शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 28, 2016 05:59 IST

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.लातूर जिल्ह्यातील येल्लोरी (ता. औसा) येथील जनार्दन पंढरी शेवाळे (६५) यांना येल्लोरी शिवारात १२ एकर शेती आहे. शेवाळे यांनी आपली सर्व शेतजमीन मुलांच्या नावावर केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शेतीतून काही उत्पन्न निघाले नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, अशी चिंता त्यांना होती. त्यातच उपवर मुलीचा विवाह कसा करायचा, या विवंचनेतून त्यांनी शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेऊन बुधवारी पहाटे जीवनयात्रा संपविली. दुसरी घटना हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील अकोली येथे घडली. येथील रामराव बापूराव कदम (४०) सततच्या नापिकीला कंटाळले होते. त्यातच बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे, याची चिंता त्यांना भेडसावत होती. याच चिंतेमध्ये कदम यांनी मंगळवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.