शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

पानसरे खटल्यात दोन सरकारी वकील

By admin | Updated: April 21, 2016 05:09 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणाशी संबंधित खटल्यात कोल्हापुरात एक व उच्च न्यायालयात दुसरे असे दोन सरकारी वकील बाजू मांडणार आहेत.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणाशी संबंधित खटल्यात कोल्हापुरात एक व उच्च न्यायालयात दुसरे असे दोन सरकारी वकील बाजू मांडणार आहेत. पुण्याचे ज्येष्ठ विधिज्ञ हर्षद निंबाळकर हे मुख्य खटल्यात सरकार पक्षाची बाजू मांडत आहेत. त्यामुळे त्यांनाच संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावरील दाव्यांतही नियुक्त करावे, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली होती, परंतु सरकारने त्यांच्याऐवजी अतिरिक्त अ‍ॅडव्होकेट जनरल अनिल सिंग यांची नियुक्ती केली आहे. मेघा पानसरे यांना मुख्यमंत्री कार्यालयातून तसे सांगण्यात आले.या खटल्यात सरकार पक्षाकडून भक्कमपणे बाजू मांडली जावी, म्हणून पानसरे कुटुंबीयांनीच आग्रह धरल्यावर निंबाळकर यांची सरकारने या खटल्यात नियुक्ती केली. खुनाचा मुख्य खटला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे, त्यामध्ये ते सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडत आहेत. त्यांना या खटल्यातील बारकावे माहीत आहेत व त्यांनीच उच्च न्यायालयातही बाजू मांडली तर जास्त योग्य ठरेल, असे पानसरे कुटुंबीयांचे म्हणणे होत, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कळविण्यात आले होते, परंतु उच्च न्यायालयातील दाव्यात अतिरिक्त अ‍ॅडव्होकेट जनरल अनिल सिंग हे बाजू मांडतील, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे. या खटल्यातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाड याला लवकर जामीन मिळावा, अशी मागणी करणारा हा खटला आहे. सनातन संस्थेच्या वतीने अ‍ॅड. संजीव पुनाळकर यांनी ती याचिका दाखल केली आहे. (प्रतिनिधी)