शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

दोनशे योजना होणार बंद!

By admin | Updated: February 22, 2015 01:32 IST

वर्षानुवर्षे सुरू असलेल्या कालबाह्ण तसेच पुनरावृत्ती होत असलेल्या योजना बंद करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरु केल्या आहेत. किमान २०० योजना बंद केल्या जावू शकतात.

पुनरावृत्ती टाळणार : वैयक्तिक लाभार्थ्यांना वस्तू वाटप बंदयदु जोशी - मुंबईवर्षानुवर्षे सुरू असलेल्या कालबाह्ण तसेच पुनरावृत्ती होत असलेल्या योजना बंद करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरु केल्या आहेत. किमान २०० योजना बंद केल्या जावू शकतात. शिवाय, वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये वस्तू वाटपाऐवजी अनुदान देण्यावर भर देऊन कोट्यवधी रुपये वाचविण्याचा विचार प्राधान्याने सुरू झाला आहे. कोणत्याही लाभार्थीवर गदा न आणता शासकीय योजनांचे सुलभीकरण करण्यावर तसेच विविध योजना एकाच छताखाली आणण्याची भूमिका वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली असून त्यातून शासकीय योजनांची परिणामकारक आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नुसता लोकानुनय करण्याच्या नादात कंत्राटदारधार्जिण्या योजना राबवायच्या नाहीत, सरकारचे धोरण आहे. राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध विभाग आणि महामंडळांमार्फत वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबविल्या जातात. त्यात लाभार्थींपेक्षा कंत्राटदारांचेच भले अधिक होते. त्यापेक्षा लाभार्र्थींना थेट रोख अनुदान दिले तर संबंधित बाबीच्या खरेदीची मूभा त्याला मिळेल. कंत्राटदार, पुरवठादार यांच्याशी नोकरशाहीचे असलेले संगनमतही मोडित काढता येणार आहे. नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी गेल्या काही दिवसांपासून विविध विभागांच्या योजनांच्या आढाव्यासाठी बैठकी घेत आहेत. कोणत्या योजना एकत्रित करता येतील, पुनरावृत्ती कशी टाळता येईल यासंबंधी सूचना मागविल्या जात आहेत. एकच योजना ग्रामविकास विभाग, बांधकाम विभाग, कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या अशा अनेक योजना आहेत की ज्यांची पुनरावृत्ती होते. दुसरे उदाहरण घरांच्या योजनांचे. रमाई आवास योजना, राजीव आवास योजना, बीएसयुपी, म्हाडा, सिडकोच्या योजना एकाचवेळी असल्याने लाभार्थी गोंधळतात. च्अनेक योजना कालबाह्ण झाल्या आहेत. आदिवासींना ताडपत्री वाटप, शेतकऱ्यांना ५० वर्षांपूर्वी वापरात असलेल्या कृषी अवजारांचे वाटप ही त्याची काही उदाहरणे. च्अनेक शीर्ष (हेड) असे आहेत की ते हास्यास्पद आहेत. सरकारी दवाखान्यातील एमबीबीएस डॉक्टरच्या पगाराचा हेड वेगळा, बीएएमएस डॉक्टरचा हेड वेगळा तर नर्सच्या पगाराचा हेड वेगळा. या पद्धतीत प्रशासकीय काम वाढते, कोषागारावरील कामाचा बोजा वाढतो. आता हे हेड एकत्र करण्याचा (क्लब) विचार केला जात आहे.