शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

डोंबिवलीतील भीषण आगीत दोन रासायनिक कंपन्या भस्मसात

By admin | Updated: March 6, 2016 03:39 IST

मानपाडा रस्त्यावरील भोपर-संदप येथे शनिवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत अल्ट्रा प्युअरकेम आणि जागृती केमिकल या कंपन्या भस्मसात झाल्या आगीत भस्मसात

डोंबिवली : मानपाडा रस्त्यावरील भोपर-संदप येथे शनिवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत अल्ट्रा प्युअरकेम आणि जागृती केमिकल या कंपन्या भस्मसात झाल्या आगीत भस्मसात झालेल्या कंपन्यांशेजारीच एचपी गॅसचे गोदाम होते. मात्र, त्यातील सिलिंडर वेळीच बाहेर काढल्याने पुढील धोका टळला. सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली.अल्ट्रा प्युअरकेम कंपनीत सकाळी साडेआठच्या सुमारास आधी आग लागली. तेव्हा कंपनीत साधारण १२ कामगार होते. आग लागल्याचे दिसताच पळत बाहेर येत त्यांनी अग्निशमन दलाला कळवले. रसायनाची पिंपे फुटू लागल्याने पाहतापाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण कंपनीच आगीने वेढली गेली. पिंपांच्या स्फोटामुळे त्यातील काही ज्वलनशील भाग बाहेर पडल्याने शेजारच्या जागृती केमिकल कंपनीलाही काही क्षणातच आग लागली. ती कंपनी जळू लागताच त्यातील कामगारही जीव वाचवत बाहेर पळाले. उंचच उंच उठलेले धुराचे लोळ आणि स्फोट, ज्वाळा असेच भीषण दृश्य दीर्घकाळ होते. दोन कंपन्या धडाडून पेटल्याने परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे वाहतूककोंडी झाली. मदतकार्यात अडथळे आले. सध्याच्या टंचाईच्या काळात आग विझवण्यासाठी अतिरिक्त पाणी लागेल, हे गृहीत धरून पालिका कर्मचाऱ्यांनी १० ते १२ पाण्याचे टँकर मागवले होते. त्यातच, शनिवार असल्याने त्या भागातील पाणीपुरवठा बंद होता. परिणामी, अग्निशमन दलाच्या जवानांचीही पाण्यासाठी धावपळ सुरू होती. (प्रतिनिधी)१८ बंब घटनास्थळीआगीची माहिती मिळताच डोंबिवली अग्निशमन दल, महापालिका कर्मचारी, नागरी संरक्षण दलाचे जवान आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. कल्याण आणि डोंबिवलीतून अग्निशमन दलाचे पाच ते सहा बंब बोलावण्यात आले. पण आगीने रौद्र रूप धारण करताच अंबरनाथ, भिवंडी, उल्हासनगर येथील अग्निशमन दलाच्या बंबांना आणि नंतर ठाणे, नवी मुंबई, मुंबईच्या बंबांना पाचारण करण्यात आले. पण, रासायनिक कंपनीची आग असल्याने पाण्याचा फारसा उपयोग होत नव्हता. अग्निशमन दलाचे १८ बंब आणि पाण्याच्या सहा टँकरच्या साहाय्याने सुमारे १२५ कर्मचाऱ्यांनी सात तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. नंतरही बराच काळ ती धुमसत होती. आग लागलेल्या या दोन्ही कंपन्यांजवळच एचपी कंपनीचे गॅस सिलिंडरचे गोदाम आहे. ते सिलिंडरने पूर्ण भरलेले होते. त्यामुळे भीषण दुर्घटना घडू शकते, हे लक्षात येताच अग्निशमन दलाच्या जवानांनी जिवाची पर्वा न करता भरलेले १५६ सिलिंडर गोदामातून बाहेर काढून ट्रकमध्ये भरून स्थलांतरित केले. ही आग एवढी भीषण होती की, दूरवरूनही आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसत होते. आग पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी वाढल्याने कोंडी झाली. त्यातून कोणतीही दुर्घटना होऊ नये, म्हणून पोलिसांनी मानपाडा रोडवरील वाहतूक वळवली.अधिकाऱ्यांची धावआग लागल्याचे कळताच जागृती केमिकलचे मालक हितेश ठक्कर यांनी घटनास्थळी धाव घेत कामगार बाहेर पडल्याची खात्री केली आणि आग विझवण्यासाठी पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांना सहकार्य केले. या आगीत त्यांचे आॅफिस कसेबसे वाचले. पण, शेजारच्या गोदामातील रासायनिक पदार्थांचा साठा पूर्ण जळाला. त्यात त्यांचे लाखोंचे नुकसान झाले. अल्ट्रा प्युअरकेम कंपनीचे मालक मिथुन पाटील असून त्यांची संपूर्ण कंपनी जळून खाक झाली.आगीच्या ठिकाणी अप्पर पोलीस आयुक्त शरद शेलार, पालिका आयुक्त ई. रवींद्रन, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मानपाडा पोलीस ठाण्याचे प्रमुख गौतम रणदिवे, शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी, अतिरिक्त आयुक्त संजय घरत, सभागृह नेते राजेश मोरे, आपत्ती व्यवस्थापनप्रमुख अनिल लाड, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली.