शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

मदरशातील दोन मुले बेपत्ता, पोलीस ठाण्यात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2016 14:37 IST

नंदनवनमधील एका मदरशातून दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. शोएब (वय ११ वर्ष) आणि रेहान

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 25 - नंदनवनमधील एका मदरशातून दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. शोएब (वय ११ वर्ष) आणि रेहान (वय ९ वर्षे) अशी बेपत्ता बालकांची नावे असून ते सख्खे भाऊ आहेत. ते पळून गेले की त्यांचे कुणी अपहरण केले, त्याचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब आणि रेहान बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरचे रहिवासी आहेत. त्यांना वडील नाही. घरची स्थिती जेमतेम असल्याने त्यांच्या आईला त्रास होत असल्याचे पाहून पारशिवनी (भोपाळ) येथील एका नातेवाईकाने त्यांना नागपूरच्या मदरशात शिकायला ठेवण्याचा निर्णय घेतला. मुलांना मात्र ते नको होते. आईला सोडून दुसरीकडे राहण्यास ते तयार नव्हते. तरीसुद्धा नातेवाईकाने २० डिसेंबरला त्यांना नंदनवनमधील शारदा नगर (खरबी) येथील मदरशात आणून सोडले. ते येथे राहायला तयार नसल्याचे पाहून त्यांचा दाखला (अ‍ॅडमिशन) करण्याचे टाळण्यात आले. ८ ते १० दिवस ठेवून बघायचे, त्यांचे मन लागले तर त्यांचा मदरशात दाखला करायचा अन्यथा त्यांना गावाला पोहचवून द्यायचे, असा विचार करून नातेवाईक निघून गेला. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास शोएब आणि रेहान मदरशातून बेपत्ता झाले.  ते गावातही पोहचले नाहीदोन तासानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर मदरशातील शिक्षक हाफीज अनवर कमाउद्दीन शेख (वय २२, रा. जामा मश्जिद, बाराशिवनी) यांनी नातेवाईकाला कळविले. दिवसभर शोधाशोध केल्यानंतर हाफिज यांनी शनिवारी नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक एस. राऊत यांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला. प्राथमिक चौकशीत हे दोघे त्यांच्या गावालाही पोहचले नसल्याचे उघड झाले. या दोघांचा शोध घेतला जात आहे.