शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

दोन महिन्यापासून शिक्षक पगारापासून वंचित

By admin | Updated: May 7, 2014 20:57 IST

मार्च व एप्रिल या दोन महिन्यांचे संपूर्ण शिक्षकांचे पगार अद्यापही झालेले नाहीत. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळामध्ये सर्व शिक्षक आर्थिक तंगीचा सामना करीत आहेत.

सिंदखेडराजा : मार्च व एप्रिल या दोन महिन्यांचे संपूर्ण शिक्षकांचे पगार अद्यापही झालेले नाहीत. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळामध्ये सर्व शिक्षक आर्थिक तंगीचा सामना करीत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार महिन्याच्या १ तारखेलाच पगार होणे अपेक्षित आहे. परंतु अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मनमानीमुळे शिक्षक बांधवांना कृत्रिम आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शालार्थ वेतन प्रणालीचे कारण पुढे करुन जिल्हा व तालुका शिक्षण विभाग परस्परांवर दोष ठेवून पगाराच्या विलंबाचे समर्थन करीत आहेत. शालार्थ वेतन प्रणालीमध्ये कामाच्या नियोजनाचा अभाव असल्यामुळे या कामाला पाच महिन्याचा उशिर झाला. त्याचे खापर मात्र शिक्षकांच्या माथी फोडण्यात येत आहे. संबंधित कर्मचार्‍यांना या ना त्या कारणामुळे दररोज घसघशीत पॉकेटमनी मिळत असल्यामुळे शिक्षकांच्या पगाराच्या निर्धारित तारखेचे त्यांना भान राहत नाही. जि.प. व पं.स. मधील शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांकडे या संदर्भात विचारणा केली असता त्यांच्याकडून टोलवा टोलवीची व परस्पर विसंगत विधाने ऐकायला मिळतात. पगार विलंबाला शिक्षक जबाबदार नसून शिक्षण विभागातील कर्मचारी जबाबदार आहेत. शिक्षकांचे दोन महिन्यांचे पगार थकले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षकांचे कुटूंबिय आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. तरी शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी तात्काळ निर्णय घेवून शिक्षकांचे दोन महिन्याचे पगार लवकरात लवकर अदा करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभेचे जिल्हाध्यक्ष टी.के.देशमुख, सरचिटणीस रविंद्र नादरकर यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)