शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

डायरीतली दोन पानं...

By admin | Updated: October 10, 2014 23:35 IST

सरकारनामा

आज पप्पू उगाच नको ते बोलला. मतदान पाच-सहा दिवसांवर आलं असताना पत्रकार परिषद घेऊन साहेब आणि त्या इस्लामपूरकरावर आगपाखड केली. या पप्पूला आताच बोलायची काय गरज होती? बोलला दोघांवर, पण अडचणीत येणार सगळेच. त्याला आता पाच वर्षं काही काम नाही. डिप्रेशनमध्ये दिसतोय. लोकसभेला पडल्यापासून त्याचं असं सुरू आहे. आम्ही निवडून येतोय म्हटल्यावर, तर त्याचं फ्रस्ट्रेशन वाढलंय. यावेळी वातावरण चांगलं असताना ‘मला नाही, तुला नाही, घाल तिसऱ्याला’ असं करून डाव विस्कटायला या पप्पूचं काय जातंय? त्याला निवडणुकीत दोन महिने सिमल्याला पाठवून दे, असं विशालला आधीच सांगितलं होतं. ‘प्रतीक, असं करू नकोस, कशाला त्या शेट्टी-फिट्टी गँगच्या नादाला लागलायस?’ असं सांगूनही ऐकत नाही. आधी आपलं बस्तान बसवावं, मग बाकीच्यांच्या मागं लागावं, इतरांचे देव उठवावेत, हे याला कधी कळणार? काय करावं कळत नाही. साहेब आम्हाला ओव्हरटेक करतायत, हे मला दिसत नाही काय? पण ही वेळ नाही ना... पप्पूबाबत साहेबांचा आणि विश्वजितचा मगाशीच फोन येऊन गेला. आता त्याला एखादी नवी स्पोर्टस् कार घेऊन द्यावी का, असं वाटायला लागलंय. कार घेऊन दिल्यावर जाईल लाँग ड्राईव्हवर... नाहीतर बसंल खोलून मॉडीफाय करत... चार दिवस घोर तर राहणार नाही. बघू, उद्या सकाळी ठरवू... सुरेशअण्णाचा फोन का यायला लागलाय?... परवा म्हणत होता, कमळासाठी माझा बळी दिलाय म्हणून... खुळंच दिसतंय... सांगत होतो, ऐकलं नाही त्यावेळेला... बघू काय म्हणतोय...(डायरीतलं दि. ९ आॅक्टोबरचं फाडलेलं हे पान भाऊंच्या ‘विजय’ बंगल्याच्या काटेरी कुंपणात अडकलं होतं... एकच पान सापडल्यानं पुढचा मजकूर काही कळला नाही. काही ठिकाणी फुल्या मारल्या होत्या. तेथे बहुदा कोणते शब्द वापरायचे हे ठरले नसेल. काही ठिकाणी खाडाखोडही दिसत होती. उद्या मानसिक आरोग्य दिन असल्याची तळटीप मात्र ठळक करण्यात आली होती. )-(आणि हे दुसऱ्या डायरीतलं दि. ९ आॅक्टोबरचंच पान. अर्थात फाडून टाकलेलं नसलं तरी व्हॉटस् अ‍ॅपवरून सगळीकडं फिरत असलेलं...)  आज सकाळी सुधीर, सुरेंद्रदादा यांच्यामार्फत साहित्य पाठवलंय. घोरपडे सरकारांनी तंगी असल्याचं रात्री सांगितलं होतं. त्यांना पक्षाकडनं मटेरियल आलं तरी ते पुरेना म्हणे! मोदी येऊन गेल्यावर उलट आबालाच सहानुभूती मिळत असल्याचं काका म्हणत होते. तसंच दिसतंय. त्यामुळं सरकारांनी हात पसरलाय वाटतं. मागच्या लोकसभेची बाकी अजून राहिलीय, त्याचं काय? तरी बरं, अमरबापूनं अजून काही मागितलं नाही! दुपारी जगतापसाहेबांनी जतच्या मटण लोणच्याचा डबा पाठवला होता. झणझणीत होतं. जिभेच्या बाभळी गेल्या. गुळमुळीत बोलून-बोलून अजीर्ण झालं होतं. त्या दिवशी गडकरींनी कामेरीत येताना नागपूरवरून आणलेलं सावजीचं मटण आणि वडाभातही बेस्ट होता.मानसिंगभाऊला सांगितलंय, शेवटच्या चार दिवसांत धुरळा पाड म्हणून. महाडिक कंपनीचं काहीतरी बघितलं पाहिजे. देशमुखांकडनं निरोप आलाय, शिवाय घरातली कुरकूर आहेच, त्यामुळं भाऊकडं (सत्यजित नव्हे मानसिंग) नीट लक्ष देता येईना. देशमुखांविरोधात स्टेजवरूनही बोलता येत नाही. पण मानसिंगभाऊची आणि आटपाडीची सीट काढायचं घोंगडं मोठ्या साहेबांनी गळ्यात अडकवलंय. सांगलीत आमचा लोच्या झालाय, असं सुरेशअण्णा म्हणतायत म्हणे! अजितदादाकडंनं तिकीट आणतात काय? मलाही तेच पाहिजे होतं. कुणाचा ‘कार्यक्रम’ करायचाय, हे अण्णांना आधीच सांगितलं होतं. पण ऐकायला नको? बजाज कंपनी, भालचंद्र, दिग्विजयला ते माहीत आहे, म्हणून बरं. त्यांनी सगळ्यांना निरोप पोहोचलाय की नाही, ते उद्या तपासायला पाहिजे. सोमवारनंतर फिरवाफिरवी करायला लागेल. कदमसाहेबांची आणि माझी भेट झाल्याच्या कालच्या व्हॉटस् अ‍ॅपवरच्या मेसेजनंतर प्रतीक बिथरला आणि त्यानं प्रेसपुढं दंगा केला. आम्ही होनमोरेला पळवल्यापासून आणि जितेंदरनं दगा दिल्यापासून त्याची गडबड सुरू झालीय. आपल्याला हवं तसं घडतंय. दादा फॅमिलीत भांडणं लागलीच पाहिजेत. कदमसाहेबांना रात्री बारानंतर फोन करायचाय. पावणेबारा झालेत. चला, लिहायचं थांबवून बाहेर पडू... बरीच कामं बाकी आहेत.शूऽऽऽ हे कुणाच्या डायरीतलं पान आहे, हे ओळखलंच असेल!)- श्रीनिवास नागे