शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये 1300 कोटींचे दोन उद्योग

By admin | Updated: August 10, 2014 02:33 IST

दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) या प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी अनेक विदेशी गुंतवणूकदारांनी उत्साह दाखविला

औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) या प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी अनेक विदेशी गुंतवणूकदारांनी उत्साह दाखविला असून प्रारंभीच औरंगाबादेतील शेंद्रा येथे जपान व जर्मनीच्या दोन कंपन्या येत आहेत. या कंपन्या येथे 13क्क् कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यांनी भूखंड खरेदी केल्याची माहिती एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी शनिवारी औरंगाबादेत आयोजित कार्यक्रमात दिली. 
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या पुढाकाराने शनिवारी एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात आयोजित ‘डीएमआयसी : औरंगाबादचा बदलता चेहरा’ या माहितीपर कार्यक्रमात ते बोलत होत़े व्यासपीठावर राजेंद्र दर्डा, उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर, डीएमआयसी, दिल्लीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, सीएमआयचे अध्यक्ष मुनीष शर्मा व मासिआचे अध्यक्ष भारत मोतिंगे उपस्थित होते. 
डीएमआयसी प्रकल्प नेमका काय आहे, तो केव्हा व कसा पूर्ण होईल, या प्रकल्पाची सद्य:स्थिती, त्यापासून भविष्यात होणारी रोजगारनिर्मिती,  गुंतवणूक, येणारे उद्योग आणि  शहराचे बदलणारे स्वरूप याचे एलसीडी प्रोजेक्टरद्वारे सविस्तर विश्लेषण करून उपस्थितांच्या प्रश्नांना गगराणी व चौधरी यांनी उत्तरेही दिली. 
औरंगाबादेत शेंद्रा व बिडकीन येथे या प्रकल्पांचे काम वेगात सुरू आहे. पहिल्या व दुस:या टप्प्यातील भूसंपादन संपले आहे. संकल्प चित्र, इंजिनिअरिंग मॉडेल तयार आहे. 8क्क् कोटींची पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. शेअर होल्डर, शेअर सपोर्ट करारावर स्वाक्ष:या झाल्या आहेत. अतिरिक्त चटई क्षेत्रची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. संपूर्ण फ्रेम वर्क तयार आहे. करमाडला मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क, एक्झीबिशेन सेंटरसाठी जागा निश्चित झाली आहे, असेही गगराणी यांनी स्पष्ट केले. प्रस्ताविक करताना शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले की, डीएमआयीसीमुळे 2क्2क् र्पयत अडीच लाख हातांना काम मिळणार आहे. त्यासाठी 1क् लाख कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील. कोणत्याही शहराचा, प्रदेशाचा विकास एक व्यक्ती किंवा सरकार करू शकत नाही. त्याला लोकसहभागाची गरज असते, असे त्यांनी सांगितल़े 
डीएमआयसीवरील माहिती व शहराचे भविष्यातील स्वरूप जाणून घेण्यासाठी शहरातील उद्योजक, व्यावसायिक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी) 
 
14 दिवस नव्हे, 14 तासांत
उत्पादन प्रक्रियेला मुख्यत: चालना देण्यासाठी उभारल्या जाणा:या डीएमआयसीमुळे दिल्ली ते मुंबईदरम्यान सहा राज्यांत मोठा औद्योगिक विकास होणार आहे. देशाच्या उत्तरेत तयार झालेले उत्पादन  मुंबईच्या गोदीत पाठविण्यासाठी सध्या 14 दिवसांचा कालावधी लागतो. डीएमआयसी पूर्ण कार्यान्वित झाल्यास ते केवळ 14 तासांत मुंबईला पोहोचणार आहे. कारण या प्रकल्पात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा समावेश आहे.