शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे केरळची दोन मुले परतली घरी

By admin | Updated: March 19, 2017 01:09 IST

केरळमधून गायब झालेल्या दोन मुलांचा महिन्याभरापासून सुरु असलेला शोध अखेर संपला. मुंबई रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलांना कुर्ला रेल्वे टर्मिनस येथून ताब्यात घेण्यात आले होते.

मुंबई : केरळमधून गायब झालेल्या दोन मुलांचा महिन्याभरापासून सुरु असलेला शोध अखेर संपला. मुंबई रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलांना कुर्ला रेल्वे टर्मिनस येथून ताब्यात घेण्यात आले होते. रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिन्यापूर्वी लोकमान्य टिळक एक्स्प्रेसने कुर्ला टर्मिनसवर घाबरलेल्या अवस्थेतील ६ वर्षांचा आर्यन आणि ४ वर्षांची अमृताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मुलांची चौकशी केली असता ती मुले दक्षिणात्य भाषेत बोलत असल्यामुळे त्यांना काही समजले नाही. या मुलांना बाल कल्याण विभागाच्या ’बालमंदिर’ या चेंबूर येथील बालगृहात ठेवण्यात आले. येथे आलेल्या एका व्यक्तीने ओळखले की ही मुले मल्याळम भाषेत बोलत आहेत. यावेळी केरळ पोलिसांशी संपर्क साधल्यावर ते याच दोन मुलांना शोधात आहेत असल्याचे समजले.वर्षभरापूर्वी या मुलांच्या आई शोभा हिने प्रियकर मंजुनाथच्या मदतीने वडील राजू यांची हत्या केली होती. हत्येनंतर त्यांनी राजूचे शव जंगलात नेऊन जाळले. त्यानंतर शोभाने मंजुनाथला सोबत राहण्यासाठी आग्रह धरला. मात्र मंजुनाथने तिला नकार दिला. शोभापासून सुटण्यासाठी त्याने तिचाही काटा काढला. शोभाची महिन्याभरापूर्वी हत्या केली आणि तिचे शव एका विहिरीत टाकून दिले. केरळच्या इरिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे शव सापडल्यामुळे या हत्येची उकल करण्याची जबाबदारी सब इन्स्पेक्टर ए. अंशद यांच्याकडे सोपवण्यात आली. तपासादरम्यान त्यांना मंजुनाथचा सुगावा लागला आणि त्यांनी त्याला अटक केली. आपला गुन्हा कबूल केल्यानंतर मंजुनाथने सांगितले, शोभा आणि राजूच्या दोन मुलांना त्याने बेंगलोर येथून एका ट्रेनमध्ये बसवून दिले, त्या नंतर ती मुले कुठे गेली ते त्याला माहित नव्हते. सब इन्स्पेक्टर ए. अंशद आणि त्यांच्या सर्वत्र त्यांचे फोटो पाठवले होते. (प्रतिनिधी)आत्याने स्वीकारली जबाबदारीगुरुवारी ए. अंशद यांच्या नेतृत्वात केरळ पोलिसांची टीम, मुलांची आत्या काव्या आणि तिचे पती मुंबईत आले. शुक्रवारी चाइल्ड वेल्फेअर कमिटीच्या समोर मुलांची आत्या काव्या हिने मुलांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुलांना केरळ पोलिसांसोबत आपल्या घरी परतण्याची परवानगी देण्यात आली. शनिवारी ही मुले आपल्या घरी परतली आहेत.