शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

स्वराज्यरक्षक किल्ले उध्वस्त करण्याच्या निर्णयाची द्विशताब्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 19:45 IST

महाराष्ट्रातल्या किल्ल्यावरील अनेक महत्त्वाची ठिकाणे उद्ध्वस्त करण्याच्या अत्यंत दुर्दैवी घटनेला २०० वर्षे पूर्ण होत आहेत.

ठळक मुद्देइंग्रजांनी त्यांच्या राजवट संरक्षणाच्या दृष्टीने किल्ले उद्ध्वस्त करण्यास सुरुवात होती केली

- नितीन ससाणे- जुन्नर : मराठी साम्राज्य ज्या गडकोट किल्ल्यांच्या आधारे उभे राहिले, किल्ल्यांच्या आधारावर ते टिकले ते किल्ले, त्यावरील वास्तु, तटबंदी, चोरवाटा, दरवाजे उद्ध्वस्त करून टाकून ब्रिटिश राजवटीने पुन्हा मराठा सरदार, मावळे यांनी किल्ल्यांचा आधार घेऊन संघटित होऊन आपल्याला विरोध करू नये, याची खबरदारी घेतली. यासाठी महाराष्ट्रातील किल्ल्यावरील अनेक महत्त्वाची ठिकाणे उद्ध्वस्त करण्याच्या अत्यंत दुर्दैवी घटनेला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. ऊन, वारा, पाऊस तसेच काळाच्या ओघात सध्या राज्यातील अनेक तसेच किल्ल्यांवरील वास्तूंची दुर्दशा झालेली दिसत असली तरी सन १८१८ मध्ये इंग्रजांनी त्यांच्या राजवटीच्या संरक्षणाच्या दृष्टीने किल्ले उद्ध्वस्त  करण्यास सुरुवात केली होती. महाराष्ट्रात इंग्रजांनी पेशव्यांकडून जो मुलुख जिंकला त्यास मुंबई इलाख्यात समाविष्ट करण्यात आले. त्यावर कमिशनर म्हणून माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याची नेमणूक करण्यात आली होती. तिसरे मराठा इंग्रज युद्ध झाले तरी दुसरे बाजीराव यांनी किल्ल्यांच्या आधारे इंग्रजांना विरोध करून जेरीस आणले होते. हे किल्लेच उद्ध्वस्त करावेत, असे एलफिन्स्टन याचे मत होते. त्याप्रमाणे इंग्रज अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या होत्या.  

 जुन्नर परिसरातील शिवनेरी, चावंड, हडसर, जीवधन, हरिश्चंद्रगड, कुंजरगड, नारायणगड हे सात किल्ले कसे उद्ध्वस्त केले गेले यासंदर्भात मोडी लिपीतील पत्रे भारत इतिहास संशोधक मंडळात उपलब्ध आहेत. अहमदनगर मुलुखाचे कलेक्टर हेन्री पॉटिंजर याने शिवनेरी किल्ल्याचा कमाविसदर रामराव नरसिंह याला लिहिलेल्या पत्रात पुण्यातून विष्णूसाहेब नावाचा इंजिनिअर किल्ले उद्ध्वस्त करण्यासाठी नारायणगडास आले आहेत. तसेच  कॅप्टन इस्टनससाहेब बहादूर आले आहेत. त्यास दूध वगैरे जो हमजीनस लागेल तो खूशखरेदी मोलास देत जाणे, कमत्ती न करणे, अशी ताकीद देण्यात आली होती. १८ डिसेंबर १८१८ रोजीचे हे पत्र आहे. इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेला किल्ला जीवधनवरील नाणे घाटाकडील दरवाजा आजही पाहावयास मिळतो.            त्याचप्रमाणे कर्नल प्रॉथर, जनरल प्रिटझलर, कॅप्टन रोज, मेजर मूर या अधिकाऱ्यांनादेखील राज्यातील इतरत्र असणारे किल्ले उद्ध्वस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कर्नल प्रॉथरने लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा, प्रचितगड, सरसगड, शूरगड, सरसगड, राजमाची, कोरीगड, सुधागड या किल्ल्यांवरील वास्तु, तटबंदी, चोरवाटा, दरवाजे उद्ध्वस्त केले. जनरल प्रिट्झलर व कॅप्टन रोज, मेजर मूर यांनी अनुक्रमे सातारा व रायगड इलाख्यातील किल्ल्याना सुरुंग लावले. तर सर्वच किल्ल्यांवर जाणारे प्रमुख मार्ग उखडून टाकण्यात आले. .............1ब्रिटिश राजसत्तेला भविष्यात स्थानिकांकडून  कोणत्याही प्रकारचा धोका पोहचू नये, स्थानिकांनी किल्ल्याच्या आधारे कोणतेही सैन्यबळ जोपासू नये, त्यांनी संघटीत होऊ नये यासाठी बळ देणारे किल्लेच उद्ध्वस्त करण्याचे इंग्रजांचे नियोजन होते. .......2छत्रपती शिवरायांनी डोंगरदºयांत घनदाट निबिड जंगलात असणारे किल्ले व शत्रुवर अचानक हल्ला करून शत्रूचे नुकसान करून पटकन किल्ल्याच्या सुरक्षित  आश्रयास जाण्याची युद्धपद्धती म्हणजे ‘गनिमी कावा’ याच्या आधारे बलाढ्य मुघल सत्तेला शह दिला होता. 3थोड्याशा शिबंदीच्या पाठबळावर मराठा सैनिकांनी एका एका किल्ल्याच्या आधारे बलाढ्य शत्रूपक्षाला एक एक वर्ष झुंजायला लावल्याचे इतिहास सांगतो. त्यामुळेच हे दुर्गवैभव नष्ट करण्याचे इंग्रजांचे नियोजन राहिले होते, असे इतिहास संशोधक व लेखक डॉ. लहू गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Junnarजुन्नरFortगडGovernmentसरकार