शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

दोन दिवस टोलमाफी, शनिवार, रविवार बँका सुरू

By admin | Updated: November 10, 2016 06:22 IST

शनिवार आणि रविवारी बँका चालू राहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांची टीम तयार ठेवण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. ज्या बँकांना मदतीची गरज असेल तेथे ही टीम सहकार्य करेल.

मुंबई : ५०० व १००० रुपयांच्या चलनी नोटा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकदारांना अडचणी येऊ नयेत यासाठी देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील तसेच महाराष्ट्रातील सर्व राज्यमार्गांवरील टोल ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत माफ करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. खासगी रुग्णालयांनाही नोटा स्वीकारणे बंधनकारकसरकारी रु ग्णालयांसह खासगी रुग्णालयांनीही ५०० आणि १००० रु पयांच्या नोटा स्वीकारणे बंधनकारक आहे, असे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजार रु पयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र स्वत: आरोग्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, फक्त सरकारीच नव्हे, तर खासगी रु ग्णालयांनीही ५०० आणि १००० रु पयांच्या नोटा पुढील दोन दिवस स्वीकारल्या पाहिजेत.शनिवार आणि रविवारी बँका चालू राहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांची टीम तयार ठेवण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. ज्या बँकांना मदतीची गरज असेल तेथे ही टीम सहकार्य करेल. विनाकारण गर्दी करू नका - मुख्यमंत्रीबँका आणि पोस्टामध्ये ५०० आणि १००० च्या चलनी नोटा स्वीकारण्याची मुदत डिसेंबर अखेरपर्यंत आहे. यामुळे शेतकरी आणि गृहिणींच्या पैशाला कोणतीही बाधा येणार नाही. वैध मार्गाने मिळविलेला पैसा सुरक्षित राहणार असून त्यामुळे जनतेने गोंधळून जाऊ नये, तसेच गर्दी करू नये. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीघरखर्चासाठी ठेवलेले पैसे बिनदिक्कत बँकेत जमा कराजेटली म्हणाले की, गृहिणी आणि शेतकऱ्यांनी आपल्या अस्सल बचतीच्या पैशाबद्दल अजिबात काळजी करू नये. त्यांनी आपला पैसा बिनदिक्कतपणे बँकांत जमा करावा. अनेकदा घरखर्चासाठी पंचवीस-तीस हजार अथवा पन्नास हजारांपर्यंतच्या रकमा घरात ठेवल्या जातात. अशा रकमांबाबतही नागरिकांनी काळजी करू नये. त्यांनी आपल्याकडील नोटा बँकेत जमा कराव्यात.करातून सुटका नाहीबँकेत जमा करण्यात येणाऱ्या हजार-पाचशेच्या नोटांची करांतून सुटका होणार नाही. नोटा जमा करणाऱ्यांना आयकर कायद्याचे नियम लागू राहतील, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे धांदल उडाली. भाजी, औषधखरेदी, टोलनाके, व्यावसायिक आणि पेट्रोलपंपावर ग्राहकांची अडचण झाली. हजार-पाचशेच्या नोटांच्या माध्यमातून २.५ लाखांपेक्षा जास्त रकमेचा बँकेत भरणा करण्यात येणाऱ्या बेहिशोबी रकमेवर नियमित कर आणि २00 टक्के दंड आकारण्यात येणार आहे.पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या निर्णयाविरोधात बुधवारी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. चलनात येणाऱ्या दोन हजार रूपयांच्या नोटेत कोणतीही इलेक्ट्रानिक चीप नसल्याचा खुलासा रिझर्व्ह बँकेने केला.