शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

वसतिगृहातून पळालेल्या दोन विद्यार्थिनी कर्जतला सापडल्या

By admin | Updated: July 18, 2016 20:24 IST

पाटोदा येथील शासकीय वसतिगृहातून सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी रविवारी पलायन केले होते. त्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सोमवारी आढळल्या.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. १८ -  पाटोदा येथील शासकीय वसतिगृहातून सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी रविवारी पलायन केले होते. त्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सोमवारी आढळल्या. या घटनेने खळबळ उडाली असून वसतिगृृहाच्या सुरक्षेचे धिंंडवडे निघाले आहेत.पळालेल्या दोन्ही मुली चुलतबहिणी असून त्या आता पालकांकडे आहेत. शहरातील रेणुका मंदिराजवळ अनुसूचित जाती व नवबौद्धमुलींसाठीचे वसतिगृह आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी इमारत बांधण्यात आली असून त्यात शिक्षण व निवासाची सोय आहे. तेथे पाचवी ते दहावीपर्यंतच्या दीडशे मुली आहेत. पळालेल्या दोन्ही मुली माजलगाव तालुक्यातील मांडवगणच्या रहिवाशी आहेत. त्यांचे आई - वडील श्रीगोंदा तालुक्यात मोलमजुरी करुन उदरनिर्वाह भागवतात. रविवारी दुपारी त्या दोघी शौचालयाच्या निमित्ताने गेल्या होत्या. सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून त्यांनी खिडकीची काच फोडून संरक्षक भिंतीवरुन उड्या मारुन पलायन केले. इकडे दोन विद्यार्थिंनींच्या पलायनाने अधीक्षक एस. एन. पोथे यांच्यासह कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. दोन्ही विद्यार्थिनी बसमधून कर्जतमध्ये पोहोचल्या. तेथे त्या श्रीगोंदा येथे जाणारी बस शोधत भटकत होत्या. एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्याने त्यांना पाहिले. त्यांची चौकशी केल्यावर त्या पळून आल्याचे उघड झाले. त्यांनी दोघींनाही कार्यालयात बसविले. त्यांच्याकडून पालकांचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळवून त्यांना सूखरुप पालकांच्या स्वाधीन केले. त्यामुळे वसतिगृह प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला.आयुक्त, तहसीलदारांची भेटया घटनेनंतर सोमवारी समाजकल्याणचे सहायक आयुक्त आर. एम. शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे यांनी वसतिगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी अधीक्षक पोथे यांना सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याबद्दल विचारणा करुन लेखी मागितले. तरीही निष्काळजीपणाआठ महिन्यांपूर्र्वी एक मुलगी पळून गेली होती. सुरक्षा रक्षकही गायब होता. त्यामुळे सुरक्षा रक्षकावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली होती. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना नोटीसही बजावली होती. असे असतानाही दोन विद्यार्थिनींनी पलायनाचे धाडस केले. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न कायम आहे.