शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

लातूरच्या पाण्यासाठी दोन रेल्वेगाड्या

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

तीव्र दुष्काळ आणि फुफाट्याचा उन्हाळा यामुळे हंडाभर पाण्यासाठीही मोताद झालेल्या लातूर जिल्ह्याला पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी रेल्वेने प्रत्येकी ५० टँकरवाघिणींच्या दोन मालगाड्या

मुंबई: तीव्र दुष्काळ आणि फुफाट्याचा उन्हाळा यामुळे हंडाभर पाण्यासाठीही मोताद झालेल्या लातूर जिल्ह्याला पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी रेल्वेने प्रत्येकी ५० टँकरवाघिणींच्या दोन मालगाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या दोन गाड्यांनी एका फेरीत ५५ लाख लिटर पाणी आणता येईल.महाराष्ट्र सरकार आणि मध्य रेल्वेने केलेल्या विनंतीनुसार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या दोन गाड्या तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. या दोन्ही गाड्या १५ एप्रिलपर्यंत पाण्याच्या वाहतुकीसाठी सज्ज होतील व उन्हाळा संपेपर्यंत त्या उपलब्ध असतील.रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या दोन रेल्वेगाड्या मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात पंढरपूर-लातूर या २७५ किमी मार्गावर पाण्याच्या वाहतुकीसाठी चालविल्या जातील. स्थानिक प्रशासनाच्या गरजेनुसार गाड्यांच्या फेऱ्या ठरविल्या जातील. रेल्वेकडे पाण्याच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र टँकर वाघिणी नाहीत. त्यामुळे अन्य द्रव पदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या टँकरवाघिणी स्वच्छ धुवून घ्याव्या लागतील. ‘स्टीम क्लीनिंग’ तंत्राने टँकरवाघिणी स्वच्छ धुण्याचे काम रेल्वेच्या कोटा येथील कार्यशाळेत करण्यात येत आहे. कोटा कार्यशाळेतून स्वच्छ धुतलेल्या ५० टँकरवाघिणींची पहिली रेल्वेगाडी ८ एप्रिलला व दुसरी रेल्वेगाडी १५ एप्रिलपर्यंत उपलब्ध होईल.या रेल्वेगाडीच्या प्रत्येक टँकरवाघिणीची क्षमता ५५ हजार लिटर असेल. म्हणजेच दोन्ही गाड्यांनी एक फेरी मारली की ११ टँकरवाघिणींमध्ये मिळून एकावेळी सुमारे ५५ लाख लिटर पाण्याची वाहतूक करणे शक्य होईल.भीषण दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या देशाच्या विविध भागांमध्ये पाण्याच्या वाहतुकीसाठी रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्याचे सर्वंकष निर्देश प्रभू यांनी रेल्वे मंत्रालयास दिले असून त्यानुसारच लातूरसाठी ही सोय करण्यात येत आहे. याआधी राजस्थान सरकारने केलेल्या विनंतीनुसार उत्तर पश्चिम रेल्वेच्या अजमेर विभागात नसिराबाद ते भिलवाडा या १०९ किमी मार्गावर पाण्याच्या वाहतुकीसाठी अशाच प्रकारे जानेवारीपासून अनेक रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या असून ती सोयही उन्हाळा संपेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. उजनीचे पाणी आणणाररेल्वेने पाण्याच्या वाहतुकीसाठी गाड्या उपलब्ध केल्या असल्या तरी त्यांचा वापर कधी व किती प्रमाणात करायचा याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यायचा आहे. महत्वाचे म्हणजे थेट जलाशयापर्यंत रेल्वेमार्ग नसल्याने तेथून रेल्वेगाडीपर्यंत पाणी आणणे, ते टँकरवाघिणींमध्ये भरणे व लातूरला पोहाचल्यावर ते उतरवून घेऊन त्याची साठवणूक करणे हे खरे कळीचे मुद्दे आहेत.लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी या संदर्भात राज्य सरकारला जो प्रस्ताव पाठविला त्यानुसार उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन केले तर ते जूनच्या अखेरपर्यंत पुरु शकेल व पावसाळा लांबला तरच उजनी प्रकल्पातील पाणी रेल्वेने आणावे लागेल, असे म्हटले होते. लातूरसाठी बाहेरून पाणी आणण्याची वेळ आलीच तर पंंढरपूर-कुर्र्डुवाडी-बार्शी-लातूर या मार्गाने रेल्वेच्या टँकर वाघिणींमधून एका खेपेत ७ ते ८ लाख लिटर पाणी आणण्याचा प्रस्ताव असून पाण्याच्या वाहतुकीस किमान १८ तासांचा कालावधी लागेल, असे जिल्हाधिकारी पोले यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. (विशेष प्रतिनिधी)