शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

मुंबई महानगर पालिकेच्या रिंगणात २ हजार ‘पहिलवान’

By admin | Updated: February 4, 2017 04:46 IST

बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी यादी जाहीर न करण्याचा हातखंडा अवलंबला. त्याऐवजी उमेदवारांच्या हातात थेट एबी फॉर्म

- गौरीशंकर घाळे, मुंबई

बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी यादी जाहीर न करण्याचा हातखंडा अवलंबला. त्याऐवजी उमेदवारांच्या हातात थेट एबी फॉर्म टेकविण्याच्या या खेळीमुळे सर्वपक्षीय इच्छुकांचा जीव मात्र टांगणीला लागला होता. मुंबईतील सर्व २३ वॉर्डांतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर इच्छुकांनी सर्व तयारीनिशी तळ ठोकला होता. मुंबईतील २२७ जागांसाठी शेवटची माहिती हाती येईपर्यंत २ हजार ७१८ इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले. युती आणि आघाडीतील पक्षांनी यंदा स्वबळाचा नारा दिल्याने सर्वच पक्षांसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान होते. त्यावर मात करण्यासाठी थेट एबी फॉर्म वितरित करण्याचे धोरण राजकीप पक्षांनी स्वीकारले. शेवटचा दिवस उजाडला तरी पक्षाकडून निरोप येत नसल्याने इच्छुकांनी मात्र अपक्ष म्हणून अर्ज भरण्यास सुरुवात केली. एबी फॉर्म मिळाला तर पक्षाचे अधिकृत उमेदवार अन्यथा अपक्ष लढायचे या इराद्याने अनेकांनी अर्ज दाखल केले. गुरुवारपर्यंत केवळ १६० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. शुक्रवारी शेवटच्या दिवशी मात्र हा आकडा दोन हजारांच्या पुढे गेला. शेवटची माहिती हाती आली तेव्हा मुंबईतील २३ वॉर्डांमधून २ हजार ७१८ अर्ज निवडणूक आयोगाला प्राप्त झाले होते. मंगळवारी, ७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत बंडखोरांना शांत करण्याचे मोठे आव्हान सर्व पक्षांसमोर असणार आहे. बंडखोरांना चुचकारण्याचे आव्हानपक्षाचे तिकीट न मिळाल्याने अनेक ठिकाणी नाराजांनी बंडाचा झेंडा उभारला. त्यामुळे आता नाराजांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान सर्वच पक्षांसमोर आहे. मंगळवार, ७ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोय असल्याने तोपर्यंत बंडोबांना थंड करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेसचे घोळात घोळमन बदला, मुंबई बदलेल अशी हाक देत काँग्रेसने मुंबईतील शिवसेना-भाजपाची सत्ता उलथवण्याची हाक दिली. मात्र गटबाजीने पोखरलेल्या नेत्यांची मने मात्र जुळली नाहीत. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुंबई काँग्रेसमधील राडा सुरूच राहिला. ११५ उमेदवारांची जाहीर केलेली पहिली यादी स्थगित करण्याची नामुष्की पक्षावर ओढावली. गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत डेरेदाखल झालेले पक्षाचे केंद्रीय नेते भूपिंदर हुड्डा यांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मुंबईतील सर्व सहा जिल्हाध्यक्षांसोबत मॅरेथॉन बैठका केल्या. या चर्चेनंतर संबंधित उमेदवारांपर्यंत एबी फॉर्म पोहोचविण्यासाठी धावाधाव करावी लागली.‘मातोश्री’वर खलबते मतदारसंघ पुनर्रचनेचा फटका बसल्याने शिवसेनेच्या दिग्गज उमेदवारांचे शेजारच्या प्रभागांमध्ये पुनर्वसन करावे लागले. मात्र, या पुनर्वसन मोहिमेला स्थानिक शिवसैनिकांनी आणि इच्छुकांनी कडाडून विरोध केला. मावळत्या महापौर स्नेहल आंबेकर, युवासेनेचे अमेय घोले, किशोरी पेडणेकर आदींच्या उमेदवारीला तीव्र विरोध झाला. अखेर ‘मातोश्री’ने गुरुवारी रात्री बंडखोरांसाठी चर्चेचे दरवाजे उघडले. ‘मातोश्री’वरून सबुरीचा सल्ला आल्यानंतर मात्र शिवसैनिकांनी विरोधाची तलवार म्यान केली. काही ठिकाणी अपक्ष अर्ज दाखल झाले असले तरी ७ तारखेपूर्वी अर्ज मागे घेतले जातील, असे वरळी विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांनी स्पष्ट केले.