शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: January 15, 2015 00:18 IST

बनेवाडीत एकाने घेतला गळफास : शेटफळेत डाळिंब बागायतदाराचे विषप्राशन

कवठेमहांकाळ /आटपाडी : विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रातही पसरू लागले आहे. आज, बुधवारी एकाचदिवशी सांगली जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी येथील प्रकाश जाधव या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून गळफास लावून घेतला, तर आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील डाळिंब बागायतदार विलास गायकवाड यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.बनेवाडी येथील प्रकाश विठोबा जाधव (वय ४०) या शेतकऱ्याने आज, बुधवारी कर्जाला कंटाळून घरी गळफास लावून आत्महत्या केली. मृत प्रकाश जाधव मूळचे कर्नाटकातील अथणी तालुक्यातील कात्राळ या गावचे असून, लहानपणापासूनच ते मामाकडे बनेवाडी या गावी राहत होते. त्यांचे मामा हरी शिंदे सैन्यात अधिकारी असून, त्यांनी जाधव यांच्या नावे दोन एकर जमीन करून दिली होती. त्या दोन एकरामध्ये प्रकाश जाधव यांनी द्राक्षे, डाळिंब आणि ऊस लावला आहे. या पिकांवर बँकेचे व विकास सोसायटीचे कर्ज काढले आहे. कर्जाची रक्कम चार लाखांच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले. द्राक्ष आणि डाळिंब बागेवर जाधव यांनी मोठा खर्च केला होता, मात्र अवकाळी पावसाच्या तडाख्यात बाग सापडली. रोगांनी पूर्ण बागच वाया गेल्याने ते चिंतेत होते. बँकेने आणि सोसायटीने कर्जफेडीबाबत त्यांच्याकडे विचारणा सुरू केली होती. या कर्जाला कंटाळूनच जाधव यांनी घरी तुळईला गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.शेटफळेतील डाळिंब बागायतदाराची नैराश्यातून आत्महत्या दुसरी आत्महत्या आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे घडली. ज्या डाळिंबाने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना लखपती होण्याचे स्वप्न दाखविले, ते डाळिंब यंदा उत्पादन खर्चाएवढंही उत्पन्न देऊ न शकल्याने आज शेटफळे येथील विलास ज्ञानू गायकवाड (वय ४२) या तरुण शेतकऱ्याने त्याच्या डाळिंबाच्या बागेतच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. कृषीविषयक पदव्युत्तर शिक्षण (एमएस्सी अ‍ॅग्री) घेऊन राहुरीला कृषी विद्यापीठात काही वर्षे प्राध्यापक म्हणून विलास गायकवाड नोकरी करीत होते.पाच वर्षांपूर्वी त्यांनी नोकरी सोडून शेटफळे येथे अत्याधुनिक पध्दतीने शेती करण्याचे ठरवून गाव गाठले. त्यांची डाळिंबाची २०० झाडे आहेत. सध्या तालुक्यात सर्वच शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागांवर कमी-अधिक प्रमाणात तेल्या रोगाचा प्रादुर्भाव आहे. विलास गायकवाड यांच्या बागेवरही तेल्याने विळखा घातला आहे. तेल्या रोगावर मात करण्यासाठी लाखो रुपये खर्चून महागडी कीडनाशके आणि बुरशीनाशके फवारून बाग यशस्वी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही.तेल्याचा प्रादुर्भाव झाल्याने डाळिंबाची फळे उलली. अशी उललेली फळे सध्या आटपाडीतील डाळिंबाच्या सौद्यात खरेदी केली जात नाहीत. अशी फळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणली, तरी ती व्यापारी नाकारतात. त्यामुळे शेतकऱ्यांना डाळिंबे फेकून द्यावी लागत आहेत. एवढा खर्च करूनही डाळिंबाच्या बागेत अपयश आल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली.काल (मंगळवारी) रात्री कुणास काही न सांगता विलास घरातून निघून गेले. त्यांचा मोबाईलही सायंकाळी चार वाजल्यानंतर बंद होता. आज सकाळी चंद्रभान गायकवाड यांना जनावरे घेऊन शेतात गेल्यावर त्यांचा मृतदेह दिसला. याबाबत विलास यांचे चुलत बंधू पोपट कृष्णा गायकवाड यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार ए. के. भवारी करीत आहेत.आधुनिक शास्त्राने शेती करून फायद्याची शेती करण्यासाठी विलासने डाळिंबाची बाग लावली. शेतातील एवढे शिक्षण घेऊन आणि आटोकाट प्रयत्न करूनही अपयश आल्याने त्याने मृत्यूला कवटाळले. डाळिंबानेच माझ्या भावाचा बळी घेतला.- पोपट गायकवाड, शेटफळे