शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

मुंबई महानगर पालिकेच्या रिंगणात २ हजार ‘पहिलवान’

By admin | Updated: February 4, 2017 04:46 IST

बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी यादी जाहीर न करण्याचा हातखंडा अवलंबला. त्याऐवजी उमेदवारांच्या हातात थेट एबी फॉर्म

- गौरीशंकर घाळे, मुंबई

बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी यादी जाहीर न करण्याचा हातखंडा अवलंबला. त्याऐवजी उमेदवारांच्या हातात थेट एबी फॉर्म टेकविण्याच्या या खेळीमुळे सर्वपक्षीय इच्छुकांचा जीव मात्र टांगणीला लागला होता. मुंबईतील सर्व २३ वॉर्डांतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर इच्छुकांनी सर्व तयारीनिशी तळ ठोकला होता. मुंबईतील २२७ जागांसाठी शेवटची माहिती हाती येईपर्यंत २ हजार ७१८ इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले. युती आणि आघाडीतील पक्षांनी यंदा स्वबळाचा नारा दिल्याने सर्वच पक्षांसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान होते. त्यावर मात करण्यासाठी थेट एबी फॉर्म वितरित करण्याचे धोरण राजकीप पक्षांनी स्वीकारले. शेवटचा दिवस उजाडला तरी पक्षाकडून निरोप येत नसल्याने इच्छुकांनी मात्र अपक्ष म्हणून अर्ज भरण्यास सुरुवात केली. एबी फॉर्म मिळाला तर पक्षाचे अधिकृत उमेदवार अन्यथा अपक्ष लढायचे या इराद्याने अनेकांनी अर्ज दाखल केले. गुरुवारपर्यंत केवळ १६० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. शुक्रवारी शेवटच्या दिवशी मात्र हा आकडा दोन हजारांच्या पुढे गेला. शेवटची माहिती हाती आली तेव्हा मुंबईतील २३ वॉर्डांमधून २ हजार ७१८ अर्ज निवडणूक आयोगाला प्राप्त झाले होते. मंगळवारी, ७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत बंडखोरांना शांत करण्याचे मोठे आव्हान सर्व पक्षांसमोर असणार आहे. बंडखोरांना चुचकारण्याचे आव्हानपक्षाचे तिकीट न मिळाल्याने अनेक ठिकाणी नाराजांनी बंडाचा झेंडा उभारला. त्यामुळे आता नाराजांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान सर्वच पक्षांसमोर आहे. मंगळवार, ७ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोय असल्याने तोपर्यंत बंडोबांना थंड करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेसचे घोळात घोळमन बदला, मुंबई बदलेल अशी हाक देत काँग्रेसने मुंबईतील शिवसेना-भाजपाची सत्ता उलथवण्याची हाक दिली. मात्र गटबाजीने पोखरलेल्या नेत्यांची मने मात्र जुळली नाहीत. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुंबई काँग्रेसमधील राडा सुरूच राहिला. ११५ उमेदवारांची जाहीर केलेली पहिली यादी स्थगित करण्याची नामुष्की पक्षावर ओढावली. गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत डेरेदाखल झालेले पक्षाचे केंद्रीय नेते भूपिंदर हुड्डा यांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मुंबईतील सर्व सहा जिल्हाध्यक्षांसोबत मॅरेथॉन बैठका केल्या. या चर्चेनंतर संबंधित उमेदवारांपर्यंत एबी फॉर्म पोहोचविण्यासाठी धावाधाव करावी लागली.‘मातोश्री’वर खलबते मतदारसंघ पुनर्रचनेचा फटका बसल्याने शिवसेनेच्या दिग्गज उमेदवारांचे शेजारच्या प्रभागांमध्ये पुनर्वसन करावे लागले. मात्र, या पुनर्वसन मोहिमेला स्थानिक शिवसैनिकांनी आणि इच्छुकांनी कडाडून विरोध केला. मावळत्या महापौर स्नेहल आंबेकर, युवासेनेचे अमेय घोले, किशोरी पेडणेकर आदींच्या उमेदवारीला तीव्र विरोध झाला. अखेर ‘मातोश्री’ने गुरुवारी रात्री बंडखोरांसाठी चर्चेचे दरवाजे उघडले. ‘मातोश्री’वरून सबुरीचा सल्ला आल्यानंतर मात्र शिवसैनिकांनी विरोधाची तलवार म्यान केली. काही ठिकाणी अपक्ष अर्ज दाखल झाले असले तरी ७ तारखेपूर्वी अर्ज मागे घेतले जातील, असे वरळी विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांनी स्पष्ट केले.