शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

क्रूरकर्मा पित्याने छाटली दोन चिमुरड्यांची मुंडकी

By admin | Updated: October 31, 2016 19:20 IST

ऐन दिवाळीच्या दिवशी पोटच्या दोन चिमुकल्यांना शेतात नेऊन अत्यंत क्रूरपणे त्यांची मुंडकी कुऱ्हाडीने धडावेगळी करून हत्या केली.

ऑनलाइन लोकमत अमरावती, दि. 31 -  ऐन दिवाळीच्या दिवशी पोटच्या दोन चिमुकल्यांना शेतात नेऊन अत्यंत क्रूरपणे त्यांची मुंडकी कुऱ्हाडीने धडावेगळी करून हत्या केली.  इवल्याशा त्या बालकांचे मृतदेह ३०० फूट खोल दरीत फेकून हा क्रुरकर्मा पसार झाला. ही घटना चिखलदरा तालुक्यातील खडीमल येथे रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. घटना उघड झाल्यानंतर पाहणाऱ्यांच्या अंगाचा अक्षरश: थरकाप उडाला. सुधाकर भाऊ सावलकर (३०, रा. खडीमल) असे क्रूरकर्मा पित्याचे नाव असून आकाश सुधाकर सावलकर (१०) व आतिष सुधाकर सावलकर (८) अशी मृत चिमुरड्यांची नावे आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधाकर सावलकर याने दिवाळीच्या दिवशी (रविवारी) २.३० वाजता पोटच्या दोेन्ही गोळ्यांना शेतात नेले. तेथे कुऱ्हाडीने त्यांचे मुंडके छाटून त्यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने दोघांचेही मृतदेह डोलारदेव जंगल खंड क्रमांक २९४ अंतर्गत खडीमल गावाच्या पूर्वेला असलेल्या ३०० फूट खोल दरीत नेऊन टाकले. घटनेचा सुगावा लागू नये म्हणून त्याने दोन्ही मुलांचे मृतदेह झाडांच्या फांद्यांनी झाकून लपवून ठेवले होते.  आईला नव्हता थांगपत्ता-सुधाकर सावलकरची पत्नी व मोठी मुलगी दोघीही दिवाळीच्या कामांमध्ये रविवारी व्यस्त होत्या. रविवारी सायंकाळी ६ वाजता सुधाकर मुलांना न घेता एकटाच शेतातून परतला. सुधाकरच्या पत्नीने त्याला मुले कुठे आहेत, याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने मुले शेतात असल्याची थाप मारून वेळ मारून नेली. मात्र, सायंकाळी ७ वाजल्यानंतरही मुले शेतातून न परतल्याने सुधाकरची पत्नी, वडील व भावासह शेतात गेली. मात्र, तिथे तिला मुले आढळली नाहीत. पुन्हा सुधाकरला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा शेतातील ज्वारीच्या पिकामध्येच मुलांचा शोध सुरू केला. पश्चात सुधाकरला दमदाटी करून विचारणा केली असता त्याने ‘मुले देवाघरी गेली’ या शब्दांत बोळवण करून घटनास्थळावरून पळ काढला. गावकऱ्यांची रात्रभर शोधमोहीम-सुधाकरने मुलांना बेपत्ता केल्याची माहिती गावात पसरताच २०० च्या वर गावकऱ्यांनी एकत्र येऊन अख्खी रात्र काढून जंगल पिंजून काढले. मात्र, मुलांचा काहीही पत्ता लागला नाही. सोमवारी पहाटेपासून पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. डोंगरदेव जंगलानजीक दरीत काही लोक उतरले असता त्यांना दोन्ही मुलांचे शव आपट्याच्या पानांखाली लपवून ठेवल्याचे दिसून आले. निर्दयी पिता फरार -रविवारी दुपारी दोन्ही मुलांची निर्दयीपणे हत्या करून सुधाकर बेपत्ता झाला आहे. तो सहा महिन्यांपासून विमनस्क अवस्थेत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. घटनेची माहिती चिखलदरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चुर्णी येथील ग्रामीण रूग्णालयात रवाना केले. पोलीस सुधाकरचा शोध घेत आहेत. दरम्यान एका मुलाच्या अंगावर ‘डंबे’ (गरम विळ्याचे चटके) दिल्याच्या खुणा आढळल्याने हा प्रकार अंधश्रद्धेतून तर घडला नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहेत.