शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

वसतिगृहातून पळालेल्या दोन विद्यार्थिनी कर्जतला सापडल्या

By admin | Updated: July 18, 2016 20:24 IST

पाटोदा येथील शासकीय वसतिगृहातून सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी रविवारी पलायन केले होते. त्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सोमवारी आढळल्या.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. १८ -  पाटोदा येथील शासकीय वसतिगृहातून सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी रविवारी पलायन केले होते. त्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सोमवारी आढळल्या. या घटनेने खळबळ उडाली असून वसतिगृृहाच्या सुरक्षेचे धिंंडवडे निघाले आहेत.पळालेल्या दोन्ही मुली चुलतबहिणी असून त्या आता पालकांकडे आहेत. शहरातील रेणुका मंदिराजवळ अनुसूचित जाती व नवबौद्धमुलींसाठीचे वसतिगृह आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी इमारत बांधण्यात आली असून त्यात शिक्षण व निवासाची सोय आहे. तेथे पाचवी ते दहावीपर्यंतच्या दीडशे मुली आहेत. पळालेल्या दोन्ही मुली माजलगाव तालुक्यातील मांडवगणच्या रहिवाशी आहेत. त्यांचे आई - वडील श्रीगोंदा तालुक्यात मोलमजुरी करुन उदरनिर्वाह भागवतात. रविवारी दुपारी त्या दोघी शौचालयाच्या निमित्ताने गेल्या होत्या. सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून त्यांनी खिडकीची काच फोडून संरक्षक भिंतीवरुन उड्या मारुन पलायन केले. इकडे दोन विद्यार्थिंनींच्या पलायनाने अधीक्षक एस. एन. पोथे यांच्यासह कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. दोन्ही विद्यार्थिनी बसमधून कर्जतमध्ये पोहोचल्या. तेथे त्या श्रीगोंदा येथे जाणारी बस शोधत भटकत होत्या. एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्याने त्यांना पाहिले. त्यांची चौकशी केल्यावर त्या पळून आल्याचे उघड झाले. त्यांनी दोघींनाही कार्यालयात बसविले. त्यांच्याकडून पालकांचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळवून त्यांना सूखरुप पालकांच्या स्वाधीन केले. त्यामुळे वसतिगृह प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला.आयुक्त, तहसीलदारांची भेटया घटनेनंतर सोमवारी समाजकल्याणचे सहायक आयुक्त आर. एम. शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे यांनी वसतिगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी अधीक्षक पोथे यांना सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याबद्दल विचारणा करुन लेखी मागितले. तरीही निष्काळजीपणाआठ महिन्यांपूर्र्वी एक मुलगी पळून गेली होती. सुरक्षा रक्षकही गायब होता. त्यामुळे सुरक्षा रक्षकावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली होती. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना नोटीसही बजावली होती. असे असतानाही दोन विद्यार्थिनींनी पलायनाचे धाडस केले. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न कायम आहे.