शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

दो साल बुरा हाल.. सोलापूरमध्ये काँग्रेसचे बोंबाबोंब आंदोलन

By admin | Updated: May 30, 2016 16:13 IST

सरकारला २ वर्षे पूर्ण झाली पण अच्छे दिनाची पूर्तता अद्याप झाली नाही असे सांगत शहर व जिल्हा काँग्रेस पक्षाने सोमवारी सोलापूरमध्ये बोंबाबोंब आंदोलन केले़.

अच्छे दिनची दुसरी पुण्यतिथी साजरी
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ३० -  मोदी सरकार अच्छे दिनच्या नावाखाली संपूर्ण देशातील जनतेला फसविण्याचे काम केले आहे़. केंद्र सरकारला २ वर्षे पूर्ण झाली परंतू अच्छे दिनाची पूर्तता अद्याप झालेली नाही़, दो साल बुरा हाल अशीच सरकारची अवस्था झाल्याने शहर व जिल्हा काँग्रेस पक्षाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले़ याचवेळी अच्छे दिनची दुसरी पुण्यतिथी साजरी करण्यात आली़
या आंदोलनात शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर खरटमल, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, निर्मलाताई ठोकळ, प्रदेश सरचिटणीस धर्मा भोसले, महापौर सुशिलाताई आबुटे, सरचिटणीस अलका राठोड, माजी महापौर नलिनीताई चंदेले, सोमपा पक्षनेते संजय हेमगड्डी, रियाज हुंडेकरी, नगरसेवक आरीफ शेख, चेतन नरोटे, शिवा बाटलीवाला, अनिल पल्ली, सुनिल खटके, सरचिटणीस राहुल गायकवाड, आझम सैपन, अमोल शिंदे, बाबा करगुळे, गणेश डोंगरे, अशोक कलशेट्टी, पैगंबर शेख, दत्तू बंदपट्टे, नगरसेविका अश्विनी जाधव, सुजाता आकेन, मंदाकिनी तोडकरी, फिरदोस पटेल, तिरूपती परकीपंडला, सातलिंग शटगार, प्रा़ सिद्राम सलवदे, अर्जुन पाटील, भिमाशंकर जमादार, जावेद शिकलगार, अरूण इंगळे, हणमंत सायबोळू, युवराज पंतूवाले, दिनेश धोडके, सचिन शिंदे, सुभाष वाघमारे, पार्वती काळे, हारूण शेख, अनिल मस्के, सोपान थोरात, सुमन जाधव आदी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते़
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला २६ मे रोजी दोन वर्षे पूर्ण झाली़ लोकसभा निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासनाची अद्याप पूर्तता झाली नाही़ सत्तेत आल्यास काळा पैसा परत आणू, शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देणार, महागाई कमी करणार, जीवनाश्यक वस्तुच्या किंमती कमी करणार, स्वस्त धान्य देण्याकरिता सरकारकडून दिले जाणारे अशंदान बंद करण्यात आले़ इंदिरा आवास योजना बंद करण्यात आली़ शासकीय योजना या धुळफेक अशा विविध घोषणा अद्याप तशाच आहेत़ त्या पूर्णत्वास आल्या नाहीत़ आश्वासनाची खैरात करणारे भाजप सरकार खोटारडे आहे़ असा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे़
कोण काय म्हणाले :
दुष्काळाने देश होरपळत असताना भाजप सरकार कोणतीच मदत करीत नाही : धर्मा भोसले
महात्मा गांधीजीची हत्या आरएसएसने केली : माजी महापौर निर्मलाताई ठोकळ
आयत्या पिठावर रेघोट्या मारणाºया भाजप सरकारला लाज वाटली पाहिजे : महापौर सुशिला आबुटे 
मोदी सरकारचे जाहिरात युग सुरू आहे : माजी आमदार दिलीप माने