शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

नांदुरखेडा येथील दोन भावांचा पोहताना बुडून मृत्यू

By admin | Updated: September 2, 2016 22:23 IST

नांदुरखेडा येथील हातमजुरी करणाऱ्या गरीब कुटूंबातील सख्खे आते व मामेभाऊ असलेल्या दोन १६ व ११ वर्षीय मुलांचा पातोंडी शिवारातील भोकर नदीत पोहण्यासाठी गेले असता बुडून मृत्यू झाला

- ऑनलाइन लोकमत
भोकर नदीपात्रातील अवैध वाळू उत्खननामुळे निर्माण झालेल्या डोहाने घेतले बळी
रावेर, दि. 2 - तालुक्यातील नांदुरखेडा येथील हातमजुरी करणाऱ्या गरीब कुटूंबातील सख्खे आते व मामेभाऊ असलेल्या दोन १६ व ११ वर्षीय मुलांचा पातोंडी शिवारातील भोकर नदीत पोहण्यासाठी गेले असता अवैध वाळू उत्खननामुळे निर्माण झालेल कृत्रिम डोहात बुडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना आज दुपारी १२. ३० वाजेदरम्यान घडली. रावेरच्या सरदार जी जी हायस्कूलच्या इ. ५ वी व इ १० वीतील ते दोघेही विद्यार्थी असल्याने शहरासह पातोंडी, नांदुरखेडा परिसरातून एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 
 
नांदुरखेडा येथील प्रशांत राजाराम नायक (वय ११ वर्षे ) हा इ. ५ वी तील विद्यार्थी व त्याचा सख्खा आतेभाऊ जीवन रूपसिंग नायक (वय १६ वर्षे) हे दोन्ही आज सकाळी रावेरला शाळेत आले होते. मात्र शिक्षकांच्या संपामुळे शाळा बंद असल्याचे पाहून ते घरी परतले. दरम्यान, प्रशांतचे वडील राजाराम सायबू नायक हे त्यांचे आप्तेष्टांकडे खंडवा म. प्र. गेल्याने व त्याची आई शेतात गेल्याने त्याचे घरी केवळ धाकटा भाऊ होता. जीवनचे वडील रूपसिंग मांगीलाल नायक हे पत्नीसह शेतमजुरीसाठी गेल्याने त्याचे घरही बंद होते. म्हणून जीवन हा त्याचा धाकटा भाऊ रोहित, चुलतभाऊ प्रकाश अनार राठोड व मामेभाऊ प्रशांत यांच्यासह ३ कि. मी. अंतरावर असलेल्या पातोंडी येथे रावेर रस्त्यावर असलेल्या पुलाचे उत्तरेस सुमारे २०० मीटर लांब असलेल्या भोकर नदीतील डोहात पोहण्यासाठी गेले होते. 
दरम्यान, प्रशांत व जीवन हे डोहात बुडाल्याचे पाहून प्रकाश व रोहित या भावंडांनी आरडाओरड करून मदतीसाठी हाक दिली. हाकेच्या अंतरावर असलेल्या अज्ञात वाळू कामगाराने घटनास्थळी धाव घेऊन डोहात उडी मारली . व मयत प्रशांत राजाराम नायक (वय ११ वर्षे) व त्याचा सख्खा आतेभाऊ जीवन रूपसिंग नायक (वय १६ वर्षे)यांचे मृतदेह बाहेर काढून पळ काढला. दरम्यान त्या भांबावलेल्या रोहित व प्रकाश या भावंडांनी थेट रावेर रस्त्यावरील पुलाकडे मदतीसाठी धाव घेतली. त्याठिकाणी रामेश्वर पौकपाल जाटप हे मोटारसायकल धूत असताना भेटल्यावर त्यांनी दुर्घटना सांगितली. रामेश्वर जाटप यांनी घटनास्थळी जाऊन पातोंडी व नांदुरखेडा गावात संपर्क साधून त्या कोवळ्या मुलांचे मृतदेह रावेर ग्रामीण रूग्णालयात हलवले. वैद्यकीय अधीक्षक डॉ बी बी बारेला यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, डॉ. बारेला यांनीच दोघांचे शवविच्छेदन केले. प्रभारी प्रांताधिकारी व रावेर तहसीलदार विजय ढगे व पोलीस निरीक्षक कैलास काळे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देवून घटनेची माहिती घेतली. नांदुरखेडा गावात एकाच वेळी एकाच गोरगरीब आप्तपरिवारातून सख्खे आते व मामेभाऊ असलेल्या मुलांची अंत्ययात्रा पाहून ग्रामस्थांचे व आप्तेष्टांकडे काळीज पिळवटून निघाले.