शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

ओझरखेड धरणात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

By admin | Updated: June 1, 2016 22:47 IST

येथील जीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ओझरखेड धरणात बुडून अंत झाला. कौस्तुभ आगळे व अक्षय जगताप अशी मृतांची नावे आहेत.

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 1 -  येथील जीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ओझरखेड धरणात बुडून अंत झाला. कौस्तुभ आगळे व अक्षय जगताप अशी मृतांची नावे आहेत. कौस्तुभ रवींद्र आगळे (२२, रा. इंदिरानगर, नाशिक), अक्षय राजेंद्र जगताप (२३, रा. पाथर्डी फाटा, नाशिक), अजिंक्य प्रकाश सोनवणे (२४, रा. सिडको, नाशिक) व अक्षय विवेक रनाळकर (२४, रा. विनयनगर, नाशिक) असे चौघे मित्र दोन दुचाकीवरून ‘सिनेमा बघण्यासाठी जात आहोत’ असे कुटुंबियांना सांगून घरून निघाले. दरम्यानच्या काळात नाशिक-वणी रस्त्यावरून ते ओझरखेड धरण परिसरात पोहचले. त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जेवण घेतल्यानंतर ओझरखेड धरणातील सप्तशृंग उपसा जलसिंचन पाणीवापर संस्थेच्या लिप्टलगत ते चौघे गेले. त्याठिकाणी अंघोळीसाठी कौस्तुभ रवींद्र आगळे व अक्षय राजेंद्र जगताप हे दोघे पाण्यात उतरले, तर अजिंक्य सोनवणे व अक्षय रनाळकर पाण्याबाहेर थांबले. पाण्यात चालत पुढे जात असताना आगळे व जगताप दोघेही गाळात अडकले. ते दृश्य पाहून त्यांच्या मित्रांनी मदतीसाठी हॉटेल परिसरातील ग्रामस्थांना आवाज दिला. काही तरुणांनी पाण्यात उड्या मारून त्या दोघांचा शोध घेतला. काही वेळाने ते दोघेही मृतावस्थेत आढळून आले.