शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवस टोलमाफी, शनिवार, रविवार बँका सुरू

By admin | Updated: November 10, 2016 06:22 IST

शनिवार आणि रविवारी बँका चालू राहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांची टीम तयार ठेवण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. ज्या बँकांना मदतीची गरज असेल तेथे ही टीम सहकार्य करेल.

मुंबई : ५०० व १००० रुपयांच्या चलनी नोटा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकदारांना अडचणी येऊ नयेत यासाठी देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील तसेच महाराष्ट्रातील सर्व राज्यमार्गांवरील टोल ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत माफ करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. खासगी रुग्णालयांनाही नोटा स्वीकारणे बंधनकारकसरकारी रु ग्णालयांसह खासगी रुग्णालयांनीही ५०० आणि १००० रु पयांच्या नोटा स्वीकारणे बंधनकारक आहे, असे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजार रु पयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र स्वत: आरोग्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, फक्त सरकारीच नव्हे, तर खासगी रु ग्णालयांनीही ५०० आणि १००० रु पयांच्या नोटा पुढील दोन दिवस स्वीकारल्या पाहिजेत.शनिवार आणि रविवारी बँका चालू राहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांची टीम तयार ठेवण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. ज्या बँकांना मदतीची गरज असेल तेथे ही टीम सहकार्य करेल. विनाकारण गर्दी करू नका - मुख्यमंत्रीबँका आणि पोस्टामध्ये ५०० आणि १००० च्या चलनी नोटा स्वीकारण्याची मुदत डिसेंबर अखेरपर्यंत आहे. यामुळे शेतकरी आणि गृहिणींच्या पैशाला कोणतीही बाधा येणार नाही. वैध मार्गाने मिळविलेला पैसा सुरक्षित राहणार असून त्यामुळे जनतेने गोंधळून जाऊ नये, तसेच गर्दी करू नये. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीघरखर्चासाठी ठेवलेले पैसे बिनदिक्कत बँकेत जमा कराजेटली म्हणाले की, गृहिणी आणि शेतकऱ्यांनी आपल्या अस्सल बचतीच्या पैशाबद्दल अजिबात काळजी करू नये. त्यांनी आपला पैसा बिनदिक्कतपणे बँकांत जमा करावा. अनेकदा घरखर्चासाठी पंचवीस-तीस हजार अथवा पन्नास हजारांपर्यंतच्या रकमा घरात ठेवल्या जातात. अशा रकमांबाबतही नागरिकांनी काळजी करू नये. त्यांनी आपल्याकडील नोटा बँकेत जमा कराव्यात.करातून सुटका नाहीबँकेत जमा करण्यात येणाऱ्या हजार-पाचशेच्या नोटांची करांतून सुटका होणार नाही. नोटा जमा करणाऱ्यांना आयकर कायद्याचे नियम लागू राहतील, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे धांदल उडाली. भाजी, औषधखरेदी, टोलनाके, व्यावसायिक आणि पेट्रोलपंपावर ग्राहकांची अडचण झाली. हजार-पाचशेच्या नोटांच्या माध्यमातून २.५ लाखांपेक्षा जास्त रकमेचा बँकेत भरणा करण्यात येणाऱ्या बेहिशोबी रकमेवर नियमित कर आणि २00 टक्के दंड आकारण्यात येणार आहे.पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या निर्णयाविरोधात बुधवारी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. चलनात येणाऱ्या दोन हजार रूपयांच्या नोटेत कोणतीही इलेक्ट्रानिक चीप नसल्याचा खुलासा रिझर्व्ह बँकेने केला.