शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे केरळची दोन मुले परतली घरी

By admin | Updated: March 19, 2017 01:09 IST

केरळमधून गायब झालेल्या दोन मुलांचा महिन्याभरापासून सुरु असलेला शोध अखेर संपला. मुंबई रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलांना कुर्ला रेल्वे टर्मिनस येथून ताब्यात घेण्यात आले होते.

मुंबई : केरळमधून गायब झालेल्या दोन मुलांचा महिन्याभरापासून सुरु असलेला शोध अखेर संपला. मुंबई रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलांना कुर्ला रेल्वे टर्मिनस येथून ताब्यात घेण्यात आले होते. रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिन्यापूर्वी लोकमान्य टिळक एक्स्प्रेसने कुर्ला टर्मिनसवर घाबरलेल्या अवस्थेतील ६ वर्षांचा आर्यन आणि ४ वर्षांची अमृताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मुलांची चौकशी केली असता ती मुले दक्षिणात्य भाषेत बोलत असल्यामुळे त्यांना काही समजले नाही. या मुलांना बाल कल्याण विभागाच्या ’बालमंदिर’ या चेंबूर येथील बालगृहात ठेवण्यात आले. येथे आलेल्या एका व्यक्तीने ओळखले की ही मुले मल्याळम भाषेत बोलत आहेत. यावेळी केरळ पोलिसांशी संपर्क साधल्यावर ते याच दोन मुलांना शोधात आहेत असल्याचे समजले.वर्षभरापूर्वी या मुलांच्या आई शोभा हिने प्रियकर मंजुनाथच्या मदतीने वडील राजू यांची हत्या केली होती. हत्येनंतर त्यांनी राजूचे शव जंगलात नेऊन जाळले. त्यानंतर शोभाने मंजुनाथला सोबत राहण्यासाठी आग्रह धरला. मात्र मंजुनाथने तिला नकार दिला. शोभापासून सुटण्यासाठी त्याने तिचाही काटा काढला. शोभाची महिन्याभरापूर्वी हत्या केली आणि तिचे शव एका विहिरीत टाकून दिले. केरळच्या इरिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे शव सापडल्यामुळे या हत्येची उकल करण्याची जबाबदारी सब इन्स्पेक्टर ए. अंशद यांच्याकडे सोपवण्यात आली. तपासादरम्यान त्यांना मंजुनाथचा सुगावा लागला आणि त्यांनी त्याला अटक केली. आपला गुन्हा कबूल केल्यानंतर मंजुनाथने सांगितले, शोभा आणि राजूच्या दोन मुलांना त्याने बेंगलोर येथून एका ट्रेनमध्ये बसवून दिले, त्या नंतर ती मुले कुठे गेली ते त्याला माहित नव्हते. सब इन्स्पेक्टर ए. अंशद आणि त्यांच्या सर्वत्र त्यांचे फोटो पाठवले होते. (प्रतिनिधी)आत्याने स्वीकारली जबाबदारीगुरुवारी ए. अंशद यांच्या नेतृत्वात केरळ पोलिसांची टीम, मुलांची आत्या काव्या आणि तिचे पती मुंबईत आले. शुक्रवारी चाइल्ड वेल्फेअर कमिटीच्या समोर मुलांची आत्या काव्या हिने मुलांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुलांना केरळ पोलिसांसोबत आपल्या घरी परतण्याची परवानगी देण्यात आली. शनिवारी ही मुले आपल्या घरी परतली आहेत.