शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

डायरीतली दोन पानं...

By admin | Updated: October 10, 2014 23:35 IST

सरकारनामा

आज पप्पू उगाच नको ते बोलला. मतदान पाच-सहा दिवसांवर आलं असताना पत्रकार परिषद घेऊन साहेब आणि त्या इस्लामपूरकरावर आगपाखड केली. या पप्पूला आताच बोलायची काय गरज होती? बोलला दोघांवर, पण अडचणीत येणार सगळेच. त्याला आता पाच वर्षं काही काम नाही. डिप्रेशनमध्ये दिसतोय. लोकसभेला पडल्यापासून त्याचं असं सुरू आहे. आम्ही निवडून येतोय म्हटल्यावर, तर त्याचं फ्रस्ट्रेशन वाढलंय. यावेळी वातावरण चांगलं असताना ‘मला नाही, तुला नाही, घाल तिसऱ्याला’ असं करून डाव विस्कटायला या पप्पूचं काय जातंय? त्याला निवडणुकीत दोन महिने सिमल्याला पाठवून दे, असं विशालला आधीच सांगितलं होतं. ‘प्रतीक, असं करू नकोस, कशाला त्या शेट्टी-फिट्टी गँगच्या नादाला लागलायस?’ असं सांगूनही ऐकत नाही. आधी आपलं बस्तान बसवावं, मग बाकीच्यांच्या मागं लागावं, इतरांचे देव उठवावेत, हे याला कधी कळणार? काय करावं कळत नाही. साहेब आम्हाला ओव्हरटेक करतायत, हे मला दिसत नाही काय? पण ही वेळ नाही ना... पप्पूबाबत साहेबांचा आणि विश्वजितचा मगाशीच फोन येऊन गेला. आता त्याला एखादी नवी स्पोर्टस् कार घेऊन द्यावी का, असं वाटायला लागलंय. कार घेऊन दिल्यावर जाईल लाँग ड्राईव्हवर... नाहीतर बसंल खोलून मॉडीफाय करत... चार दिवस घोर तर राहणार नाही. बघू, उद्या सकाळी ठरवू... सुरेशअण्णाचा फोन का यायला लागलाय?... परवा म्हणत होता, कमळासाठी माझा बळी दिलाय म्हणून... खुळंच दिसतंय... सांगत होतो, ऐकलं नाही त्यावेळेला... बघू काय म्हणतोय...(डायरीतलं दि. ९ आॅक्टोबरचं फाडलेलं हे पान भाऊंच्या ‘विजय’ बंगल्याच्या काटेरी कुंपणात अडकलं होतं... एकच पान सापडल्यानं पुढचा मजकूर काही कळला नाही. काही ठिकाणी फुल्या मारल्या होत्या. तेथे बहुदा कोणते शब्द वापरायचे हे ठरले नसेल. काही ठिकाणी खाडाखोडही दिसत होती. उद्या मानसिक आरोग्य दिन असल्याची तळटीप मात्र ठळक करण्यात आली होती. )-(आणि हे दुसऱ्या डायरीतलं दि. ९ आॅक्टोबरचंच पान. अर्थात फाडून टाकलेलं नसलं तरी व्हॉटस् अ‍ॅपवरून सगळीकडं फिरत असलेलं...)  आज सकाळी सुधीर, सुरेंद्रदादा यांच्यामार्फत साहित्य पाठवलंय. घोरपडे सरकारांनी तंगी असल्याचं रात्री सांगितलं होतं. त्यांना पक्षाकडनं मटेरियल आलं तरी ते पुरेना म्हणे! मोदी येऊन गेल्यावर उलट आबालाच सहानुभूती मिळत असल्याचं काका म्हणत होते. तसंच दिसतंय. त्यामुळं सरकारांनी हात पसरलाय वाटतं. मागच्या लोकसभेची बाकी अजून राहिलीय, त्याचं काय? तरी बरं, अमरबापूनं अजून काही मागितलं नाही! दुपारी जगतापसाहेबांनी जतच्या मटण लोणच्याचा डबा पाठवला होता. झणझणीत होतं. जिभेच्या बाभळी गेल्या. गुळमुळीत बोलून-बोलून अजीर्ण झालं होतं. त्या दिवशी गडकरींनी कामेरीत येताना नागपूरवरून आणलेलं सावजीचं मटण आणि वडाभातही बेस्ट होता.मानसिंगभाऊला सांगितलंय, शेवटच्या चार दिवसांत धुरळा पाड म्हणून. महाडिक कंपनीचं काहीतरी बघितलं पाहिजे. देशमुखांकडनं निरोप आलाय, शिवाय घरातली कुरकूर आहेच, त्यामुळं भाऊकडं (सत्यजित नव्हे मानसिंग) नीट लक्ष देता येईना. देशमुखांविरोधात स्टेजवरूनही बोलता येत नाही. पण मानसिंगभाऊची आणि आटपाडीची सीट काढायचं घोंगडं मोठ्या साहेबांनी गळ्यात अडकवलंय. सांगलीत आमचा लोच्या झालाय, असं सुरेशअण्णा म्हणतायत म्हणे! अजितदादाकडंनं तिकीट आणतात काय? मलाही तेच पाहिजे होतं. कुणाचा ‘कार्यक्रम’ करायचाय, हे अण्णांना आधीच सांगितलं होतं. पण ऐकायला नको? बजाज कंपनी, भालचंद्र, दिग्विजयला ते माहीत आहे, म्हणून बरं. त्यांनी सगळ्यांना निरोप पोहोचलाय की नाही, ते उद्या तपासायला पाहिजे. सोमवारनंतर फिरवाफिरवी करायला लागेल. कदमसाहेबांची आणि माझी भेट झाल्याच्या कालच्या व्हॉटस् अ‍ॅपवरच्या मेसेजनंतर प्रतीक बिथरला आणि त्यानं प्रेसपुढं दंगा केला. आम्ही होनमोरेला पळवल्यापासून आणि जितेंदरनं दगा दिल्यापासून त्याची गडबड सुरू झालीय. आपल्याला हवं तसं घडतंय. दादा फॅमिलीत भांडणं लागलीच पाहिजेत. कदमसाहेबांना रात्री बारानंतर फोन करायचाय. पावणेबारा झालेत. चला, लिहायचं थांबवून बाहेर पडू... बरीच कामं बाकी आहेत.शूऽऽऽ हे कुणाच्या डायरीतलं पान आहे, हे ओळखलंच असेल!)- श्रीनिवास नागे