली़
या आंदोलनात शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर खरटमल, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, निर्मलाताई ठोकळ, प्रदेश सरचिटणीस धर्मा भोसले, महापौर सुशिलाताई आबुटे, सरचिटणीस अलका राठोड, माजी महापौर नलिनीताई चंदेले, सोमपा पक्षनेते संजय हेमगड्डी, रियाज हुंडेकरी, नगरसेवक आरीफ शेख, चेतन नरोटे, शिवा बाटलीवाला, अनिल पल्ली, सुनिल खटके, सरचिटणीस राहुल गायकवाड, आझम सैपन, अमोल शिंदे, बाबा करगुळे, गणेश डोंगरे, अशोक कलशेट्टी, पैगंबर शेख, दत्तू बंदपट्टे, नगरसेविका अश्विनी जाधव, सुजाता आकेन, मंदाकिनी तोडकरी, फिरदोस पटेल, तिरूपती परकीपंडला, सातलिंग शटगार, प्रा़ सिद्राम सलवदे, अर्जुन पाटील, भिमाशंकर जमादार, जावेद शिकलगार, अरूण इंगळे, हणमंत सायबोळू, युवराज पंतूवाले, दिनेश धोडके, सचिन शिंदे, सुभाष वाघमारे, पार्वती काळे, हारूण शेख, अनिल मस्के, सोपान थोरात, सुमन जाधव आदी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते़
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला २६ मे रोजी दोन वर्षे पूर्ण झाली़ लोकसभा निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासनाची अद्याप पूर्तता झाली नाही़ सत्तेत आल्यास काळा पैसा परत आणू, शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देणार, महागाई कमी करणार, जीवनाश्यक वस्तुच्या किंमती कमी करणार, स्वस्त धान्य देण्याकरिता सरकारकडून दिले जाणारे अशंदान बंद करण्यात आले़ इंदिरा आवास योजना बंद करण्यात आली़ शासकीय योजना या धुळफेक अशा विविध घोषणा अद्याप तशाच आहेत़ त्या पूर्णत्वास आल्या नाहीत़ आश्वासनाची खैरात करणारे भाजप सरकार खोटारडे आहे़ असा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे़
कोण काय म्हणाले :
दुष्काळाने देश होरपळत असताना भाजप सरकार कोणतीच मदत करीत नाही : धर्मा भोसले
महात्मा गांधीजीची हत्या आरएसएसने केली : माजी महापौर निर्मलाताई ठोकळ
आयत्या पिठावर रेघोट्या मारणाºया भाजप सरकारला लाज वाटली पाहिजे : महापौर सुशिला आबुटे 
मोदी सरकारचे जाहिरात युग सुरू आहे : माजी आमदार दिलीप माने