शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

नांदुरखेडा येथील दोन भावांचा पोहताना बुडून मृत्यू

By admin | Updated: September 2, 2016 22:23 IST

नांदुरखेडा येथील हातमजुरी करणाऱ्या गरीब कुटूंबातील सख्खे आते व मामेभाऊ असलेल्या दोन १६ व ११ वर्षीय मुलांचा पातोंडी शिवारातील भोकर नदीत पोहण्यासाठी गेले असता बुडून मृत्यू झाला

- ऑनलाइन लोकमत
भोकर नदीपात्रातील अवैध वाळू उत्खननामुळे निर्माण झालेल्या डोहाने घेतले बळी
रावेर, दि. 2 - तालुक्यातील नांदुरखेडा येथील हातमजुरी करणाऱ्या गरीब कुटूंबातील सख्खे आते व मामेभाऊ असलेल्या दोन १६ व ११ वर्षीय मुलांचा पातोंडी शिवारातील भोकर नदीत पोहण्यासाठी गेले असता अवैध वाळू उत्खननामुळे निर्माण झालेल कृत्रिम डोहात बुडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना आज दुपारी १२. ३० वाजेदरम्यान घडली. रावेरच्या सरदार जी जी हायस्कूलच्या इ. ५ वी व इ १० वीतील ते दोघेही विद्यार्थी असल्याने शहरासह पातोंडी, नांदुरखेडा परिसरातून एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 
 
नांदुरखेडा येथील प्रशांत राजाराम नायक (वय ११ वर्षे ) हा इ. ५ वी तील विद्यार्थी व त्याचा सख्खा आतेभाऊ जीवन रूपसिंग नायक (वय १६ वर्षे) हे दोन्ही आज सकाळी रावेरला शाळेत आले होते. मात्र शिक्षकांच्या संपामुळे शाळा बंद असल्याचे पाहून ते घरी परतले. दरम्यान, प्रशांतचे वडील राजाराम सायबू नायक हे त्यांचे आप्तेष्टांकडे खंडवा म. प्र. गेल्याने व त्याची आई शेतात गेल्याने त्याचे घरी केवळ धाकटा भाऊ होता. जीवनचे वडील रूपसिंग मांगीलाल नायक हे पत्नीसह शेतमजुरीसाठी गेल्याने त्याचे घरही बंद होते. म्हणून जीवन हा त्याचा धाकटा भाऊ रोहित, चुलतभाऊ प्रकाश अनार राठोड व मामेभाऊ प्रशांत यांच्यासह ३ कि. मी. अंतरावर असलेल्या पातोंडी येथे रावेर रस्त्यावर असलेल्या पुलाचे उत्तरेस सुमारे २०० मीटर लांब असलेल्या भोकर नदीतील डोहात पोहण्यासाठी गेले होते. 
दरम्यान, प्रशांत व जीवन हे डोहात बुडाल्याचे पाहून प्रकाश व रोहित या भावंडांनी आरडाओरड करून मदतीसाठी हाक दिली. हाकेच्या अंतरावर असलेल्या अज्ञात वाळू कामगाराने घटनास्थळी धाव घेऊन डोहात उडी मारली . व मयत प्रशांत राजाराम नायक (वय ११ वर्षे) व त्याचा सख्खा आतेभाऊ जीवन रूपसिंग नायक (वय १६ वर्षे)यांचे मृतदेह बाहेर काढून पळ काढला. दरम्यान त्या भांबावलेल्या रोहित व प्रकाश या भावंडांनी थेट रावेर रस्त्यावरील पुलाकडे मदतीसाठी धाव घेतली. त्याठिकाणी रामेश्वर पौकपाल जाटप हे मोटारसायकल धूत असताना भेटल्यावर त्यांनी दुर्घटना सांगितली. रामेश्वर जाटप यांनी घटनास्थळी जाऊन पातोंडी व नांदुरखेडा गावात संपर्क साधून त्या कोवळ्या मुलांचे मृतदेह रावेर ग्रामीण रूग्णालयात हलवले. वैद्यकीय अधीक्षक डॉ बी बी बारेला यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, डॉ. बारेला यांनीच दोघांचे शवविच्छेदन केले. प्रभारी प्रांताधिकारी व रावेर तहसीलदार विजय ढगे व पोलीस निरीक्षक कैलास काळे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देवून घटनेची माहिती घेतली. नांदुरखेडा गावात एकाच वेळी एकाच गोरगरीब आप्तपरिवारातून सख्खे आते व मामेभाऊ असलेल्या मुलांची अंत्ययात्रा पाहून ग्रामस्थांचे व आप्तेष्टांकडे काळीज पिळवटून निघाले.