शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 28, 2016 05:59 IST

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.लातूर जिल्ह्यातील येल्लोरी (ता. औसा) येथील जनार्दन पंढरी शेवाळे (६५) यांना येल्लोरी शिवारात १२ एकर शेती आहे. शेवाळे यांनी आपली सर्व शेतजमीन मुलांच्या नावावर केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शेतीतून काही उत्पन्न निघाले नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, अशी चिंता त्यांना होती. त्यातच उपवर मुलीचा विवाह कसा करायचा, या विवंचनेतून त्यांनी शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेऊन बुधवारी पहाटे जीवनयात्रा संपविली. दुसरी घटना हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील अकोली येथे घडली. येथील रामराव बापूराव कदम (४०) सततच्या नापिकीला कंटाळले होते. त्यातच बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे, याची चिंता त्यांना भेडसावत होती. याच चिंतेमध्ये कदम यांनी मंगळवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.